शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
2
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
3
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
4
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
5
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
6
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
7
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
8
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
9
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
10
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
11
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
12
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
13
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
14
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
15
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
16
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
17
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
18
अखेर 'या' तारखेपासून नवी मुंबई विमानतळावरुन विमाने झेपावणार! पहिल्या टप्प्यात 10 शहरांसाठी सेवा सुरू होणार
19
IPL 2026 Retain and Released Player Full List : KKR नं महागड्या खेळाडूला दिल्ला धक्का; कुणी कुणावर ठेवला भरवसा?
20
बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? जेडीयू म्हणतोय नीतीशच राहणार, भाजप म्हणतोय आमदार ठरवणार!
Daily Top 2Weekly Top 5

गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2025 10:39 IST

Congress Vijay Wadettiwar News: निवडणूक आयोगाची वकिली करणारे मुख्यमंत्री, भाजपा नेते गडकरींना जाब विचारणार का? केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे निवडणूक आयोग आता प्रतिज्ञापत्रक मागणार का? असा सवाल काँग्रेसने केला आहे.

Congress Vijay Wadettiwar News: काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एका दीर्घ पत्रकार परिषदेत भाजप व निवडणूक आयोगावर ‘मतचोरी’चा थेट आरोप केला. राहुल गांधी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावर अनेक गंभीर आरोप करत बोगस मतदारांबाबत मोठा दावा केला. राहुल गांधी यांनी कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील मतदार यादी दाखवून एकाच व्यक्तीचं नाव वेगवेगळ्या राज्यांमध्ये आणि मतदान केंद्रांवर नोंदवलेले असल्याचा दावा केला. यावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप होत असून, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नाव घेऊन काँग्रेसने भाजपा नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट सवाल केला आहे. 

आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेबांची कोणती चीप आणि डिस्क खराब झाली आहे? निवडणुक आयोगाची वकिली करणारे मुख्यमंत्री, भाजपा नेते गडकरींना जाब विचारणार का? मतचोरी होते, मतदारयादीत घोळ केले जातात याचा पुरावा आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिला. केंद्रीय मंत्री गडकरी यांनी गंभीर आरोप केला की त्यांच्या निवडणुकीत मतदारसंघातील ३,५०,००० नावे वगळण्यात आली. विशेष म्हणजे जी नावे वगळण्यात आली ते त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक होते. त्यांच्या भाच्याचे नावही वगळण्यात आले, असे गडकरी म्हणाले, असे सांगत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी टीका केली. विजय वडेट्टीवार यांनी एक्सवर एक पोस्ट करत भाजपावर हल्लाबोल केला. 

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे निवडणूक आयोग आता प्रतिज्ञापत्रक मागणार का? 

विजय वडेट्टीवार पुढे म्हणतात की, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जवळच्या लोकांची मत जर मतदारयादीतून गायब होत असतील तर इतरांचे काय? कुठे मतदार वाढवून दाखवले जात आहे तर कुठे मतदार गायब केले जात आहे, मतचोरीचा याहून मोठा पुरावा काय आहे? केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे निवडणूक आयोग आता प्रतिज्ञापत्रक मागणार का? अजून पुरावे मागणार की माफी मागणार? अशी विचारणा विजय वडेट्टीवार यांनी केली. 

नितीन गडकरी नेमके काय म्हणाले?

निवडणूक लढवत असताना साडेतीन लाख नावे, जे माझे मतदार आहेत, त्यांची नावे वगळण्यात आली, हे माझ्या लक्षात आले. या वगळलेल्या नावांत माझे नातेवाईक, कुटुंबातील सदस्य होते, असे अनेक लोक होते. ते माझ्याविरोधात षडयंत्र होते का, मला कमकुवत करण्यासाठी नावे वगळण्यात आली होती का, असे आरोप मी कुणावरही करणार नाही. परंतु, माझ्या मतदारसंघातील साडेतीन लाख लोकांची नावे वगळण्यात आली होती, हे सत्य आहे, असे नितीन गडकरी एका व्हिडिओत सांगताना दिसत आहेत. हा व्हिडिओ विजय वडेट्टीवार यांनी शेअर केला आहे. मीडियाला दिलेल्या मुलाखतीत नितीन गडकरी बोलत आहेत, असे दिसत आहे. 

दरम्यान, बोगस मतदार आणि मतदार याद्यांमधील घोळावरून केंद्रीय निवडणूक आयोगावर विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी केलेल्या आरोपांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खिल्ली उडवली. तर मतदार याद्यांमध्ये घोळ आहे. आम्हालाही ते मान्य आहे. आमची इतक्या वर्षापासून ते सांगत आहोत, असे विधान मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. मला वाटते की, राहुल गांधीच्या मेंदूची चीप चोरीला गेली आहे. त्यांची हार्ड डिस्क करप्ट झाली आहे, म्हणून ते नेहमी खोटे बोलत आहेत, ते जनतेचे जनमत चोरत आहेत, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर केली. 

 

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारcongressकाँग्रेसElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसRahul Gandhiराहुल गांधीNitin Gadkariनितीन गडकरीNitin Gadkariनितीन गडकरी