शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

“आगामी लोकसभेत भाजप २२० जागांपर्यंत जाईल, बहुमत मिळणार नाही”; कुमार केतकरांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2023 19:45 IST

Congress MP Kumar Ketkar News: बहुमत गमावल्यावरही नरेंद्र मोदी राजीनामा देणार नाहीत. त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत सत्तासंघर्ष अटळ आहे, असे सूतोवाच कुमार केतकरांनी केले.

Congress MP Kumar Ketkar News: आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी आता जय्यत तयारीला सुरुवात केल्याचे दिसत आहे. बैठका, दौरे, सभा यांचे प्रमाण वाढत असून, जागावाटप आणि उमेदवारीविषयी चर्चांना उधाण आले आहे. विरोधकांच्या इंडिया आघाडीने भाजपविरोधात कंबर कसली असून, भाजपही इंडिया आघाडीला उत्तर देण्याची सज्जता करत आहे. यातच नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपला पुन्हा बहुमत मिळणार नाही. तरीही ते सत्ता सोडणार नाहीत. सत्तांतरासाठी राजकीय संघर्ष अटळ आहे, असा मोठा दावा काँग्रेसचे राज्यसभा खासदार कुमार केतकर यांनी केला आहे. 

मीडियाशी बोलताना कुमार केतकर यांनी लोकसभानिवडणूक निकालांबाबत मोठे भाकित केले. भाजपला बहुमत मिळणार नाही, असे सांगताना, दुसऱ्या कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळणार नाही, असे कुमार केतकर म्हणाले. काँग्रेस हा स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार नाही. काँग्रेस इंडिया आघाडीतील घटक पक्ष आहे. तसेच इंडिया आघाडीचा घटक म्हणून निवडणूक लढविणार आहे. त्यामुळे काँग्रेसच्या जागा निश्चितच वाढतील, असा विश्वास कुमार केतकरांनी व्यक्त केला. 

लोकसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळणार नाही

विरोधी पक्षाच्या सदस्यांना ‘टार्गेट’ केले जात आहे. ही लोकशाहीची नव्हे तर हुकमशाहीची लक्षणे आहेत. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळणार नाही. हा पक्ष २१५ ते २२० जागांपर्यंत जाईल. त्यानंतरही नरेंद्र मोदी राजीनामा देणार नाहीत. सत्ता सोडणार नसल्याने लोकसभा निवडणुकीनंतर देशात राजकीय संघर्ष अटळ आहे, असे सूतोवाच कुमार केतकर यांनी केले. 

तिन्ही पक्षात प्रत्येकी १६ जागांचे विभाजन होईल

आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना हे तीन पक्ष इंडिया आघाडीचे घटक म्हणून निवडणूक लढतील. तिन्ही पक्षात प्रत्येकी १६ जागांचे विभाजन होईल, असे कुमार केतकर यांनी म्हटले आहे. वंचित बहुजन आघाडीच्या समावेशाबाबत बोलताना, वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी नव्हे तर प्रवक्त्यांनी पत्र लिहिले आहे. त्यांनी स्वतः सोनिया गांधी किंवा मल्लीकार्जुन खर्गे यांना पत्र लिहायला हवे. काँग्रेसकडून प्रकाश आंबेडकर यांना कोणताही विरोध नाही. असे असते तर ते यापूर्वी काँग्रेसच्या पाठिंब्यावर निवडून आले नसते, असे कुमार केतकरांनी स्पष्ट केले.  

टॅग्स :lok sabhaलोकसभाcongressकाँग्रेसBJPभाजपाPoliticsराजकारणElectionनिवडणूक