शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान-सौदी अरेबियात डील, भारताची पहिली प्रतिक्रिया; "आम्ही देशहिताचं रक्षण करण्यासाठी..."
2
कर्नाटकमध्ये मतचोरीचा डाव काँग्रेसवरच उलटला, आमदार संशायाच्या भोवऱ्यात, हायकोर्टाने निकाल रद्द केला
3
दीड कोटींच्या जमिनीवर सगळ्यांचा डोळा; सावत्र भावांनी कट रचला, ८ लाख दिले तरी प्लॅन कसा फसला?
4
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
5
फक्त ५००० रुपयांच्या कर्जातून उभारले १३,५०० कोटींचे साम्राज्य! तुमच्या घरातही वापरली जाते 'ही' वस्तू
6
BAN vs AFG Live Streaming : अफगाणिस्तानसमोर मोठं चॅलेंज! लढत श्रीलंकेविरुद्ध अन् चितपट करायचंय बांगलादेशला! जाणून घ्या समीकरण
7
महामार्गावर अचानक भूस्खलन, पळाले म्हणून थोडक्यात वाचले भाजप खासदार; व्हिडीओ केला शेअर
8
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
9
पहिल्याच प्रयत्नात नीरज पोहोचला अंतिम फेरीत; जागतिक अजिंक्यपद : सचिन यादवही ठरला पात्र
10
तासाभराचं नाट्य, बहिष्काराची धमकी, ६ ईमेल आणि..., पाकिस्तान असा आला वठणीवर, त्या बैठकीत काय घडलं?
11
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
12
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
13
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
14
Share Market: US Fed च्या निर्णयानंतर देशांतर्गत शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स ३०० अंकांनी वधारला; 'या' शेअर्समध्ये तेजी
15
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!
16
१२ वर्षांच्या संसाराची काडीमोड! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचा घटस्फोट, बायकोशी असलेलं नातं मोडलं
17
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
18
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
19
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
20
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर

“आगामी लोकसभेत भाजप २२० जागांपर्यंत जाईल, बहुमत मिळणार नाही”; कुमार केतकरांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2023 19:45 IST

Congress MP Kumar Ketkar News: बहुमत गमावल्यावरही नरेंद्र मोदी राजीनामा देणार नाहीत. त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत सत्तासंघर्ष अटळ आहे, असे सूतोवाच कुमार केतकरांनी केले.

Congress MP Kumar Ketkar News: आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी आता जय्यत तयारीला सुरुवात केल्याचे दिसत आहे. बैठका, दौरे, सभा यांचे प्रमाण वाढत असून, जागावाटप आणि उमेदवारीविषयी चर्चांना उधाण आले आहे. विरोधकांच्या इंडिया आघाडीने भाजपविरोधात कंबर कसली असून, भाजपही इंडिया आघाडीला उत्तर देण्याची सज्जता करत आहे. यातच नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपला पुन्हा बहुमत मिळणार नाही. तरीही ते सत्ता सोडणार नाहीत. सत्तांतरासाठी राजकीय संघर्ष अटळ आहे, असा मोठा दावा काँग्रेसचे राज्यसभा खासदार कुमार केतकर यांनी केला आहे. 

मीडियाशी बोलताना कुमार केतकर यांनी लोकसभानिवडणूक निकालांबाबत मोठे भाकित केले. भाजपला बहुमत मिळणार नाही, असे सांगताना, दुसऱ्या कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळणार नाही, असे कुमार केतकर म्हणाले. काँग्रेस हा स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार नाही. काँग्रेस इंडिया आघाडीतील घटक पक्ष आहे. तसेच इंडिया आघाडीचा घटक म्हणून निवडणूक लढविणार आहे. त्यामुळे काँग्रेसच्या जागा निश्चितच वाढतील, असा विश्वास कुमार केतकरांनी व्यक्त केला. 

लोकसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळणार नाही

विरोधी पक्षाच्या सदस्यांना ‘टार्गेट’ केले जात आहे. ही लोकशाहीची नव्हे तर हुकमशाहीची लक्षणे आहेत. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळणार नाही. हा पक्ष २१५ ते २२० जागांपर्यंत जाईल. त्यानंतरही नरेंद्र मोदी राजीनामा देणार नाहीत. सत्ता सोडणार नसल्याने लोकसभा निवडणुकीनंतर देशात राजकीय संघर्ष अटळ आहे, असे सूतोवाच कुमार केतकर यांनी केले. 

तिन्ही पक्षात प्रत्येकी १६ जागांचे विभाजन होईल

आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना हे तीन पक्ष इंडिया आघाडीचे घटक म्हणून निवडणूक लढतील. तिन्ही पक्षात प्रत्येकी १६ जागांचे विभाजन होईल, असे कुमार केतकर यांनी म्हटले आहे. वंचित बहुजन आघाडीच्या समावेशाबाबत बोलताना, वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी नव्हे तर प्रवक्त्यांनी पत्र लिहिले आहे. त्यांनी स्वतः सोनिया गांधी किंवा मल्लीकार्जुन खर्गे यांना पत्र लिहायला हवे. काँग्रेसकडून प्रकाश आंबेडकर यांना कोणताही विरोध नाही. असे असते तर ते यापूर्वी काँग्रेसच्या पाठिंब्यावर निवडून आले नसते, असे कुमार केतकरांनी स्पष्ट केले.  

टॅग्स :lok sabhaलोकसभाcongressकाँग्रेसBJPभाजपाPoliticsराजकारणElectionनिवडणूक