शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसचे १५ खासदार विकले गेले, मुख्यमंत्री रेड्डींच्या आदेशामुळे भाजपच्या उमेदवाराला केले मतदान"; कोणत्या आमदाराने केला गौप्यस्फोट?
2
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
3
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
4
Janta Darshan: किडनी, हृदय रुग्णांना मोठा दिलासा; उपचाराचा खर्च उचलणार योगी सरकार!
5
शेअर बाजारात पुन्हा तेजी, सेन्सेक्स २०४ अंकांनी वधारला; Nifty २५,३०० च्या जवळ, 'हे' स्टॉक्स वधारले
6
नक्षलवादी संघटनांकडून केंद्र सरकारला शांततेचा प्रस्ताव; १ महिना सशस्त्र संघर्ष विरामाची मागणी
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्सवर सूट, ITC वर कठोर भूमिका; पाहा २२ सप्टेंबरपासून काय-काय बदलणार?
8
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
9
केवळ संशयामुळे लाेकांची झडती घेता येणार नाही, अपवादात्मक परिस्थितीत लेखी कारणे बंधनकारक : कोर्ट
10
सोशल मीडियावर ‘फोटो एडिट’ ॲपची धूम; सुरक्षित ठेवा तुमचे फोटो, फसवणूक वाढली
11
मुलाच्या वाढदिवसादिवशी पोहोचलं वडिलांचं शेवटचं गिफ्ट, कुटुंबीयांना झाले अश्रू अनावर
12
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार!
13
"इथं काम करणं आता कठीण..."; रस्त्यांवरील खड्डे अन् वाहतूक कोंडीमुळे बंगळुरूतील कंपनी शिफ्ट होणार
14
Crime: "माझ्या बहिणीपासून दूर राहा", वारंवार समजावूनही मित्र ऐकत नव्हता; मग...
15
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
16
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
17
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
18
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
19
परशुराम महामंडळाच्या अध्यक्षांना दिला मंत्रिदर्जा; अजित पवार गटाचे आशिष दामले आहेत अध्यक्ष
20
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल

'भाजप देशाला गुलामगिरीत घेऊन जातोय', नागपूरच्या सभेतून राहुल गांधींचा BJP-RSS वर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2023 17:48 IST

'भाजपची विचारधारा राजेशाही आहे. काँग्रेसमध्ये प्रत्येकाला बोलण्याचे स्वातंत्र्य, आमच्या पक्षात लोकशाही आहे.'

नागपूर: काँग्रेसच्या 139व्या स्थापना दिनानिमित्त पक्षाने RSS चा बालेकिल्ला असलेल्या नागपुरात भव्य सभा घेतली. 'तयार हैं हम' या टॅग लाईन खाली घेण्यात आलेल्या या सभेतून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार हल्लाबोल केला. 'भाजप देशाला पुन्हा गुलामीच्या दिशेने घेऊन जातोय', अशी टीका राहुल गांधी यांनी केली.

आज सर्व संस्थांवर भाजपचा ताबा

यावेळी सभेला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले, 'आज देशात दोन विचारधारांमध्ये लढा सुरू आहे. भाजपची विचारधारा राजेशाही आहे. त्यांच्याकडे वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करावे लागते. पण काँग्रेसमध्ये प्रत्येकाला बोलण्याचे स्वातंत्र्य आहे, आमच्या पक्षात लोकशाही आहे. आमचा विश्वास आहे की, सत्तेची लगाम देशातील नागरिकांच्या हातात असावी. पण, आज सर्वच संस्थेवर भाजपचा ताबा आहे. सर्व कुलगुरू एकाच संस्थेचे आहेत. कुलगुरू गुणवत्तेच्या आधारावर बनवले जात नाहीत. मोदी सरकारमध्ये गेल्या 10 वर्षात किती लोकांना नोकऱ्या मिळाल्या. गेल्या 40 वर्षांतील बेरोजगारी आज सर्वाधिक आहे. भारतातील करोडो तरुणांची शक्ती वाया जात आहे. देशाची संपूर्ण संपत्ती दोन-तीन लोकांच्या हातात आहे.'

RSS संविधानविरोधी आहे

राहुल गांधी पुढे म्हणतात, 'लोक म्हणतात काँग्रेस ने काय केलं? स्वातंत्र्यापूर्वी देशामध्ये 500 ते 600 राजे होते, इंग्रज होते. देशातील लोकांना कुठलाच अधिकार नव्हता, गरीब व्यक्तीची जमीन आवडली तर राजा घेत होता. ब्रिटिशांच्या काळात काँग्रेस गरीबांसाठी लढली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जनतेला अधिकार दिले, या देशामध्ये लोकशाही व्यवस्था प्रस्थापित केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक संविधानविरोधी आहेत. तिरंग्याला सलामी देत नव्हते, मात्र आपल्याला सर्व अधिकार संविधानाच्या माध्यमातून मिळाले. आरएसएसची विचारधारा देशाला पुन्हा गुलामीत घेऊन जाण्याची आहे. देशातील जनतेला शक्ती देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय.'

...तर स्वतःला ओबीसी कसे म्हणता?

'देशाचे पंतप्रधान मोदी भाषण करताना आपण ओबीसी असल्याचे सांगतात, पण ओबीसी नेत्यांना मात्र भाजपमध्ये मोठे पद नाही.मी लोकसभेत म्हटले होते की, देश 90 आयएएस अधिकारी चालवतात. यातील किती ओबीसी किंवा आदिवासी आहेत? असे विचारल्यावर भाजपवाले गप्प झाले. 90 अधिकाऱ्यांपैकी केवळ 3 ओबीसी आहेत, प्रत्येक क्षेत्रात हीच परिस्थिती आहे. मग असे असेल तर तुम्ही स्वतःला ओबीसी कसे काय म्हणता?' अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाnagpurनागपूरlok sabhaलोकसभा