शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

लतादीदींच्या स्मारकावरून विसंवादी सूर, काँग्रेस-भाजपकडून शिवाजी पार्कात स्मृतिस्थळाची मागणी, सेनेचा केंद्राकडे अंगुलीनिर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2022 11:41 IST

शिवाजी पार्क येथे लतादीदींचे भव्य स्मारक उभारण्याची मागणी राम कदम यांनी केली आहे. यासंदर्भात कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठविल्याचेही सांगितले आहे.

मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनानंतर आता त्यांच्या स्मारकावरून विसंवादी सूर उमटू लागले आहेत. शिवाजी पार्क येथे लतादीदींचे भव्य स्मारक उभारण्याची मागणी भाजपचे आमदार राम कदम यांनी केली आहे, तर स्मारकाबाबत राजकारण करू नये, असे आवाहन करतानाच लतादीदींच्या स्मारकाबाबत केंद्र सरकारनेच विचार केला पाहिजे, असे म्हणत शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केंद्राला यात ओढण्याचा प्रयत्न केला आहे. काँग्रेसनेही शिवाजी पार्कातच स्मारक व्हायला हवे, असे सांगत भाजपच्या सुरात सूर मिसळला. शिवाजी पार्क येथे लतादीदींचे भव्य स्मारक उभारण्याची मागणी राम कदम यांनी केली आहे. यासंदर्भात कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठविल्याचेही सांगितले आहे. जिथे दीदींवर अंत्यसंस्कार झाले, त्या पंचतत्त्वात विलीन झाल्या, त्याच जागेवर स्मृतिस्थळ उभारायला हवे. तिथे जगाला प्रेरणा देईल, असे आंतराष्ट्रीय दर्जाचे स्मारक व्हायला हवे, अशी करोडो देशवासीयांची भावना असल्याचेही ते म्हणाले. त्याचा सन्मान करून सरकारने तातडीने स्मारकाचे काम सुरू करावे, अशी मागणीही कदम यांनी केली. काँग्रेसनेही या मागणीला एका अर्थाने पाठिंबा दिला आहे. लतादीदी यांचे स्मारक हे शिवाजी पार्कमध्येच व्हायला हवे, तेसुद्धा आंतराष्ट्रीय दर्जाचे असायला हवे. देशातून व जगातून येणाऱ्या लोकांना लतादीदींच्या स्मारकाला भेट दिल्यानंतर त्यांचा गोड आवाज स्मरायला हवा. कालच्या, आजच्या व उद्याच्या पिढीला स्मरणात राहील, अशा दर्जाचे स्मारक शिवाजी पार्कमध्ये व्हावे, ही काँग्रेसची भूमिका असल्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले. 

देशाला विचार करावा लागेल - राऊतशिवसेना नेते संजय राऊत यांनी हा विषय केंद्र सरकारकडे ढकलण्याचा प्रयत्न केला. लतादीदी या महान होत्या. आपल्या भूमीत त्यांनी जन्म घेतला, महाराष्ट्राशी त्यांचे नाते आहे. त्या शरीराने गेल्या. आत्मा आपल्याकडे आहे. त्या अमर राहतील. काही लोक त्यांच्या स्मारकाबाबत बोलत आहेत. त्यांचे स्मारक बनिवणे सोपे नाही. त्यासाठी केंद्र सरकारने विचार करायला हवा. दीदींच्या स्मारकाबाबत देशाला विचार करावा लागेल, असे राऊत म्हणाले. 

टॅग्स :Lata Mangeshkarलता मंगेशकरSanjay Rautसंजय राऊतRam Kadamराम कदमcongressकाँग्रेस