शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

“BJP दबावात अजितदादांनी नवाब मलिकांना वाऱ्यावर सोडणे योग्य नाही”; काँग्रेस नेत्याचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2023 14:48 IST

Congress Sachin Sawant: मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची नवाब मलिकांबद्दलची भूमिका योग्य आहे का? यावर अजितदादांनी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

Congress Sachin Sawant: महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी हजेरी लावली आणि सत्ताधारी बाकांवर जाऊन बसले. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक पत्र लिहून नवाब मलिकांना महायुतीत घेण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आक्षेप नोंदवला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा दिल्याचे समजते. यावरून आता आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहेत. यातच काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी एक्सवर पोस्ट करत अजित पवार यांना सल्ला दिला आहे. 

नवाब मलिक आपल्या पक्षात नाहीत किंवा महायुतीत नाहीत अशी स्पष्ट भूमिका जाहीर न करता राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने याबाबत नरोवा कुंजरोवा भूमिका घेतली. नवाब मलिक सभागृहात कुठे बसले, ते तुम्ही पाहिले, त्यांची भूमिका काय आहे, हे ऐकल्यानंतर मी माझी आणि पक्षाची भूमिका मांडेन, असे अजित पवारांनी सांगितले. देवेंद्र फडणवीसांच्या पत्रानंतरही नवाब मलिक यांनी अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांची भेट घेतल्याने महायुतीतील तणाव चिघळण्याची चिन्हे आहेत. काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी यासंदर्भात एक्सवर पोस्ट शेअर करत भाष्य केले आहे. 

अजितदादांनी नवाब मलिकांना वाऱ्यावर सोडणे योग्य नाही

नवाब मलिक यांना देशद्रोही ठरवण्याचे कारण त्यांनी दाऊद शी संबंधित मालमत्ता घेतली हा आरोप व तपास यंत्रणांकडून चौकशी - प्रफुल्ल पटेल यांनी इक्बाल मिर्चीशी संबंधित मालमत्ता घेतली - इडीने ती ताब्यात घेतली तरी भाजपाला चालते पण नवाब मलिक चालत नाहीत. इतकेच काय?  RKW डेव्हलपर्स लिमिटेड आणि सनब्लिंक रिअल इस्टेट या कंपन्यांची ED द्वारे टेरर फंडिंग तसेच इक्बाल मिर्चीशी असलेल्या संबंधांची चौकशी केली जात आहे. भाजपाने या कंपन्यांकडून ₹२० कोटी देणगी घेतली तेही चालते. आता भाजपा नेते भाजपा अध्यक्षांना पत्र कधी लिहिणार? असो! अजितदादांनी आपल्या सहकाऱ्याला भाजपाच्या दबावात वाऱ्यावर सोडणे योग्य नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची नवाब मलिकांबद्दलची भूमिका योग्य आहे का? यावर अजितदादांनी भूमिका स्पष्ट करावी. उगीच उत्तर नाही म्हणून "एक मिनिट - एक मिनिट" करुन पत्रकारांना धमकावू नये, असे सचिन सावंत यांनी एक्सवर म्हटले आहे.

दरम्यान, नवाब मलिकांना कोटनि निदर्दोष ठरविलेले नाही. सत्ताधारी पक्षांच्या बाकावरील त्यांची उपस्थिती संकेतांना धरुन नाही. महायुतीमधील सर्व घटक पक्ष देशहित व जनहिताच्या ध्येयाने एकत्र आले आहेत. त्यामुळे फडणवीस यांनी मांडलेल्या भूमिकेशी शिवसेना पूर्णतः सहमतच आहे, असे याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारnawab malikनवाब मलिकSachin sawantसचिन सावंत