शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
11
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
12
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
13
मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांचे संघस्थानी नमन, अजित पवार गटासह काही आमदार-मंत्र्यांची मात्र दांडी
14
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
15
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
16
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
17
काँग्रेसचं पुनरागमन, भाजपाचा चंचुप्रवेश आणि डाव्यांना धक्का, केरळमधील राजकीय हवा बदलतेय?
18
'या' छोट्या देशाचा चीन-भारतासारख्या बलाढ्या देशांना धोबीपछाड! फंड उभारण्यात आशियात १ नंबरला
19
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
Daily Top 2Weekly Top 5

"ठाकरेंच्या शिवसेनेला कमकुवत करण्याचे काँग्रेस-राष्ट्रवादीचे षडयंत्र"

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2024 17:46 IST

Sanjay Nirupam Uddhav Thackeray : शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला कमकुवत करण्याचे षडयंत्र असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांनी केला.

Sanjay Nirupam on Maha Vikas Aghadi : सांगलीमध्ये पतंगराव कदम यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण राहुल गांधी यांच्या उपस्थित करण्यात आले. या कार्यक्रमाला शरद पवारही उपस्थित होते. पण, उद्धव ठाकरे नव्हते. यावर बोट ठेवत माजी खासदार आणि शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांनी टीका केली. विधानसभा निवडणुकीत तिन्ही पक्ष एकमेकांच्या जागा पाडण्यात कोणतीही कसर ठेवणार नाही, असे निरुपम म्हणाले.  

एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना माजी खासदार संजय निरुपम म्हणाले, "एक गोष्ट तर स्पष्ट झाली आहे की, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने मिळून उद्धव ठाकरेंना सांगलीतून हद्दपार केले. लोकसभा निवडणुकीवेळी सांगलीमध्ये जे झाले, ते संपूर्ण देशाने बघितले आहे." 

सांगलीत शिवसेनेचे डिपॉझिट जप्त झाले 

"शिवसेनेकडे उमेदवार नव्हता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या त्या जिल्ह्यातील प्रमुख नेत्याने, त्याचा वसंतदादा पाटलांच्या कुटुंबासोबत वाद आहे म्हणून त्यांनी त्यांचा एक उमेदवार उद्धव ठाकरेंकडे पाठवला. तुम्ही याच्या आधारावर जागेवर दावा करा आणि भांडा. का तर ही जागा काँग्रेसकडे जाऊ नये. शेवटी उद्धव ठाकरे-शरद पवारांनी असे षडयंत्र रचले की, सांगलीची जागा काँग्रेसला मिळाली नाही आणि काँग्रेसने आपला अपक्ष उमेदवार उभा केला. त्यानंतर उबाठा (शिवसेना) पराभूत झाली. डिपॉझिट जप्त झाले", असे म्हणत निरुपमांनी ठाकरेंना डिवचले.  

"आज काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) दोन्ही सांगलीच्या कार्यक्रमात एकत्र आहेत. शिवसेना नाहीये. का, तर शिवसेना उबाठाला कमकुवत करण्याचे या दोन्ही पक्षांचे षडयंत्र आहे. आज सांगलीतून हद्दपार झाले आहेत. उद्या हे दोन्ही पक्ष उद्धव ठाकरेंना महाराष्ट्रातून हद्दपार करतील. कारण मुख्यमंत्रि‍पदाच्या चेहऱ्यावरून जो वाद झाला, तो आपण सगळ्यांनी बघितला आहे",  असे म्हणत निरुपम यांनी मविआला लक्ष्य केले.

ती मतभेद विकास आघाडी झालीये

"ते (उद्धव ठाकरे) भरसभेत म्हणाले की, नाव जाहीर करा. आणि शरद पवारांनी सांगितले की, जोपर्यंत निकाल येत नाही, तोपर्यंत निर्णय घेणे अवघड आहे. म्हणजे ज्याची जास्त संख्या, त्याचा मुख्यमंत्री असेल. याच्याकडे (उद्धव ठाकरे) इतकी संख्या असेल किंवा नाही, हे भविष्यात कळेल. पण, मतभेद विकास आघाडीमध्ये ज्या पद्धतीने मतभेद सुरू आहेत, ते जागावाटपावेळी जास्त वाढतील. निवडणुकीच्या काळात दुसऱ्याच्या जागा पाडण्यात कोणतीही कसर सोडणार नाही, असे दिसत आहे", असे निरुपम म्हणाले. 

टॅग्स :Sanjay Nirupamसंजय निरुपमUddhav Thackerayउद्धव ठाकरेSharad Pawarशरद पवारNana Patoleनाना पटोलेMahavikas Aghadiमहाविकास आघाडीPoliticsराजकारण