शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
2
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
3
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
4
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
5
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
6
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
7
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
8
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
9
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
10
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
11
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
12
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
13
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
14
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
15
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
16
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
17
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
18
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
19
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
20
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका

फडणवीसच नव्हे, तर अन्य भाजप नेत्यांना तुरुंगात डांबण्याचे षडयंत्र; भाजप कार्यकारिणीत मविआवर हल्लाबोल

By यदू जोशी | Updated: February 11, 2023 13:23 IST

मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त संजय पांडे यांना आपल्या अटकेची सुपारी देण्यात आली होती असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केला होता.

नाशिक : केवळ देवेंद्र फडणवीस यांनाच नव्हे तर भाजपच्या अन्य नेत्यांनाही  खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवून तुरुंगात डांबण्याचे षडयंत्र मविआ सरकारच्या काळात रचण्यात आले होते असा गौप्यस्फोट भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत मांडलेल्या राजकीय ठरावात शुक्रवारी करण्यात आला.शनिवारी होणाऱ्या खुल्या बैठकीत राजकीय तसेच सहकार व कृषी विषयक असे दोन ठराव मंजूर करण्यात येणार आहेत. प्रदेश पदाधिकारी व जिल्हाध्यक्षांच्या आजच्या बैठकीत आलेल्या राजकीय ठरावात, कांगावे करणारे, टोमणे मारणारे, सुडाच्या भावनेने काम करणारे आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी गद्दारी करणारे सरकार आम्ही घालविले आणि एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील हिंदुत्ववादी सरकार आणले असा हल्लाबोल करण्यात आला आहे.मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त संजय पांडे यांना आपल्या अटकेची सुपारी देण्यात आली होती असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केला होता. राजकीय ठरावात महाराष्ट्राच्या इतिहासाला काळिमा फासणाऱ्या या सूडपर्वाचा कार्यकारिणी निषेध करते असे ठरावात म्हटले आहे. महाविकास आघाडीने संविधानाची शपथ घेण्याचा दिखावा केला होता. सरकार चालविताना मात्र त्या तत्त्वांना हरताळ फासला. सत्तेचा वापर दडपशाही आणि सुडासाठी केला. सरकारी वकिलाला हाताशी धरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना अडकविण्याचे  प्रयत्न झाले होते, असे स्पष्ट आरोप ठरावात आहेत. कोणत्या भाजप नेत्यांना मविआ सरकारच्या काळात जेलमध्ये टाकण्याचे प्रयत्न झाले होते यावर प्रकाश पडणार का?  याबाबत उत्सुकता आहे. फडणवीस यांना तुरुंगात डांबण्यासाठी मुंबईच्या तत्कालीन पोलिस आयुक्तांना सर्वोच्च पातळीवरून जबाबदारी देण्यात आली होती, असे ठरावात नमूद केले आहे. 

इतिहासावरुन टीका  - राजकीय ठरावात असेही म्हटले आहे की, शिंदे-फडणवीस सरकारमुळे हिंदुत्वाच्या विचारांना सन्मान मिळत आहे. तथापि विरोधकांकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या देदीप्यमान इतिहासाची मतांच्या राजकारणासाठी सोयीस्कर मांडणी केली जात आहे.त्यातूनच छत्रपती संभाजी महाराज यांना धर्मवीर म्हणू नका असे आवाहन करण्यापर्यंत मजल गेली आहे. - काही लोक शाहिस्तेखान, अफजल खान होते म्हणून शिवाजी महाराज होते इतका टोकाचा अनुनय करण्याच्या मागे लागले असून ही वृत्ती वेळीच रोखण्याची गरज असल्याचे राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचे नाव न घेता ठरावात म्हटले आहे.- शिंदे-फडणवीस सरकारने घेतलेल्या अनेक निर्णयांचा उल्लेख करत ठरावात सरकारची प्रशंसा करण्यात आली आहे.

विरोधकांकडून दिशाभूल  - राज्यातील जनतेने २०१९ मध्ये दिलेल्या जनादेशाचा सन्मान आमचे सरकार आल्यामुळे झाला. विरोधक मात्र भ्रम पसरवत आहेत. - औद्योगिक गुंतवणुकीपासून विविध मुद्द्यांवर दिशाभूल करणाऱ्या महाविकास आघाडीपासून सावध राहा असे आवाहन या ठरावात करण्यात आले आहे. - मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, दोन्ही समाजांना सरकारने दिलेल्या सोयीसुविधांचा उल्लेखही ठरावात आहे. 

टॅग्स :BJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMahavikas Aghadiमहाविकास आघाडी