शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

'वंचित'ला रोखण्यासाठी काँग्रेसकडे तगडा प्लॅन; दलित नेत्यांची होणार चांदी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2019 14:01 IST

वंचितमध्ये एमआयएम आणि आंबेडकर यांच्यातील जागा वाटपाचा तिढा सुटल्याचे समजते. यावरून वंचित आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी स्वबळावर निवडणूक लढणार असं चित्र आहे. मात्र अशा स्थितीत कुणाच्याच हाती काही लागणार नाही, असंही होण्याची शक्यता आहे.

मुंबई - नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपने शानदार विजय मिळवला. महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीच्या जागा कमी होईल, अशी शक्यता असताना प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेसच्या अपेक्षांना धक्का बसला आहे. लोकसभेप्रमाणेच विधानसभेला देखील प्रकाश आंबेडकर यांचा काँग्रेससोबत आघाडी करण्याचा इरादा दिसत नाही. त्यामुळे काँग्रेसने आंबेडकरांचा प्रभाव कमी करण्यासाठी तगडा प्लॅन बनवला आहे.

लोकसभेची पुनरावृत्ती विधानसभेला होऊ नये, यासाठी महाराष्ट्र काँग्रेसने हालचाली सुरू केल्या होत्या. परंतु, काँग्रेस नेत्यांना आंबेडकरांकडून अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद मिळाला नाही. आंबेडकरांनी काँग्रेसला सुरुवातीला ४० जागांची ऑफर दिली होती. त्याचवेळी राज्यभर इच्छूक उमेदवारांच्या मुलाखतींचा सपाटा सुरूच ठेवला होता. त्यानंतर आंबेडकरांनी काँग्रेसला १४४ जागांची ऑफर दिली. तसेच राष्ट्रवादीची साथ सोडण्याची अट घातली.

आंबेडकरांकडून काँग्रेसला मिळत असलेल्या दुय्यम वागणुकीमुळे काँग्रेस कार्यकर्ते नाराज आहेत. याची दखल काँग्रेस पक्षश्रेष्ठीने घेतल्याचे समजते. तसेच आंबेडकरांची वाट न पाहता, निवडणुकीच्या तयारीला लागा, अशा सूचना नेत्यांना करण्यात आल्या आहेत. त्याचवेळी आंबेडकरांचा प्रभाव कमी करण्यासाठी उपाय योजना करण्यात येणार आहे. राज्यातील स्थानिक नेत्यांनी ठेवलेल्या प्रस्तावानुसार, अल्पसंख्यांक अर्थात मुस्लीम समाजाला किमान २० जागा आणि दलित समाजाला राखीव जागा वगळून अधिक जागा द्याव्या. या व्यूहरचनेतून आंबेडकरांचा प्रभाव कमी करणे शक्य असल्याचे काँग्रेसच्या नेत्यांना वाटते. यामुळे अनेक दलित नेत्यांना उमेदवारीची लॉटरी लागणार हे नक्की.

दुसरीकडे वंचितमध्ये एमआयएम आणि आंबेडकर यांच्यातील जागा वाटपाचा तिढा सुटल्याचे समजते. यावरून वंचित आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी स्वबळावर निवडणूक लढणार असं चित्र आहे. मात्र अशा स्थितीत कुणाच्याच हाती काही लागणार नाही, असंही होण्याची शक्यता आहे. हे रोखण्यासाठी काँग्रेस दलित आणि अल्पसंख्यांक समाजाला वंचित ठेवणार नाही, हे निश्चित.