शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Political Crisis: “उद्धव ठाकरेंमध्ये लढण्याची इच्छा राहिलेली नाही”; राजीनाम्यावर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2022 15:39 IST

Maharashtra Political Crisis: हा नेतृत्व कौशल्याचा प्रश्न असून, फेसबुक लाइव्ह आणि विधिमंडळात बोलणे यात फरक आहे, असा टोला पृथ्वीराज चव्हाण यांनी लगावला आहे.

मुंबई: शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ३८ हून अधिक आमदारांनी केलेल्या मोठ्या बंडानंतर राज्यात पराकोटीचा सत्तासंघर्ष आठवडाभरापासून पाहायला मिळाला. यानंतर अखेरीस उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्रीपद आणि विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर यावरून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. महाविकास आघाडीतील नेत्यांनीही यावर भाष्य केले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी रोखठोक शब्दांत आपली प्रतिक्रिया दिली. उद्धव ठाकरेंमध्ये लढण्याची इच्छा राहिलेली नाही, असे दिलेल्या राजीनाम्यावरून दिसल्याचे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. 

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी बहुमत चाचणीसाठी एक दिवसाचे विशेष अधिवेशन बोलावण्याचे निर्देश महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारला दिले होते. याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने बहुमत चाचणीच्या बाजूने निकाल दिला. यानंतर उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला. यावर बोलताना, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल संभ्रमात टाकणारा होता. या निकालातून काही स्पष्टता आलेली नाही. पक्षांतरबंदी कायद्यासंदर्भात काही निर्णय घेतला नाही. बरीच अनिश्चितता आहे. ११ जुलैला याचिकांवर सुनावणी करु सांगू आणि आता आपलाच निर्णय बदलला. त्यांनी विचित्र निर्णय झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून ही अपेक्षा नव्हती, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. 

उद्धव ठाकरेंनी सभागृहात येऊन बाजू मांडायला हवी होती

उद्धव ठाकरेंनी सभागृहात येऊन बाजू मांडायला हवी होती आणि त्यानंतर राजीनामा द्यायला हवा होता. राज्यातील जनतेला त्यांची बाजू कळाली असती. विरोधी पक्षनेते तसेच आणखी काही नेत्यांना बोलण्याची संधी मिळाली असती. आम्ही हे सरकार का स्थापन केले हे काँग्रेस राष्ट्रवादीला सांगता आले असते. एक-दोन तास सभागृह चालले असते आणि नंतर निर्णय घेतला असता तर चालले असते, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. 

उद्धव ठाकरेंमध्ये लढण्याची इच्छा राहिलेली नाही

आता उद्धव ठाकरेंमध्ये लढण्याची इच्छा राहिलेली नाही. रक्तपात होईल वैगेरे असे जे काही ते म्हणाले ते खोटे होते. त्यांनी लढायला हवे होते. ज्या महाराष्ट्राच्या जनतेने अडीच वर्ष पाठिंबा दिला त्यांना सांगायला हवे होते. फेसबुक लाइव्ह आणि विधिमंडळात बोलणे यात फरक आहे. विधीमंडळात जे बोलतो ते रेकॉर्डवर राहते, असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

हा नेतृत्व कौशल्याचा प्रश्न आहे

इतक्या मोठ्या प्रमाणात माणसे नाराज आहेत. याचा त्यांना अंदाजच आला नाही. त्या धक्क्यातून ते बाहेरच आले नाहीत. माझ्या इतक्या माणसांनी दगा दिला असे ते सारखे म्हणत राहिले. खाली काय सुरु होते याचा त्यांना अंदाज आला नाही. हा नेतृत्व कौशल्याचा प्रश्न आहे. भाजपाला थांबवण्यासाठी त्यांनी दुसरा पर्याय दिला असता तर आम्ही मान्य केला असता, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, एकनाथ शिंदेंनी काँग्रेस, राष्ट्रवादीवर राग काढला तोही काही खरा नव्हता. त्यांना मुख्यमंत्री व्हायचे होते. ज्याप्रमाणे बाळासाहेबांनी मनोहर जोशींना मुख्यमंत्री केले तसेच यावेळी घडेल, अशी त्यांना अपेक्षा होती. पण ते मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत. शरद पवारांनी दोन्ही पक्षात ज्येष्ठ नेते असल्याने कनिष्ठ व्यक्तीच्या हाताखाली काम करणे अवघड जाईल अशी भूमिका घेतली होती, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणUddhav Thackerayउद्धव ठाकरे