शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

टोळधाडीवर दोन दिवसात नियंत्रण मिळविणार - कृषिमंत्री दादा भुसे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2020 15:50 IST

टोळधाडीचे दोन थवे सध्या कार्यरत आहेत. पारशिवनी तालुक्यात सध्या उद्रेक सुरू आहे.

नागपूर : टोळधाडीच्या नियंत्रणासाठी कृषी विभाग पूर्णत: प्रयत्न करीत आहे. येत्या दोन दिवसात यावर नियंत्रण मिळवले जाईल, असा विश्वास राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केला. नियंत्रणासाठी ड्रोनने फवारणीचे नियोजन आहे. मात्र याचा दुष्परिणाम  जलसाठ्यावर होऊ नये, याची देखील काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे यावर आज सायंकाळपर्यंत निर्णय घेतला जाईल.टोळधाडीचे दोन थवे सध्या कार्यरत आहेत. पारशिवनी तालुक्यात सध्या उद्रेक सुरू आहे. फायर ब्रिगेडच्या माध्यमातून यावर नियंत्रण राखण्यात बर्‍यापैकी यश आलेले आहे. क्लोरोफाइमफोर्स या कीटकनाशकाची आतापर्यंत पाचशे लिटर फवारणी झालेली आहे. टोळधाडीमुळे भाजीपाला तसेच संत्रा, मोसंबी या पिकांचे नुकसान झाले आहे. त्यासंदर्भात आढावा घेण्याच्या सूचना कृषी अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. टोळधाडीमुळे शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानीचा समावेश पीकविम्यामध्ये करता येईल काय, या संदर्भात केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाशी चर्चा केली जात आहे.राज्यात अलीकडे प्रथमच असा प्रसंग निर्माण झाल्याने त्याबद्दल केंद्राचे देखील मत विचारात घेतले जाणार आहे. बियाणे व खतांची टंचाई पडणे तसेच त्याचा काळाबाजार होणार नाही याची दक्षता कृषी विभागाकडून घेतली जात आहे. एक हजार टन बियाणे आणि एक लाख टन खताचे वाटप आजवर झालेले आहे. महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती अभियान योजनेत आतापर्यंत 32 लाख शेतकऱ्यांचे अर्ज आले आहेत, त्यातील 30 लाख अर्ज पात्र ठरले असून, 19 लाख शेतकऱ्यांना 12 हजार कोटी रुपयांचे कर्ज त्यांच्या खात्यावर वर्ग केले आहे, कोरोनाच्या प्रकोपामुळे प्रक्रिया लांबली. त्यामुळे याला थोडा विलंब झाला आहे.