शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

“सरकार एवढे बेशरमपणे कसे काय वागू शकते?” मणिपूर घटनेवरून यशोमती ठाकूर संतापल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2023 6:15 PM

Congress Yashomati Thakur Manipur Violence: मणिपूरमध्ये जे घडले ते अत्यंत वेदनादायी आहे. सत्ताधाऱ्यांनी खुर्च्या खाली केल्या पाहिजेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

Congress Yashomati Thakur Manipur Violence: दोन महिलांची नग्न धिंड काढल्याची घटना मणिपूरमध्ये घडली. या घटनेनंतर संपूर्ण देशातून संतापाची लाट उसळली आहे. सर्वोच्च न्यायालयही या प्रकरणावर जातीने लक्ष घालत असून, सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने सरकारला अल्टिमेटम दिला आहे. यातच विरोधक केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला जात असून, काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी सडकून टीका केली आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मणिपूरमधील घटनेचा उल्लेख केला. पीएम मोदींनी आरोपींवर कडक कारवाई करण्याचे सांगितले आहे. सर्वोच्च न्यायालयाने मणिपूरमधील घटनेची स्वतःहून दखल घेतली आणि राज्य आणि केंद्र सरकारला या प्रकरणी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. यानंतर आता विरोधक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. 

PM मोदी २ महिने काहीच बोलले नाहीत

मणिपूरमध्ये जे घडले ते अत्यंत वेदनादायी आहे. मागील ७७ दिवसांपासून सर्वकाही लपून ठेवले गेले आहे. केंद्र आणि राज्य सरकार बेशरम आहे. हे हैवानांचे राज्य आहे. पंतप्रधान मोदी दोन महिने बोलले नाहीत, जेव्हा महिलांवर अत्यावर झाले, तेव्हा महाभारत झाले, तेव्हा बोलले. हे लक्षात ठेवावे. आता सत्ताधाऱ्यांनी खुर्च्या खाली केल्या पाहिजेत, अशी मागणी यशोमती ठाकूर यांनी केली. 

दरम्यान, महिला अत्याचाराचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अशा अनेक घटना इथे घडल्या आहेत, अशी धक्कादायक कबुली मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी दिली आहे. मुख्यमंत्र्यांनीच कबुली दिल्यामुळे मणिपूरमध्ये किती भीषण परिस्थिती निर्माण झाली, याबाबत चर्चा सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. 

 

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारYashomati Thakurयशोमती ठाकूर