शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
2
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
3
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
4
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
5
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
6
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
7
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
8
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
9
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
10
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
11
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
12
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
13
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
14
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
15
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
16
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
17
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
18
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
19
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
20
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?

GDP: “PM मोदींची हिटलरशी तुलना चुकीची, तेव्हा जर्मनी एक आर्थिक महासत्ता बनला होता”

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2021 14:00 IST

GDP: काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींची हिटलरशी तुलना करणे चुकीचे आहे. हिटलरच्या काळात जर्मनी एक आर्थिक महासत्ता बनला, अशी खोचक टीका करण्यात आली आहे.

मुंबई: कोरोना संकटाच्या काळात भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसल्याचे पाहायला मिळत आहे. लॉकडाऊन कालावधीत उद्योग, व्यवसाय बंद असल्यामुळे अर्थचक्रावर त्याचा मोठा परिणाम झाल्याचे दिसत आहे. हळूहळू परिस्थिती सुधारताना दिसत आहे. मात्र, कोरोनाची बिकट परिस्थिती आणि अर्थव्यवस्थेवरून केंद्रातील मोदी सरकारवर वारंवार टीका होताना दिसत आहे. आताही काँग्रेसनेपंतप्रधान नरेंद्र मोदींची हिटलरशी तुलना करणे चुकीचे आहे. हिटलरच्या काळात जर्मनी एक आर्थिक महासत्ता बनला, अशी खोचक टीका करण्यात आली आहे. (congress nitin raut criticises pm narendra modi over indian economy and gdp)

 केंद्र सरकारने आर्थिक वर्ष २०२०-२१ वर्षातील जीडीपी नुकतीच जाहीर केली असून, यानुसार भारताचा जीडीपी उणे ७.३ टक्क्यांवर घसरला आहे. गेल्या चार दशकातील ही सर्वात मोठी घट असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या आर्थिक वर्षात ही घट ४ टक्के होती. यावरून काँग्रेस नेते आणि राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी ट्विटरच्या माध्यमातून केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. 

पंतप्रधानांची तुलना हिटलरशी बरोबर नाही

कांही लोक पंतप्रधानांची तंतोतंत तुलना हिटलरशी करतात ते १००% बरोबर नाही. इतर गोष्टी अलाहिदा, हिटलरच्या काळात जर्मनी एक आर्थिक महासत्ता बनला होता हे विसरता येणार नाही, असा खोचक टोला नितीन राऊत यांनी लगावला आहे. 

“पंतप्रधान मोदी आणि जिनपिंग जबाबदार नेते; भारत-चीन प्रश्न सोडवण्यास सक्षम”: पुतिन

...तर देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडेल

रिझर्व्ह बॅंकचे गव्हर्नर किंवा त्यांची संपूर्ण व्यवस्था देशाची अर्थव्यवस्था मोजण्यात अपयशी होत असेल, तर देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडेल. देशाचा जीडीपी ७.५ मायनसमध्ये गेला ही सत्य परिस्थिती आहे. याचा अर्थ रिझर्व्ह बॅंकेकडून आकलन चुकीचे होत आहे. सरकार पैसे मागतेय तर तुम्ही देताय. रिझर्व्ह बॅंकेला हे कळले पाहिजे. तुम्ही अंदाज घेत नाही मग देशाची अर्थव्यवस्था कशी चालणार आहे, असा सवाल राष्ट्रवादी प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला. 

“कोरोना बचावासाठी हवन उपयुक्त; मी रोज करते, तुम्हीही करा”: हेमा मालिनी

दरम्यान, केंद्र किती खरेदी करणार, राज्यांना किती मिळणार आणि खाजगी लोकांना खरेदी करून त्यांनी त्याचा वापर किती करावा याबाबतची स्पष्टता केंद्रसरकारने आजपर्यंत जाहीर केलेली नाही. कधी प्रकाश जावडेकर वेगळे बोलतात, तर कधी जे. पी. नड्डा वेगळी घोषणा करतात. फक्त वेगवेगळ्या हेडलाईन होण्यासाठी हे लोक बोलत असल्याचा आरोप करत १२ कोटी लस पुरवठा जूनपर्यंत होणार होता मात्र आतापर्यंत किती पुरवठा झाला. कालपर्यंत लसीकरण केंद्रे बंद होती. जी सत्यता आहे ती स्वीकारली पाहिजे आणि त्यानुसार कार्यक्रम बनवून देशासमोर ठेवावा, अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे. 

टॅग्स :Economyअर्थव्यवस्थाcongressकाँग्रेसCentral Governmentकेंद्र सरकारprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीNitin Rautनितीन राऊतPoliticsराजकारण