शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमापुर्वी कार्यकर्त्यांची धरपकड : आंदोलनाचे गालबोट  न लागण्याची खबरदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2018 19:17 IST

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतील कार्यक्रमाला आंदोलनाचे गालबोट लागू नये, याची विशेष खबरदारी सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी घेतली असल्याने शनिवारी सकाळपासूनच आंदोलक कार्यक्रर्त्यांच्या घरी पोलीस दाखल झाले.

पिंपरी : नागरिकांच्या विविध प्रश्नांकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधण्यासाठी शहरातील विविध संघटनांनी शनिवारी आंदोलनाचे आयोजन केले होते. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतील कार्यक्रमाला आंदोलनाचे गालबोट लागू नये, याची विशेष खबरदारी सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी घेतली असल्याने शनिवारी सकाळपासूनच आंदोलक कार्यक्रर्त्यांच्या घरी पोलीस दाखल झाले. पोलिसांनी सकाळपासूनच कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केल्याने कार्यकर्त्यांनी संतप्त भावना व्यकत केल्या.                       भारतीय जनता पक्षाच्यावतीने पिंपरी चिंचवडमध्ये प्राधिकरणात शनिवारी अटल संकल्प महासंमेलन आयोजित करण्यात आले असून कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची उपस्थिती असल्याने कार्यकर्त्यांनी नागरिकांच्या प्रश्नाकडे  लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाची तयारी केली होती. आक्रमक पवित्रा न घेता, सनदशीर मार्गाने आंदोलन करणार असल्याचे निवेदन दिले असतानाही शनिवारी सकाळी साडेआठ वाजताच सामाजिक कार्यकर्ते मारूती भापकर यांच्या मोहनननगर येथील घरी पोलीस पोहोचले. ओदांलन करायचे नाही,आपण आपल्या कार्यकर्त्यांनाही निरोप द्या, आमच्याबरोबर पोलीस ठाण्यात चला. असे म्हणत पोलिसांनी भापकर यांना  पोलीस ठाण्यात नेले. कार्यकर्त्यांची अशीच धरपकड थेरगाव, चिंचवड, निगडी येथे केली.                  सत्ताधारी पक्षाची एक प्रकारची आणीबाणी आहे. जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे. गत निवडणुकीत मुख्यमंत्र्यांनी आश्वासने दिली होती, त्या आश्वासनासंबंधीत प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन जाहीर केले होते. या आंदोलनात नागरी हक्क सुरक्षा समिती, स्वराज्य, मनसे, शिवसेना, राष्टÑवादी काँग्रेस, संभाजी ब्रिगेड, समाजवादी पक्ष, भारिप बहुजन महासंघाचे कार्यकर्ते सहभागीग होणार होते. पोलिसांनी २५ हून अधिक कार्यकर्त्यांना आंदोलन न करण्याच्या सूचना दिल्या. 

मूलभूत अधिकारांवर गदा सामाजिक कार्यकेर्त मारूती भापकर म्हणाले, ही एक प्रकारची अघोषित आणीबाणी आहे. नागरिकांच्या मुलभूत अधिकारावर घाला घालण्याचा प्रयत्न आहे. शहरातील नागरिकांचा शास्ती कर माफीचा मुद्दा, रिंग रोड प्रकल्प बाधितांचे पुनर्वसन, रेड झोन हद्द कमी करणे, एसआरए अंतर्गत ५०० चौरसफुटांची घरे, शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव या मुद्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन जाहीर केले होते.  त्याचबरोबर महापालिकेतील गैरव्यवहारास आळा घालण्याची मागणी या उद्देशाने केले जाणारे आंदोलन दडपून टाकण्याचा प्रयत्न झाला. असेच पुढे होत राहिले तर न्यायालयीन लढा लढण्याची तयारी आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाcongressकाँग्रेसArrestअटक