शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

टोळधाडीवर दोन दिवसात नियंत्रण मिळविणार - कृषिमंत्री दादा भुसे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2020 15:50 IST

टोळधाडीचे दोन थवे सध्या कार्यरत आहेत. पारशिवनी तालुक्यात सध्या उद्रेक सुरू आहे.

नागपूर : टोळधाडीच्या नियंत्रणासाठी कृषी विभाग पूर्णत: प्रयत्न करीत आहे. येत्या दोन दिवसात यावर नियंत्रण मिळवले जाईल, असा विश्वास राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केला. नियंत्रणासाठी ड्रोनने फवारणीचे नियोजन आहे. मात्र याचा दुष्परिणाम  जलसाठ्यावर होऊ नये, याची देखील काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे यावर आज सायंकाळपर्यंत निर्णय घेतला जाईल.टोळधाडीचे दोन थवे सध्या कार्यरत आहेत. पारशिवनी तालुक्यात सध्या उद्रेक सुरू आहे. फायर ब्रिगेडच्या माध्यमातून यावर नियंत्रण राखण्यात बर्‍यापैकी यश आलेले आहे. क्लोरोफाइमफोर्स या कीटकनाशकाची आतापर्यंत पाचशे लिटर फवारणी झालेली आहे. टोळधाडीमुळे भाजीपाला तसेच संत्रा, मोसंबी या पिकांचे नुकसान झाले आहे. त्यासंदर्भात आढावा घेण्याच्या सूचना कृषी अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. टोळधाडीमुळे शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानीचा समावेश पीकविम्यामध्ये करता येईल काय, या संदर्भात केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाशी चर्चा केली जात आहे.राज्यात अलीकडे प्रथमच असा प्रसंग निर्माण झाल्याने त्याबद्दल केंद्राचे देखील मत विचारात घेतले जाणार आहे. बियाणे व खतांची टंचाई पडणे तसेच त्याचा काळाबाजार होणार नाही याची दक्षता कृषी विभागाकडून घेतली जात आहे. एक हजार टन बियाणे आणि एक लाख टन खताचे वाटप आजवर झालेले आहे. महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती अभियान योजनेत आतापर्यंत 32 लाख शेतकऱ्यांचे अर्ज आले आहेत, त्यातील 30 लाख अर्ज पात्र ठरले असून, 19 लाख शेतकऱ्यांना 12 हजार कोटी रुपयांचे कर्ज त्यांच्या खात्यावर वर्ग केले आहे, कोरोनाच्या प्रकोपामुळे प्रक्रिया लांबली. त्यामुळे याला थोडा विलंब झाला आहे.