शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

“हायकोर्टाचे निर्देश पाळावे, सरकारने तातडीने दुष्काळ जाहीर करावा”; नाना पटोलेंची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2023 20:25 IST

Congress Nana Patole: सोनिया गांधी व राहुल गांधी यांचा भाजप सरकारने केलेला अपमान काँग्रेस कार्यकर्ता कदापी विसरणार नाही, अशी टीका नाना पटोलेंनी केली.

Congress Nana Patole: राज्यातील अनेक भागात शेतीची अत्यंत वाईट अवस्था झालेली आहे. कमी पाऊस पडल्याने मराठवाड्यात दुष्काळाची स्थिती आहे. मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये चारपट वाढ झाली आहे. जायकवाडी धरणात केवळ ४० टक्के पाणीसाठा आहे, धरणाच्या वरच्या भागातील धरणातून जायकवाडीत पाणी सोडण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत त्याचे सरकारने पालन करावे तसेच मराठवाड्यातील परिस्थिती पाहता राज्य सरकारने तातडीने दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची मराठवाडा विभागाची आढावा छत्रपती संभाजीनगर येथे पार पडली. यावेळी छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर नांदेड, हिंगोली, परभणी धाराशिव, बीड या जिल्ह्यांचा आढावा घेण्यात आला. प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, सात तारखेपासून विभागानिहाय आढावा बैठका सुरु आहेत. आज मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांचा आढावा घेण्यात आला. उदयपूर शिबिरातील बैठकीत घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी झालेली आहे की नाही त्याचा आढावा घेतला जात आहे. संघटनात्मक बांधणी मजबूत करून प्रत्येक घटकापर्यंत काँग्रेस विचार पोहचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, असे नाना पटोले यांनी सांगितले.

जातनिहाय जनगणना करण्याची भूमिका

काँग्रेस पक्षाने जातनिहाय जनगणना करण्याची भूमिका घेतलेली आहे. उदयपूर शिबिरातही काँग्रेसने यासंदर्भात निर्णय घेतला होता. आरक्षणाच्या प्रश्नावरून दोन समाजात वाद होताना दिसत आहेत. २०१४ मध्ये भाजपाने मराठा, धनगर, गोवारी, ठाकूर समाजाच्या लोकांना आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते पण देशात व राज्यात भाजपाचे सरकार आले पण त्यांनी आरक्षण त्यांनी दिले नाही. २०२१ साली जनगणना होणे अपेक्षित होते पण ती आजपर्यंत झालेली नाही, भाजप मुद्दाम जनगणना करत नाही. संभाजी नगरमधील घाटी रुग्णालय, नांदेड, नागपूर येथील शासकीय रुग्णालयात औषधे मिळाली नाहीत म्हणून लोकांचे मृत्यू झाले. उच्च न्यायालयानेही सरकारवर याप्रश्नी कडक तोशेरे ओढले पण भाजपचे आंधळे, बहिरे सरकार त्याकडे लक्ष देत नाही, अशी टीका नाना पटोले यांनी केली. 

दरम्यान, केंद्रातील भाजपाचे सरकार विरोधी पक्षाला वाईट वागणूक देत आहे. दडपशाही व दहशत निर्माण करत आहे. केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग करत आहे. सोनिया गांधी व राहुल गांधी यांनाही भाजप सरकारने चौकशीच्या नावाखाली अत्यंत वाईट वागणूक दिली. सोनिया गांधी आजारी असतानाही भाजपा सरकारने त्यांना ईडीच्या कार्यालयात बोलावून चौकशीच्या नावाखाली त्रास दिला. सोनिया गांधी व राहुल गांधी यांचा भाजप सरकारने केलेला हा अपमान काँग्रेस कार्यकर्ता कदापी विसरणार नाही. 

 

टॅग्स :congressकाँग्रेसNana Patoleनाना पटोलेNana Patoleनाना पटोले