शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
4
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
5
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
6
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
7
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
8
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
9
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
10
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
11
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
12
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
13
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
14
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
15
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
16
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
17
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
18
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
19
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
20
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया

वणी मतदारसंघात काँग्रेसला मिळालेला जनाधार भाजपसाठी डोकेदुखी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2019 12:01 IST

चारदा खासदार राहिलेले आणि सलग १५ वर्षे निवडून येणारे माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांचा काँग्रेसचे धानोरकर यांनी लोकसभा निवडणुकीत केलेला पराभव म्हणजे, काँग्रेसला मिळालेला जनाधार समजला जात आहे.

मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच मतदारसंघात इच्छुकांची गर्दी पहायला मिळत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील महत्वाचा वणी विधानसभा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात असून, वणीचा गड राखण्यासाठी भाजपला यावेळी मोठी कसरत करावी लागणार आहेत. तर लोकसभा निवडणुकीत याच मतदारसंघातून काँग्रेसला मिळालेला जनाधार भाजपच्या विजयाला अडसर ठरणार असल्याचे बोलले जात आहे.

कोळशाचा काळाबाजार, त्यातील वाहतूक, चोरटी विक्री व एकूणच उलाढालीतील पैसा, यामुळे वणी विधानसभा मतदारसंघ आर्थिकदृष्ट्या भक्कम समजला जातो. त्यामुळे या ठिकाणी आमदार होण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांची संख्या सुद्धा मोठ्याप्रमाणात आहेत. २०१४ मध्ये याच मतदारसंघात भाजपचे विद्यमान संजीवरेड्डी बोदकुरवार यांचा अनपेक्षित विजय झाला होता. मात्र लोकसभा निवडणुकीत वणी मतदारसंघात लोकांनी काँग्रेसला दिलेला पाठींबा, भाजपसाठी डोकेदुखी ठरत आहे.

वणी विधानसभा मतदार संघाचा समावेश असलेल्या चंद्रपूर-आर्णी लोकसभा मतदार संघात नुकत्याच झालेल्या निवडणुकीत बाळू धानोरकर हे राज्यातून काँग्रेसचे एकमेव खासदार निवडून आले आहेत. त्यातच वणी विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमदेवार हंसराज अहिर यांना मोजक्याच मतांची आघाडी मिळाल्याने भाजपसाठी हे आगामी निवडणुकीत धोकादायक ठरू शकते. तर काँग्रेसला मिळालेला जनाधार विधानसभा निवडणुकीत भाजपला अडसर ठरणार असल्याची चर्चा मतदारसंघात पहायला मिळत आहे.

चारदा खासदार राहिलेले आणि सलग १५ वर्षे निवडून येणारे माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांचा काँग्रेसचे धानोरकर यांनी लोकसभा निवडणुकीत केलेला पराभव म्हणजे, काँग्रेसला मिळालेला जनाधार समजला जात आहे. वणी विधानसभा मतदारसंघात सुद्धा लोकसभेत काँग्रेसला चांगली मते मिळाली आहे. त्यामुळे वणीत भाजपसाठी आगामी निवडणूक अटीतटीची समजली जात आहे.

विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेची युती निश्चित मानली जात आहे. त्यामुळे वणी मतदारसंघ भाजपकडे राहणार असल्याचे बोलले जात आहे. तर आघाडीत हा मतदारसंघ काँग्रेसकडे असणार असल्याचे निर्णय अंतिम होण्याचे अंदाज आहे. तर भाजपकडून संजीवरेड्डी बोदकुरवार यांचे नाव चर्चेत आहे, मात्र ऐनवेळी चेहरा बदलण्याचा निर्णय सुद्धा होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे काँग्रेसकडून परंपरागत उमेदवार वामनराव कासावार यांचे नाव निश्चित माणले जात आहे. पण तरीही काँग्रेसकडून नवे चेहरे गुडघ्याला बाशिंग बांधून आहेत हे विशेष.