शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
2
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
3
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
4
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
5
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
6
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
7
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
8
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
9
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
10
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
11
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
12
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
13
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!
14
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड
15
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
16
IND vs PAK: भारत- पाकिस्तान यांच्यातील ५ टी-२० सामन्यांचा रेकॉर्ड, कुणाचं पारडं जड?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
18
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
19
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
20
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...

‘सन्मानजनक आघाडीसाठी काँग्रेस आग्रही; ५०-५० टक्क्यांचा फॉर्म्युला नाही’  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2018 08:08 IST

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या तयारीसाठी मंगळवारी केंद्रीय सरचिटणीस आणि प्रदेश प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या काँग्रेस नेत्यांच्या बैठकीत राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्याबाबत सकारात्मक सूर आळविला गेला.

मुंबई - लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या तयारीसाठी मंगळवारी केंद्रीय सरचिटणीस आणि प्रदेश प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या काँग्रेस नेत्यांच्या बैठकीत राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्याबाबत सकारात्मक सूर आळविला गेला. मात्र, ही आघाडी सन्मानजनकच असायला हवी अशी भावनाही व्यक्त करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसकडून जागांबाबत ५०-५० टक्क्यांचा कोणताही फॉर्म्युला आलेला नाही, असे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले.मुंबईतील टिळक भवन येथे काँग्रेस नेत्यांची बैठक पार पडली. येत्या काळात सर्वच नेत्यांनी आपला अहंकार बाजूला ठेवत निवडणुका लढवायला हव्यात, समविचारी पक्षांनी एकत्र निवडणुका लढविताना वातावरण बिघडणार नाही याची काळजी घ्यायला हवी. कर्नाटकमध्ये भाजपाला दूर ठेवण्यासाठी छोट्या पक्षाला संधी दिली. विचारधारेच्या लढाईसाठी काँग्रेसने हा त्याग केला आहे. असा त्याग करण्याची तयारी सर्वांनी ठेवायला हवी, असे मल्लिकार्जुन खर्गे यांनी बैठकीच्या समारोपाप्रसंगी सांगितले.बैठकीला प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील-निलंगेकर, पृथ्वीराज चव्हाण, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, माजी राज्यसभा सदस्य विजय दर्डा, माजी मंत्री राजेंद्र दर्डा, बाळासाहेब थोरात यांच्यासह सर्व काँग्रेस नेते, प्रदेश पदाधिकारी आदी उपस्थित होते.सरकारविरोधात राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रेची घोषणा काँग्रेसने केली आहे. ३१ आॅगस्टला कोल्हापूरपासून यात्रा सुरू होईल. ती यशस्वी करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. केंद्र, राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपाला विविध मुद्द्यांवर घेरण्याची तयारी काँग्रेसने चालविली आहे. स्वत: पक्षाध्यक्ष राहुल गांधी सातत्याने भाजपाला लक्ष्य करतात. त्यामुळे जनसंघर्ष यात्रा आणि पुढील काळात पक्षाच्या केंद्रीय, प्रदेश स्तरावरून भाजपाला घेरण्याच्या रणनीतीवर, कोणी कोणता मुद्दा उचलावा आदींबाबत बैठकीत चर्चा झाली.

आमचा पंतप्रधान व्हावा - मल्लिकार्जुन खर्गेनिवडणुकीनंतर ज्यांच्या जागा अधिक, त्यांचा पंतप्रधान होईल, असे विधान शरद पवार यांनी केले असले तरी हा त्यांचा विचार आहे. काँग्रेसचा सरचिटणीस म्हणून आमच्या जागा जास्त येऊन राहुल गांधी पंतप्रधान व्हावेत ही आमची इच्छा आहे. त्यासाठी आम्ही मेहनत घेतोय. आगामी निवडणूक ही विचारधारेची लढाई आहे. नरेंद्र मोदी संघाची विचारधारा राबवित असून ही विचारधारा देशासाठी घातक आहे, असे खा. खर्गे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.राष्ट्रवादीकडून फॉर्म्युला नाहीराष्ट्रवादीकडून आघाडीबाबत ५०-५० टक्केचा फॉर्म्युला दिल्याची दिवसभर चर्चा होती. मात्र असा प्रस्ताव आला नाही. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्वत: आपल्याला फोन करून याबाबतच्या बातम्या निराधार असल्याचे म्हटले आहे, असे खा. अशोक चव्हाण यांनी सांगितले.

टॅग्स :Politicsराजकारणcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस