शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

वणी मतदारसंघात काँग्रेसला मिळालेला जनाधार भाजपसाठी डोकेदुखी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2019 12:01 IST

चारदा खासदार राहिलेले आणि सलग १५ वर्षे निवडून येणारे माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांचा काँग्रेसचे धानोरकर यांनी लोकसभा निवडणुकीत केलेला पराभव म्हणजे, काँग्रेसला मिळालेला जनाधार समजला जात आहे.

मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच मतदारसंघात इच्छुकांची गर्दी पहायला मिळत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील महत्वाचा वणी विधानसभा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात असून, वणीचा गड राखण्यासाठी भाजपला यावेळी मोठी कसरत करावी लागणार आहेत. तर लोकसभा निवडणुकीत याच मतदारसंघातून काँग्रेसला मिळालेला जनाधार भाजपच्या विजयाला अडसर ठरणार असल्याचे बोलले जात आहे.

कोळशाचा काळाबाजार, त्यातील वाहतूक, चोरटी विक्री व एकूणच उलाढालीतील पैसा, यामुळे वणी विधानसभा मतदारसंघ आर्थिकदृष्ट्या भक्कम समजला जातो. त्यामुळे या ठिकाणी आमदार होण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांची संख्या सुद्धा मोठ्याप्रमाणात आहेत. २०१४ मध्ये याच मतदारसंघात भाजपचे विद्यमान संजीवरेड्डी बोदकुरवार यांचा अनपेक्षित विजय झाला होता. मात्र लोकसभा निवडणुकीत वणी मतदारसंघात लोकांनी काँग्रेसला दिलेला पाठींबा, भाजपसाठी डोकेदुखी ठरत आहे.

वणी विधानसभा मतदार संघाचा समावेश असलेल्या चंद्रपूर-आर्णी लोकसभा मतदार संघात नुकत्याच झालेल्या निवडणुकीत बाळू धानोरकर हे राज्यातून काँग्रेसचे एकमेव खासदार निवडून आले आहेत. त्यातच वणी विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमदेवार हंसराज अहिर यांना मोजक्याच मतांची आघाडी मिळाल्याने भाजपसाठी हे आगामी निवडणुकीत धोकादायक ठरू शकते. तर काँग्रेसला मिळालेला जनाधार विधानसभा निवडणुकीत भाजपला अडसर ठरणार असल्याची चर्चा मतदारसंघात पहायला मिळत आहे.

चारदा खासदार राहिलेले आणि सलग १५ वर्षे निवडून येणारे माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांचा काँग्रेसचे धानोरकर यांनी लोकसभा निवडणुकीत केलेला पराभव म्हणजे, काँग्रेसला मिळालेला जनाधार समजला जात आहे. वणी विधानसभा मतदारसंघात सुद्धा लोकसभेत काँग्रेसला चांगली मते मिळाली आहे. त्यामुळे वणीत भाजपसाठी आगामी निवडणूक अटीतटीची समजली जात आहे.

विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेची युती निश्चित मानली जात आहे. त्यामुळे वणी मतदारसंघ भाजपकडे राहणार असल्याचे बोलले जात आहे. तर आघाडीत हा मतदारसंघ काँग्रेसकडे असणार असल्याचे निर्णय अंतिम होण्याचे अंदाज आहे. तर भाजपकडून संजीवरेड्डी बोदकुरवार यांचे नाव चर्चेत आहे, मात्र ऐनवेळी चेहरा बदलण्याचा निर्णय सुद्धा होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे काँग्रेसकडून परंपरागत उमेदवार वामनराव कासावार यांचे नाव निश्चित माणले जात आहे. पण तरीही काँग्रेसकडून नवे चेहरे गुडघ्याला बाशिंग बांधून आहेत हे विशेष.