शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: मुंबई लोकल सेवा बंद, मोटरमनसह रेल्वे कर्मचाऱ्यांचे सीएसएमटी स्थानकात आंदोलन
2
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
3
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
4
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
5
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
6
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
7
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
8
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
9
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
10
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
11
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
12
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
13
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
14
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
15
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
16
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
17
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
18
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
19
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
20
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण

'वंचित'ला रोखण्यासाठी काँग्रेसकडे तगडा प्लॅन; दलित नेत्यांची होणार चांदी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2019 14:01 IST

वंचितमध्ये एमआयएम आणि आंबेडकर यांच्यातील जागा वाटपाचा तिढा सुटल्याचे समजते. यावरून वंचित आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी स्वबळावर निवडणूक लढणार असं चित्र आहे. मात्र अशा स्थितीत कुणाच्याच हाती काही लागणार नाही, असंही होण्याची शक्यता आहे.

मुंबई - नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपने शानदार विजय मिळवला. महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीच्या जागा कमी होईल, अशी शक्यता असताना प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेसच्या अपेक्षांना धक्का बसला आहे. लोकसभेप्रमाणेच विधानसभेला देखील प्रकाश आंबेडकर यांचा काँग्रेससोबत आघाडी करण्याचा इरादा दिसत नाही. त्यामुळे काँग्रेसने आंबेडकरांचा प्रभाव कमी करण्यासाठी तगडा प्लॅन बनवला आहे.

लोकसभेची पुनरावृत्ती विधानसभेला होऊ नये, यासाठी महाराष्ट्र काँग्रेसने हालचाली सुरू केल्या होत्या. परंतु, काँग्रेस नेत्यांना आंबेडकरांकडून अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद मिळाला नाही. आंबेडकरांनी काँग्रेसला सुरुवातीला ४० जागांची ऑफर दिली होती. त्याचवेळी राज्यभर इच्छूक उमेदवारांच्या मुलाखतींचा सपाटा सुरूच ठेवला होता. त्यानंतर आंबेडकरांनी काँग्रेसला १४४ जागांची ऑफर दिली. तसेच राष्ट्रवादीची साथ सोडण्याची अट घातली.

आंबेडकरांकडून काँग्रेसला मिळत असलेल्या दुय्यम वागणुकीमुळे काँग्रेस कार्यकर्ते नाराज आहेत. याची दखल काँग्रेस पक्षश्रेष्ठीने घेतल्याचे समजते. तसेच आंबेडकरांची वाट न पाहता, निवडणुकीच्या तयारीला लागा, अशा सूचना नेत्यांना करण्यात आल्या आहेत. त्याचवेळी आंबेडकरांचा प्रभाव कमी करण्यासाठी उपाय योजना करण्यात येणार आहे. राज्यातील स्थानिक नेत्यांनी ठेवलेल्या प्रस्तावानुसार, अल्पसंख्यांक अर्थात मुस्लीम समाजाला किमान २० जागा आणि दलित समाजाला राखीव जागा वगळून अधिक जागा द्याव्या. या व्यूहरचनेतून आंबेडकरांचा प्रभाव कमी करणे शक्य असल्याचे काँग्रेसच्या नेत्यांना वाटते. यामुळे अनेक दलित नेत्यांना उमेदवारीची लॉटरी लागणार हे नक्की.

दुसरीकडे वंचितमध्ये एमआयएम आणि आंबेडकर यांच्यातील जागा वाटपाचा तिढा सुटल्याचे समजते. यावरून वंचित आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी स्वबळावर निवडणूक लढणार असं चित्र आहे. मात्र अशा स्थितीत कुणाच्याच हाती काही लागणार नाही, असंही होण्याची शक्यता आहे. हे रोखण्यासाठी काँग्रेस दलित आणि अल्पसंख्यांक समाजाला वंचित ठेवणार नाही, हे निश्चित.