शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
2
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
3
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
5
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
6
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
7
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
9
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
10
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
11
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
12
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
13
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
14
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
15
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
16
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
17
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
18
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
19
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
20
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा

काँग्रेस-राष्ट्रवादीला विरोधाचा सूर सापडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2018 05:12 IST

राज्यातील भाजपा-शिवसेना सरकारला चार वर्ष पूर्ण होत असताना काँग्रेस, राष्ट्रवादीला सरकार विरोधी सूर सापडला आहे.

- अतुल कुलकर्णी मुंबई : राज्यातील भाजपा-शिवसेना सरकारला चार वर्ष पूर्ण होत असताना काँग्रेस, राष्ट्रवादीला सरकार विरोधी सूर सापडला आहे. काँग्रेसने संघर्ष यात्रा काढून राज्यभर विरोधी वातावरण तयार करण्यास सुरुवात केली तर राष्ट्रवादीने हल्लाबोल यात्रा काढून सरकारच्या अपयशाचा पाढा वाचला आहे.विरोधी पक्ष आहे कुठे आहे, असा प्रश्न गेली चार वर्ष विचारला जात होता. तर दुसरीकडे सत्तेत सहभागी असून देखील शिवसेना नेते विरोधकांची भूमिका बजावत होते. मात्र जशा निवडणुका जवळ येऊ लागल्या तसे दोन्ही काँग्रेसने आपापसातील मतभेद विसरुन एकत्र येण्याची भूमिका घेतली आहे. राष्टÑवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी तर आमचे लोकसभेच्या ४२ जागांवर एकमत झाले आहे, असेही जाहीर करुन टाकले आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना सतत पाण्यात पाहणारे राष्टÑवादीचे नेते आता त्यांच्या शेजारी बसून राज्यातील विरोधी पक्षाची रणनिती ठरवू लागले आहेत. राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रू नसतो असे सांगून अजित पवार यांनी त्या वादावर पडदा टाकला.राष्टÑवादी काँग्रेस पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारलेल्या ५६ प्रश्नांचे किंवा काँग्रेसने तूरदाळीवरुन उपस्थित केलेल्या प्रश्नांचे समाधानकारक उत्तर भाजपाने दिले नाही. विरोधकांच्या एकीमुळे शिवसेनेला जवळ करण्याची भूमिका भाजपाने घेतली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे रोज सरकारवर टिकेची झोड उठवत असताना भाजपामधील एकही नेता शिवसेनेविरुद्ध ब्र काढायला तयार नाही. यातूनच भाजपाची अगतिकता दिसून येते.चव्हाणांचा पुढाकारविधानसभेतील विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे यांनी सरकारबाबत नरमाईची भूमिका घेतल्याची टीका झाली. मात्र गेल्या काही दिवसांपासून खा. अशोक चव्हाण यांनी राज्यात सरकार विरोधी वातावरण तयार करण्यात आघाडी घेतली. सरकारविरोधी वातावरण होऊ शकते असे दिसू लागताच विरोधक आक्रमक झाल्याचे दिसते.

टॅग्स :congressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा