शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
2
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
3
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
4
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
5
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
6
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
7
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
8
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
9
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
10
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
11
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
12
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
13
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
14
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
15
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
16
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
17
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
18
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
19
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
20
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर

“...म्हणून आता भाजपाने राम मंदिराचा विषय समोर आणला”; पृथ्वीराज चव्हाणांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2024 09:48 IST

INDIA Alliance: आगामी लोकसभा निवडणूक सोपी नाही हे भाजपाला कळाले आहे, असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

INDIA Alliance: श्रीराम मंदिराच्या गर्भगृहात रामललाची मूर्ती आसनावर विधिवत पद्धतीने ठेवण्यात आली. अवघ्या काही तासांवर राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा आला असून, अद्यापही यावरून आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपावर टीकास्त्र सोडले. भाजपाला यश मिळत नाही, म्हणून आता राम मंदिराचा विषय आणला आहे, असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. 

प्रसारमाध्यमांशी बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी विविध मुद्द्यांवर स्पष्ट शब्दांत भाष्य केले. कोणत्याही परिस्थितीत भाजपाला निवडणूक जिंकायची आहे. निवडणूक आपल्या हातातून चालली असल्याचे भाजपाला जाणवले आहे, त्यामुळेच ते नेते फोडत आहेत. नेते कुठे गेले तरी कार्यकर्ते आणि मतदार कुठे आहेत हे महत्त्वाचे आहे. ज्या कार्यकर्त्यांनी विचाराला धरून मतदान केले. जातीयवादाविरोधात मतदान केले आहे. नेते त्या पक्षात गेले म्हणून मतदार बदलतील असे नाही, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

...म्हणून आता भाजपाने राम मंदिराचा विषय समोर आणला

भाजपाचा आत्मविश्वास ढळलेला आहे. २०१४, २०१९ ची धोरण मांडले ते फसले. त्यामुळे एकामागोमाग एक पक्ष फोडून, ईडी, सीबीआयचा दबाव वापरून नेते फोडण्याचा प्रयत्न आहे. २०२४ ची निवडणूक ही सोपी नाही हे भाजपाला कळाले आहे. आता प्रभू श्रीराम मंदिराचा विषय भाजपाने समोर आणला आहे. पण, भाजपाला यश मिळत नाही. ईडी आणि आर्थिक आमिषे दाखवून पक्ष फोडण्यात येत आहेत, या शब्दांत पृथ्वीराज चव्हाण यांनी हल्लाबोल केला. तसेच जे गेले ती वस्तूस्थिती आहे. काही स्वार्थाकरिता तर काही भीतीपोटी गेलेत. परंतु, मतदार गेलेत की नाही हे निवडणुकीतून स्पष्ट होईल. स्थानिक संस्थांच्या निवडणूक घेण्याचे धाडस भाजपाचे होत नाही. यावरून आपल्याला काय समजायचे ते समजायला हवे, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

दरम्यान, काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन प्रकाश आंबेडकरांना केले आहे. मात्र, प्रकाश आंबेडकर यांना इंडिया आघाडीत घेण्याबाबत अद्याप स्पष्टत नाही. यावर बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, इंडिया आघाडीत २८ पक्ष आहेत. प्रकाश आंबेडकरांना इंडिया आघाडीत यायचे असेल, तर मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घ्यावी. प्रकाश आंबेडकर कुणाच्या निमंत्रणाची वाट पाहत आहेत, ते माहिती नाही. मल्लिकार्जुन खरगेंना भेटण्यास प्रकाश आंबेडकरांना काय अडचण आहे, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

 

टॅग्स :Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणBJPभाजपाcongressकाँग्रेस