शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

“बदलापूरची शाळा RSS विचारांची, CCTV फुटेज गायब, पोलिसांवर दबाव”; नाना पटोलेंचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2024 15:25 IST

Congress Nana Patole News: बदलापूरची शाळा भाजपा आणि आरएसएसच्या विचारांची आहे. सरकार या विषयाचे राजकारण करत आहे, अशी टीका नाना पटोलेंनी केली.

Congress Nana Patole News: बदलापूरच्या शाळेतील घटनेनंतर आता राज्य सरकार अॅक्शन मोडवर आले आहे. शाळांमधील मुलामुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अनेक उपाययोजना करणारा आदेश शालेय शिक्षण विभागाने काढला. या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला २६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणावरून महाविकास आघाडीतील नेते महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल करत आहेत. यातच बदलापूरची शाळा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांची आहे. त्यामुळे पोलिसांवर दबाव आणला जात आहे, असा मोठा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. 

मीडियाशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, पोलीस कारवाई करत नाही, आरोपी पकडत नाही म्हणून जनआंदोलन निर्माण झाले. हा राजकारणाचा विषय नाही. सरकार या विषयाचे राजकारण करत आहे. महाराष्ट्र हा गुजरात धार्जिणा करण्याचा सत्ताधाऱ्यांकडून प्रयत्न सुरु आहे. बदलापूरची शाळा भाजपा आणि आरएसएसच्या विचारांची असल्याने पोलिसांवर दबाव आहे. शाळेतील सीसीटीव्ही फुटेज गायब करण्यात आले आहेत, असा गंभीर आरोप नाना पटोले यांनी यावेळी बोलताना केला.

दहा वर्षात सुमारे २२ हजार अत्याचाराच्या घटना

राज्यात २०१४ ते २०२४ या दहा वर्षात सुमारे २२ हजार अत्याचाराच्या घटना असल्याचा दावा करत, नाना पटोले यांनी लाडकी बहीण योजनेवरून सरकारवर निशाणा साधला. लाडकी बहीण योजनेच्या प्रचारासाठी चारशे कोटीहून अधिक निधीची उधळपट्टी करण्यात आली आहे. लोकांनी सांगितले की, तुमचे दीड हजार नको आमच्या मुली सुरक्षित हव्या आहेत. महाराष्ट्रातील सरकार असंविधानिक आहे. सरकारमधले तिघे तिजोरी पोखरत आहेत, अशी टीका नाना पटोलेंनी केली. 

दरम्यान, बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून येत्या २४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. अत्याचाराच्या घटनेने महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळीमा फासली गेली आहे. या प्रकरणी महाभ्रष्ट युती सरकारविरोधात जनतेने मोठ्या संख्येने या बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

टॅग्स :badlapurबदलापूरNana Patoleनाना पटोलेNana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेस