शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
5
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
6
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
7
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
8
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
9
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
10
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
11
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
12
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
13
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
14
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
15
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
16
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
17
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
18
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
19
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
20
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!

'वंचित'ला रोखण्यासाठी काँग्रेसकडे तगडा प्लॅन; दलित नेत्यांची होणार चांदी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2019 14:01 IST

वंचितमध्ये एमआयएम आणि आंबेडकर यांच्यातील जागा वाटपाचा तिढा सुटल्याचे समजते. यावरून वंचित आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी स्वबळावर निवडणूक लढणार असं चित्र आहे. मात्र अशा स्थितीत कुणाच्याच हाती काही लागणार नाही, असंही होण्याची शक्यता आहे.

मुंबई - नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपने शानदार विजय मिळवला. महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीच्या जागा कमी होईल, अशी शक्यता असताना प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेसच्या अपेक्षांना धक्का बसला आहे. लोकसभेप्रमाणेच विधानसभेला देखील प्रकाश आंबेडकर यांचा काँग्रेससोबत आघाडी करण्याचा इरादा दिसत नाही. त्यामुळे काँग्रेसने आंबेडकरांचा प्रभाव कमी करण्यासाठी तगडा प्लॅन बनवला आहे.

लोकसभेची पुनरावृत्ती विधानसभेला होऊ नये, यासाठी महाराष्ट्र काँग्रेसने हालचाली सुरू केल्या होत्या. परंतु, काँग्रेस नेत्यांना आंबेडकरांकडून अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद मिळाला नाही. आंबेडकरांनी काँग्रेसला सुरुवातीला ४० जागांची ऑफर दिली होती. त्याचवेळी राज्यभर इच्छूक उमेदवारांच्या मुलाखतींचा सपाटा सुरूच ठेवला होता. त्यानंतर आंबेडकरांनी काँग्रेसला १४४ जागांची ऑफर दिली. तसेच राष्ट्रवादीची साथ सोडण्याची अट घातली.

आंबेडकरांकडून काँग्रेसला मिळत असलेल्या दुय्यम वागणुकीमुळे काँग्रेस कार्यकर्ते नाराज आहेत. याची दखल काँग्रेस पक्षश्रेष्ठीने घेतल्याचे समजते. तसेच आंबेडकरांची वाट न पाहता, निवडणुकीच्या तयारीला लागा, अशा सूचना नेत्यांना करण्यात आल्या आहेत. त्याचवेळी आंबेडकरांचा प्रभाव कमी करण्यासाठी उपाय योजना करण्यात येणार आहे. राज्यातील स्थानिक नेत्यांनी ठेवलेल्या प्रस्तावानुसार, अल्पसंख्यांक अर्थात मुस्लीम समाजाला किमान २० जागा आणि दलित समाजाला राखीव जागा वगळून अधिक जागा द्याव्या. या व्यूहरचनेतून आंबेडकरांचा प्रभाव कमी करणे शक्य असल्याचे काँग्रेसच्या नेत्यांना वाटते. यामुळे अनेक दलित नेत्यांना उमेदवारीची लॉटरी लागणार हे नक्की.

दुसरीकडे वंचितमध्ये एमआयएम आणि आंबेडकर यांच्यातील जागा वाटपाचा तिढा सुटल्याचे समजते. यावरून वंचित आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी स्वबळावर निवडणूक लढणार असं चित्र आहे. मात्र अशा स्थितीत कुणाच्याच हाती काही लागणार नाही, असंही होण्याची शक्यता आहे. हे रोखण्यासाठी काँग्रेस दलित आणि अल्पसंख्यांक समाजाला वंचित ठेवणार नाही, हे निश्चित.