शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

"भाजपानं त्यांच्या १०५ आमदारांवर लक्ष ठेवावं; अनेक जण आमच्या संपर्कात"

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2020 14:01 IST

महाविकास आघाडी सरकार ५ वर्षे चालणार; काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांना विश्वास

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील महाविकास आघाडी सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वास काँग्रेस नेत्या आणि महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला. भाजपामध्ये गेलेले अनेक आमदार काँग्रेसच्या संपर्कात आहेत आणि ते पुन्हा काँग्रेसमध्ये परतू शकतात, असा दावादेखील त्यांनी केला. महाराष्ट्रानं देशाला नवा फॉर्म्युला दिला असून आमचं सरकार यशस्वीपणे कार्यकाळ पूर्ण करेल, असंदेखील त्या म्हणाल्या.ऑक्टोबरपर्यंत ठाकरे सरकार पाडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं काही दिवसांपूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं होतं. त्यावर भाष्य करताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकार अंतर्विरोधामुळे कोसळेल, असं म्हटलं. त्यावर बोलतान भाजपानं त्यांच्या १०५ आमदारांवर नीट लक्ष ठेवावं, असं सूचक विधान ठाकूर यांनी केलं. त्या न्यूज१८शी बोलत होत्या.त्याआधी पर्यटन मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरेंनी भाजपाला लक्ष्य केलं. 'कोरोना संकट काळात महाविकास आघाडी सरकारबद्दल अफवा पसरवल्या जात आहेत. सरकारमध्ये असलेल्या घटक पक्षांमध्ये आलबेल नसल्याच्या चर्चा घडवून आणल्या जात आहेत. विरोधी पक्षांनी त्यांचा प्राधान्यक्रम निश्चित करण्याची आवश्यकता आहे. सत्तेत नसल्यानं काहींना असुरक्षित आणि अस्वस्थ वाटत आहे,' अशा शब्दांत आदित्य ठाकरे विरोधकांवर बरसले.त्याआधी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीदेखील महाविकास आघाडीचं सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वास व्यक्त केला. सामनाला दिलेल्या मुलाखतीत पवारांनी आपण सरकारचे रिमोट कंट्रोल नसल्याचं स्पष्ट केलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे मंत्री सरकार चालवतात, असं पवार म्हणाले. पक्ष तीन असले, तरीही त्यांचा उद्देश एकच असल्याचं पवार यांनी म्हटलं होतं.  

टॅग्स :Yashomati Thakurयशोमती ठाकूरSharad Pawarशरद पवारAditya Thackreyआदित्य ठाकरेSanjay Rautसंजय राऊत