शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
4
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
5
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
6
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
7
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
8
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
9
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
10
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
11
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
12
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
13
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
14
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
15
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
16
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
17
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
18
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
19
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
20
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
Daily Top 2Weekly Top 5

GDP: “PM मोदींची हिटलरशी तुलना चुकीची, तेव्हा जर्मनी एक आर्थिक महासत्ता बनला होता”

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2021 14:00 IST

GDP: काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींची हिटलरशी तुलना करणे चुकीचे आहे. हिटलरच्या काळात जर्मनी एक आर्थिक महासत्ता बनला, अशी खोचक टीका करण्यात आली आहे.

मुंबई: कोरोना संकटाच्या काळात भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसल्याचे पाहायला मिळत आहे. लॉकडाऊन कालावधीत उद्योग, व्यवसाय बंद असल्यामुळे अर्थचक्रावर त्याचा मोठा परिणाम झाल्याचे दिसत आहे. हळूहळू परिस्थिती सुधारताना दिसत आहे. मात्र, कोरोनाची बिकट परिस्थिती आणि अर्थव्यवस्थेवरून केंद्रातील मोदी सरकारवर वारंवार टीका होताना दिसत आहे. आताही काँग्रेसनेपंतप्रधान नरेंद्र मोदींची हिटलरशी तुलना करणे चुकीचे आहे. हिटलरच्या काळात जर्मनी एक आर्थिक महासत्ता बनला, अशी खोचक टीका करण्यात आली आहे. (congress nitin raut criticises pm narendra modi over indian economy and gdp)

 केंद्र सरकारने आर्थिक वर्ष २०२०-२१ वर्षातील जीडीपी नुकतीच जाहीर केली असून, यानुसार भारताचा जीडीपी उणे ७.३ टक्क्यांवर घसरला आहे. गेल्या चार दशकातील ही सर्वात मोठी घट असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या आर्थिक वर्षात ही घट ४ टक्के होती. यावरून काँग्रेस नेते आणि राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी ट्विटरच्या माध्यमातून केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. 

पंतप्रधानांची तुलना हिटलरशी बरोबर नाही

कांही लोक पंतप्रधानांची तंतोतंत तुलना हिटलरशी करतात ते १००% बरोबर नाही. इतर गोष्टी अलाहिदा, हिटलरच्या काळात जर्मनी एक आर्थिक महासत्ता बनला होता हे विसरता येणार नाही, असा खोचक टोला नितीन राऊत यांनी लगावला आहे. 

“पंतप्रधान मोदी आणि जिनपिंग जबाबदार नेते; भारत-चीन प्रश्न सोडवण्यास सक्षम”: पुतिन

...तर देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडेल

रिझर्व्ह बॅंकचे गव्हर्नर किंवा त्यांची संपूर्ण व्यवस्था देशाची अर्थव्यवस्था मोजण्यात अपयशी होत असेल, तर देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडेल. देशाचा जीडीपी ७.५ मायनसमध्ये गेला ही सत्य परिस्थिती आहे. याचा अर्थ रिझर्व्ह बॅंकेकडून आकलन चुकीचे होत आहे. सरकार पैसे मागतेय तर तुम्ही देताय. रिझर्व्ह बॅंकेला हे कळले पाहिजे. तुम्ही अंदाज घेत नाही मग देशाची अर्थव्यवस्था कशी चालणार आहे, असा सवाल राष्ट्रवादी प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला. 

“कोरोना बचावासाठी हवन उपयुक्त; मी रोज करते, तुम्हीही करा”: हेमा मालिनी

दरम्यान, केंद्र किती खरेदी करणार, राज्यांना किती मिळणार आणि खाजगी लोकांना खरेदी करून त्यांनी त्याचा वापर किती करावा याबाबतची स्पष्टता केंद्रसरकारने आजपर्यंत जाहीर केलेली नाही. कधी प्रकाश जावडेकर वेगळे बोलतात, तर कधी जे. पी. नड्डा वेगळी घोषणा करतात. फक्त वेगवेगळ्या हेडलाईन होण्यासाठी हे लोक बोलत असल्याचा आरोप करत १२ कोटी लस पुरवठा जूनपर्यंत होणार होता मात्र आतापर्यंत किती पुरवठा झाला. कालपर्यंत लसीकरण केंद्रे बंद होती. जी सत्यता आहे ती स्वीकारली पाहिजे आणि त्यानुसार कार्यक्रम बनवून देशासमोर ठेवावा, अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे. 

टॅग्स :Economyअर्थव्यवस्थाcongressकाँग्रेसCentral Governmentकेंद्र सरकारprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीNitin Rautनितीन राऊतPoliticsराजकारण