शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

‘ते’ पत्र सार्वजनिक केल्याने काँग्रेसचे नेतृत्व नाराज; केदार यांच्याविरुद्ध आशिष देशमुखांचे पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2021 06:28 IST

पक्षाचे सचिव प्रणव झा यांनी हे प्रकरण जुने असल्याचे सांगत स्पष्ट केले आहे की, एखाद्याला आपले म्हणणे पक्षात मांडण्याचा अधिकार आहे. पण, पक्षाध्यक्षांना लिहिलेले पत्र सार्वजनिक करण्याचा प्रकार नेतृत्व सहन करणार नाही. 

- शीलेश शर्मालोकमत न्यूज नेटवरनवी दिल्ली : पंजाब, छत्तीसगढ आणि राजस्थाननंतर आता महाराष्ट्र काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी समोर आली आहे. प्रदेश काँग्रेसमध्ये सरचिटणीसपदी दोनच दिवसांपूर्वी नियुक्ती झालेल्या आशिष रणजीत देशमुख यांनी आघाडी सरकारमधील मंत्री सुनील केदार यांच्याविरोधात एक पत्र काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना लिहिले आहे. मात्र, हे पत्र सार्वजनिक केल्यामुळे पक्ष नेतृत्व नाराज आहे. सूत्रांनी सांगितले की, पक्ष नेतृत्व याला अंतर्गत गटबाजीचा परिणाम मानते. 

पक्षाचे सचिव प्रणव झा यांनी हे प्रकरण जुने असल्याचे सांगत स्पष्ट केले आहे की, एखाद्याला आपले म्हणणे पक्षात मांडण्याचा अधिकार आहे. पण, पक्षाध्यक्षांना लिहिलेले पत्र सार्वजनिक करण्याचा प्रकार नेतृत्व सहन करणार नाही. 

पक्षाचे प्रभारी एच. के. पाटील यांचेही म्हणणे आहे की, अशा प्रकारे सार्वजनिक वक्तव्ये पक्ष स्वीकार करणार नाही. आशिष देशमुख यांच्या पत्रामागे काँग्रेसच्याच काही नेत्यांचा हात आहे. महाराष्ट्रातील काँग्रेसच्या एका माजी केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले की, भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेले आशिष देशमुख हे पुन्हा भाजपमध्ये परतण्याच्या तयारीत आहेत.

केवळ भाजप नेतृत्वाचा विश्वास जिंकण्यासाठी ते सातत्याने आघाडी सरकारविरुद्ध वक्तव्ये करीत आहेत. सावनेर विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर ते केदार यांच्या विरुद्ध निवडणूक लढण्याची तयारी करीत आहेत. त्यामुळे लवकरच ते भाजपमध्ये जातील. दरम्यान, आशिष देशमुख यांच्या पत्रामागचा हेतू काय होता तसेच कोणाच्या इशाऱ्यावरून हे पत्र लिहिले गेले याची माहिती पक्ष नेतृत्व घेत आहे. 

टॅग्स :Sunil Kedarसुनील केदारAshish Deshmukhआशीष देशमुखcongressकाँग्रेस