शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
2
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
6
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
7
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
8
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
9
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
10
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
11
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
12
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
13
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
14
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
15
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
16
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
17
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
18
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
19
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
20
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार

काँग्रेस-राष्ट्रवादीला विरोधाचा सूर सापडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2018 05:12 IST

राज्यातील भाजपा-शिवसेना सरकारला चार वर्ष पूर्ण होत असताना काँग्रेस, राष्ट्रवादीला सरकार विरोधी सूर सापडला आहे.

- अतुल कुलकर्णी मुंबई : राज्यातील भाजपा-शिवसेना सरकारला चार वर्ष पूर्ण होत असताना काँग्रेस, राष्ट्रवादीला सरकार विरोधी सूर सापडला आहे. काँग्रेसने संघर्ष यात्रा काढून राज्यभर विरोधी वातावरण तयार करण्यास सुरुवात केली तर राष्ट्रवादीने हल्लाबोल यात्रा काढून सरकारच्या अपयशाचा पाढा वाचला आहे.विरोधी पक्ष आहे कुठे आहे, असा प्रश्न गेली चार वर्ष विचारला जात होता. तर दुसरीकडे सत्तेत सहभागी असून देखील शिवसेना नेते विरोधकांची भूमिका बजावत होते. मात्र जशा निवडणुका जवळ येऊ लागल्या तसे दोन्ही काँग्रेसने आपापसातील मतभेद विसरुन एकत्र येण्याची भूमिका घेतली आहे. राष्टÑवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी तर आमचे लोकसभेच्या ४२ जागांवर एकमत झाले आहे, असेही जाहीर करुन टाकले आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना सतत पाण्यात पाहणारे राष्टÑवादीचे नेते आता त्यांच्या शेजारी बसून राज्यातील विरोधी पक्षाची रणनिती ठरवू लागले आहेत. राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रू नसतो असे सांगून अजित पवार यांनी त्या वादावर पडदा टाकला.राष्टÑवादी काँग्रेस पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारलेल्या ५६ प्रश्नांचे किंवा काँग्रेसने तूरदाळीवरुन उपस्थित केलेल्या प्रश्नांचे समाधानकारक उत्तर भाजपाने दिले नाही. विरोधकांच्या एकीमुळे शिवसेनेला जवळ करण्याची भूमिका भाजपाने घेतली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे रोज सरकारवर टिकेची झोड उठवत असताना भाजपामधील एकही नेता शिवसेनेविरुद्ध ब्र काढायला तयार नाही. यातूनच भाजपाची अगतिकता दिसून येते.चव्हाणांचा पुढाकारविधानसभेतील विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे यांनी सरकारबाबत नरमाईची भूमिका घेतल्याची टीका झाली. मात्र गेल्या काही दिवसांपासून खा. अशोक चव्हाण यांनी राज्यात सरकार विरोधी वातावरण तयार करण्यात आघाडी घेतली. सरकारविरोधी वातावरण होऊ शकते असे दिसू लागताच विरोधक आक्रमक झाल्याचे दिसते.

टॅग्स :congressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा