शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

“भाजपा ४०० काय १०० पारही जाणार नाही, १० वर्षांत पदरी केवळ ठेंगा, विश्वासघात”: प्रणिती शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2024 12:30 IST

Praniti Shinde News: भाजपाच्या विचारसरणीमुळे देश ५० वर्षे मागे गेला आहे, अशी टीका प्रणिती शिंदे यांनी केली आहे.

Praniti Shinde News: मतदान कामावर केले पाहिजे. श्रीरामावर नाही. कर्म महत्वाचे आहे, धर्म नाही. भाजपचा उमेदवार तुमच्याकडे आल्यावर त्याला एकच प्रश्न विचारा, त्यांची बोलती बंद होईल. त्यांना मागील दहा वर्षात भाजपच्या खासदारांनी काय केले? जेव्हा जेव्हा त्यांना कळते की, त्यांची बाजू कमी आहे आणि आपली जास्त आहे. तेव्हा तेव्हा ते जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम करतात. भाजपा ४०० काय १०० पारही जाणार नाही, असा मोठा दावा काँग्रेस नेत्या आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी केला आहे. 

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता प्रचार, सभा, कार्यकर्त्यांचे मेळावे यांना वेग आला आहे. उपस्थितांना संबोधित करताना तसेच मीडियाशी बोलताना प्रणिती शिंदे यांनी भाजपा आणि केंद्र सरकारवर सडकून टीका केली. सोलापूरचे खासदार संसदेत बोलले असते तर आपल्याला पाणी मिळाले असते. त्यामुळे जे खासदार संसदेत बोलणार नसतील तर काय उपयोग? तुमच्यासोबत धोका, विश्वासघात झाला आहे. मागच्या १० वर्षात मतदारांनी भाजपाला भरभरून दिले. मात्र त्यांनी तुम्हाला ठेंगा दिला. भाजपाने तुम्हाला धोका दिला. तुमचा विश्वासघात केला, या शब्दांत प्रणिती शिंदे यांनी हल्लाबोल केला.

भाजपा ४०० काय १०० पारही जाणार नाही

भाजपाने आपल्या देशाला धर्माची आणि जातीची कीड लावली, असा मोठा आरोप करत, गेल्या १० वर्षात सोलापूर लोकसभा मतदारसंघावर खूप मोठा अन्याय झाला आहे. दिल्लीपर्यंत तुमचा आवाज घेऊन जाण्यासाठी ही लढाई लढत आहे. ४०० सोडा, पण १०० पारही जाणार नाहीत. कारण त्यांच्याकडे तसा रिपोर्ट आहे, असा दावा प्रणिती शिंदे यांनी केला आहे. 

दरम्यान, भाजपाच्या विचारसरणीमुळे सोलापूर २० वर्ष मागे गेला आहे, तर आपला देश ५० वर्ष मागे गेला आहे. ते फक्त गाजर दाखवत आहेत. जोपर्यंत काँग्रेस जिवंत आहे. तोपर्यंत आम्ही तुमचा आवाज दाबू देणार नाही. मला फक्त एकदा आशीर्वाद द्या. मी ईडीबिडीला घाबरत नाही, असे प्रणिती शिंदे यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Praniti Shindeप्रणिती शिंदेPraniti Shindeप्रणिती शिंदेcongressकाँग्रेस