शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

काँग्रेसने 'विश्वास' जिंकला अन् उद्धव ठाकरेंचा 'विश्वास' उडाला; राणेंनी सांगितली पडद्यामागची गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2019 19:04 IST

माजी मुख्यमंत्री आणि स्वाभिमान महाराष्ट्र पक्षाचे नेते खासदार नारायण राणे यांनी त्यांच्या कारकीर्दीतील घडामोडींवर आत्मचरित्रातून प्रकाश टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि स्वाभिमान महाराष्ट्र पक्षाचे नेते खासदार नारायण राणे यांनी त्यांच्या कारकीर्दीतील घडामोडींवर आत्मचरित्रातून प्रकाश टाकण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये त्यांनी अनेक धक्कादायक दावे केले आहेत. राष्ट्रवादीचे आमदार फोडण्याची जबाबदारी राणेंकडे देण्यात आली होती. हा प्रयत्न फसल्याने उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या वादावर खरी ठिणगी पडल्याचा दावा यामध्ये करण्यात आला आहे. 

एबीपी माझाकडे या आत्मचरित्राची काही पाने उपलब्ध झाली आहेत. यामध्ये केलेल्या दाव्यानुसार नारायण राणे यांनी शिवसेनेच्या आताच्या परिस्थितीला माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींना जबाबदार धरले आहे. माझ्यासाठी मुख्यमंत्रिपद सोडावं लागल्यानं जोशींच्या मनात एक प्रकारचा राग होता. वरकरणी जरी जोशी शिवसेनेचे चिंतक असल्याचे वाटत असले तरी त्यांच्या निर्णयामुळे पक्षाची आज अशी परिस्थिती झाली आहे. जोशी उद्धवजींच्या जवळचे होऊ लागले होते. पद्धतशीरपणे त्यांनी विरोधी नेत्यासाठी सुभाष देसाईंचं नाव पुढे केलं, असा आरोप राणे यांनी केला आहे. 

तसेच 1999 मध्ये विलासराव देशमुखांचे सरकार पाडण्यासाठी बाळासाहेब ठाकरेंनी राष्ट्रवादीचे आमदार फोडण्याची जबाबदारी दिली होती. राष्ट्रवादीचे आमदार मातोश्री क्लबवर आले होते. तेथे उद्धव ठाकरे आले होते. तेथे त्यांना राणे नसल्याचे सांगण्यात आले. बाळासाहेब आणि जॉर्ज फर्नांडीस यांच्या भेटीनंतर ही योजना वेगळ्या वळणावर गेली. विलासरावांनी बहुमत सिद्ध केले. मात्र, यानंतर उद्धव ठाकरे आणि राणे यांच्या संबंधांमध्ये दुरावा निर्माण झाल्याचा दावा राणे यांनी यामध्ये केला आहे. 

...तेव्हा उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांना दिली होती धमकी; नारायण राणेंचा आत्मचरित्रात गौप्यस्फोट

 

टॅग्स :Narayan Raneनारायण राणेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेस