शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
2
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
3
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
4
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
5
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
6
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
7
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
8
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
9
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
10
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
11
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
12
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
13
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
14
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
15
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
16
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
17
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
18
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
19
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
20
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून

महिलांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना ठरविण्यासाठी अधिकाऱ्यांसोबत त्वरित बैठक घेणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2017 5:57 PM

 मुंबई - मुंबईतील महिलांच्या सुरक्षिततेच्या प्रश्नावर राज्याच्या विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत लवकरच बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृहराज्यमंत्री  दीपक केसरकर यांनी आज डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिलेल्या निवेदनावर दिले.मागील काही दिवसांत महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत सातत्याने होत असलेली वाढते प्रमाण पाहून आ. डॉ. गोऱ्हे यांनी आज ...

 मुंबई - मुंबईतील महिलांच्या सुरक्षिततेच्या प्रश्नावर राज्याच्या विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत लवकरच बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृहराज्यमंत्री  दीपक केसरकर यांनी आज डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिलेल्या निवेदनावर दिले.

मागील काही दिवसांत महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत सातत्याने होत असलेली वाढते प्रमाण पाहून आ. डॉ. गोऱ्हे यांनी आज मुख्यमंत्री आणि गृहराज्यमंत्री यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन दिले आणि या विषयाची चर्चा केली.

मुंबईमध्ये  उपनगरीय रेल्वे प्रवास करताना तरुणीवर होणारे हल्ले, महिलांसाठीच्या डब्यात पुरुषांचे अचानक प्रवेश करणे, महिलांच्या डब्याशेजारील जागेत बसून अंगविक्षेप व हातवारे करणे, महिलांना गर्दीत त्रास देणे अशा प्रकारचे विकृत व विपरीत वर्तन करण्याची प्रवृत्ती वाढत आहे. महिलांना कमी गर्दीच्या आणि रात्रीच्या वेळी सुरक्षित वातावरणात प्रवास करता यावा यासाठी नवनवीन उपाययोजना रेल्वे आणि गृह खात्याच्या संयुक्त सहकार्याने राबविण्यात येण्याची आवश्यकता या निमित्ताने अधोरेखित होत आहे. याबाबत तत्काळ तक्रार करण्यासाठी अथवा मदतीसाठी आता कोणतीही सबळ यंत्रणा उपलब्ध नाही. महिलांना रेल्वे प्रवासात अधिकाधिक असुरक्षितता भासत आहे. या पार्श्वभूमीवर आज आ.  डॉ. गोऱ्हे यांनी हे निवेदन दिले.

महिला सुरक्षा आणि अत्याचाराबाबत अनेक संस्था संघटना गेल्या अनेक वर्षांपासून राज्यात काम करीत आहेत. या सर्व कामाचा परिपाक म्हणून राज्यात बलात्कार विरोधी कायदा लागू केला गेला. याची परिणीती महिलांना काही प्रमाणात दिलासा मिळण्यात झाली. परंतु महिला संरक्षणाकरिता अधिक प्रभावी अंमलबजावणी होण्याच्या हेतूने राज्य सरकारने महिला सुरक्षितता व संरक्षणाच्या विषयावर अभ्यास करण्यासाठी न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. या समितीच्या सन्माननीय सदस्य म्हणूनही आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी काम पहिले होते. या समितीने राज्य शासनाला आपला अंतरिम अहवाल सन २०१३ मध्ये (अहवाल प्रसिद्धी तारीख – २९ नोव्हेंबर २०१३) दिला होता. यातील ४१ शिफारशी गृह विभागाशी संबंधित आहेत. या शिफारशींची अंमलबजावणी अधिक वेगाने आणि त्वरीत होण्याच्या उद्देशाने आ. डॉ. गोऱ्हे यांनी आज दोन्ही मंत्री महोदयांची भेट घेतली होती. याची मा. मुख्यमंत्री व गृहराज्य मंत्र्यांनी तत्काळ दखल घेत त्यांनी ताबडतोब याबाबत बैठक घेण्याची सूचना अधिकाऱ्याना दिली.

याबाबत उपाययोजना निश्चित करण्याच्या हेतूने चर्चा करण्यासाठी रेल्वे, गृह विभागाचे अधिकारी आणि संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत ही बैठक होणार आहे. यामुळे या विषयावर आता सकारात्मक कार्यवाही होईल अशी आशा निर्माण झाली आहे.   

पुणे शहरात धायरी परिसरात दिनांक २१ ऑक्टोबर २०१७ रोजी एका अडीच वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिचा निर्घृण खून केल्याची घटना घडली होती. या घटनेतील आरोपी पकडला गेला असला तरी त्याची चौकशी होऊन दोषी असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी.बऱ्याचदा लहान मुला – मुलींच्या बाबत घडणाऱ्या अशा घटनांमध्ये जवळच्या आरोपी नातेवाईकांमधीलच कोणीतरी असण्याची शक्यता असते. या अनुषंगाने शहरी भागात बीट स्तरावर महिला दक्षता व नागरिक सुरक्षा दले स्थापन करून त्यांच्या मदतीने त्या त्या भागातील दुर्गम व निर्जन भागात अधिकाधिक लक्ष देण्यात यावे अशी मागणी आ. डॉ. गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री आणि गृह राज्यामंत्र्याकडे केली आहे. यावर सकारात्मक प्रतिसाद देत त्यांनी अशा सूचना ताबडतोब देऊन याबाबत एक बैठका घेण्यात येईल, असे सांगितले. 

टॅग्स :WomenमहिलाMumbaiमुंबईDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसDeepak Kesarkarदीपक केसरकर