शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

Rajya Sabha Election 2022: “काँग्रेसला चूक दाखवायची परंपरा सुरु आहे, मॅजिक फिगर येऊ दे मग...”; पटोलेंचे राऊतांना प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2022 16:10 IST

देशाची एकात्मता आणि त्या विचाराला, भाषेला मानणारा उमेदवार हायकमांडने दिल्याचे नाना पटोले यांनी म्हटले आहे.

मुंबई: आताच्या घडीला राज्यसभा (Rajya Sabha Election 2022) निवडणुकीवरून देशातील राजकारण तापल्याचे दिसत आहे. अनेक नेते राज्यसभा निवडणुकीकडे डोळे लावून बसले होते. मात्र, काहींच्या पदरी निराशा पडल्याचे दिसत आहे. काँग्रेसमधून अशा पद्धतीचे सूर उमटू लागल्याचे सांगितले जात आहे. राज्यातही राज्यसभा निवडणुकीवरून कलगीतुरा रंगत असल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी काँग्रेसवर केलेल्या टीकेचा महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी समाचार घेतला आहे. 

राज्यसभेच्या जागेसाठी काँग्रेसने अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष इम्रान प्रतापगढी यांना उमेदवारी जाहीर केल्याने राज्यातील पक्षाच्या नेत्यांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. संजय राऊत यांनी यावर भाष्य करत, स्थानिक उमेदवार दिला असता तर काँग्रेसला अधिक बळकटी मिळाली असती, असे स्पष्ट मत मांडले. काँग्रेसची चूक नसेल तरी चूक दाखवण्याची परंपरा सध्या सुरु आहे, अशा शब्दांत नाना पटोले यांनी टीकाकारांना उत्तर दिले आहे.

मॅजिक फिगर एकदा लोकांसमोर येऊ दे

केंद्रातील कमकुवत सरकारने आठ वर्षांत देशाची वाट लावली असून, त्या सगळ्या गोष्टी लपवण्यासाठी काँग्रेसच्या निर्णयावर कुरघोडी करण्याचा जो प्रयत्न आहे, त्यातील ही एक मानसिकता आहे. आमचे काँग्रेसचे उमेदवार इम्रान प्रतापगढी यांनी मराठीत शपथ घेतली आहे. त्यामुळे देशाची एकात्मता आणि त्या विचाराला, भाषेला मानणारा उमेदवार हायकमांडने दिला. निवडणुकीला काही जास्त दिवस राहिलेले नाहीत. महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर दिवसाही स्वप्न पाहणारे विरोधक आम्ही पाहिले आहेत. प्रत्येक १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला झेंडा फडकवण्याचे त्यांचे स्वप्न या राज्याच्या जनतेला माहिती आहे. या निवडणुकीत मतदान उघडपणे होते त्यामुळे ते दावा करत असलेली मॅजिक फिगर एकदा लोकांसमोर येऊ दे, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे. राज्यसभेच्या निवडणुका बिनविरोध होतात, पण विरोधकांचा काही दावा असेल तर त्यावर काही बोलायचे नाही, असे नाना पटोले म्हणाले.

दरम्यान, नगमा आणि पवन खेरा यांनी आपली १८ वर्षांची तपस्या कमी पडल्याचे सांगत नाराजी जाहीर केल्याबद्दल विचारले असता ते म्हणाले की, मी श्रेष्ठ आहे असे मत मांडण्याचा सर्वांना अधिकार आहे, ते त्यांनी मांडले असेल. व्यक्तिगत मत मांडण्याचा अधिकार सर्वांना आहे. काँग्रेसमध्ये लोकशाही आहे, असा टोला पटोलेंनी लगावला आहे.  

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाNana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेस