शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

"भाजपानं त्यांच्या १०५ आमदारांवर लक्ष ठेवावं; अनेक जण आमच्या संपर्कात"

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2020 14:01 IST

महाविकास आघाडी सरकार ५ वर्षे चालणार; काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांना विश्वास

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील महाविकास आघाडी सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वास काँग्रेस नेत्या आणि महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला. भाजपामध्ये गेलेले अनेक आमदार काँग्रेसच्या संपर्कात आहेत आणि ते पुन्हा काँग्रेसमध्ये परतू शकतात, असा दावादेखील त्यांनी केला. महाराष्ट्रानं देशाला नवा फॉर्म्युला दिला असून आमचं सरकार यशस्वीपणे कार्यकाळ पूर्ण करेल, असंदेखील त्या म्हणाल्या.ऑक्टोबरपर्यंत ठाकरे सरकार पाडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं काही दिवसांपूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं होतं. त्यावर भाष्य करताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकार अंतर्विरोधामुळे कोसळेल, असं म्हटलं. त्यावर बोलतान भाजपानं त्यांच्या १०५ आमदारांवर नीट लक्ष ठेवावं, असं सूचक विधान ठाकूर यांनी केलं. त्या न्यूज१८शी बोलत होत्या.त्याआधी पर्यटन मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरेंनी भाजपाला लक्ष्य केलं. 'कोरोना संकट काळात महाविकास आघाडी सरकारबद्दल अफवा पसरवल्या जात आहेत. सरकारमध्ये असलेल्या घटक पक्षांमध्ये आलबेल नसल्याच्या चर्चा घडवून आणल्या जात आहेत. विरोधी पक्षांनी त्यांचा प्राधान्यक्रम निश्चित करण्याची आवश्यकता आहे. सत्तेत नसल्यानं काहींना असुरक्षित आणि अस्वस्थ वाटत आहे,' अशा शब्दांत आदित्य ठाकरे विरोधकांवर बरसले.त्याआधी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीदेखील महाविकास आघाडीचं सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वास व्यक्त केला. सामनाला दिलेल्या मुलाखतीत पवारांनी आपण सरकारचे रिमोट कंट्रोल नसल्याचं स्पष्ट केलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे मंत्री सरकार चालवतात, असं पवार म्हणाले. पक्ष तीन असले, तरीही त्यांचा उद्देश एकच असल्याचं पवार यांनी म्हटलं होतं.  

टॅग्स :Yashomati Thakurयशोमती ठाकूरSharad Pawarशरद पवारAditya Thackreyआदित्य ठाकरेSanjay Rautसंजय राऊत