शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

“आगामी लोकसभेत भाजप २२० जागांपर्यंत जाईल, बहुमत मिळणार नाही”; कुमार केतकरांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2023 19:45 IST

Congress MP Kumar Ketkar News: बहुमत गमावल्यावरही नरेंद्र मोदी राजीनामा देणार नाहीत. त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत सत्तासंघर्ष अटळ आहे, असे सूतोवाच कुमार केतकरांनी केले.

Congress MP Kumar Ketkar News: आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी आता जय्यत तयारीला सुरुवात केल्याचे दिसत आहे. बैठका, दौरे, सभा यांचे प्रमाण वाढत असून, जागावाटप आणि उमेदवारीविषयी चर्चांना उधाण आले आहे. विरोधकांच्या इंडिया आघाडीने भाजपविरोधात कंबर कसली असून, भाजपही इंडिया आघाडीला उत्तर देण्याची सज्जता करत आहे. यातच नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपला पुन्हा बहुमत मिळणार नाही. तरीही ते सत्ता सोडणार नाहीत. सत्तांतरासाठी राजकीय संघर्ष अटळ आहे, असा मोठा दावा काँग्रेसचे राज्यसभा खासदार कुमार केतकर यांनी केला आहे. 

मीडियाशी बोलताना कुमार केतकर यांनी लोकसभानिवडणूक निकालांबाबत मोठे भाकित केले. भाजपला बहुमत मिळणार नाही, असे सांगताना, दुसऱ्या कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळणार नाही, असे कुमार केतकर म्हणाले. काँग्रेस हा स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार नाही. काँग्रेस इंडिया आघाडीतील घटक पक्ष आहे. तसेच इंडिया आघाडीचा घटक म्हणून निवडणूक लढविणार आहे. त्यामुळे काँग्रेसच्या जागा निश्चितच वाढतील, असा विश्वास कुमार केतकरांनी व्यक्त केला. 

लोकसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळणार नाही

विरोधी पक्षाच्या सदस्यांना ‘टार्गेट’ केले जात आहे. ही लोकशाहीची नव्हे तर हुकमशाहीची लक्षणे आहेत. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळणार नाही. हा पक्ष २१५ ते २२० जागांपर्यंत जाईल. त्यानंतरही नरेंद्र मोदी राजीनामा देणार नाहीत. सत्ता सोडणार नसल्याने लोकसभा निवडणुकीनंतर देशात राजकीय संघर्ष अटळ आहे, असे सूतोवाच कुमार केतकर यांनी केले. 

तिन्ही पक्षात प्रत्येकी १६ जागांचे विभाजन होईल

आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना हे तीन पक्ष इंडिया आघाडीचे घटक म्हणून निवडणूक लढतील. तिन्ही पक्षात प्रत्येकी १६ जागांचे विभाजन होईल, असे कुमार केतकर यांनी म्हटले आहे. वंचित बहुजन आघाडीच्या समावेशाबाबत बोलताना, वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी नव्हे तर प्रवक्त्यांनी पत्र लिहिले आहे. त्यांनी स्वतः सोनिया गांधी किंवा मल्लीकार्जुन खर्गे यांना पत्र लिहायला हवे. काँग्रेसकडून प्रकाश आंबेडकर यांना कोणताही विरोध नाही. असे असते तर ते यापूर्वी काँग्रेसच्या पाठिंब्यावर निवडून आले नसते, असे कुमार केतकरांनी स्पष्ट केले.  

टॅग्स :lok sabhaलोकसभाcongressकाँग्रेसBJPभाजपाPoliticsराजकारणElectionनिवडणूक