शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
2
जिओ-हॉटस्टार सबस्क्रीप्शनमध्ये मोठी वाढ करण्याची शक्यता; ₹१,४९९ प्लॅनची किंमत थेट...
3
India’s Squad For Rising Star T20 Asia Cup: वैभव सूर्यवंशीला संधी; 'या' तारखेला रंगणार भारत-पाक सामना!
4
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
5
चीनने पाकिस्तानसमोर मैत्रीचा हात पुढे केला! भारताविरुद्ध जाण्याचा नवा कट? काय आहे ड्रॅगनची खेळी?
6
जगातील 'या' 9 देशांकडे 12,241 अण्वस्त्रे; रशिया-अमेरिका आघाडीवर, भारताचा कितवा नंबर..?
7
दररोज पाठवायचा अश्लील मेसेज, प्रायव्हेट पार्ट व्हिडिओ; अभिनेत्रीने एकदा भेटायला बोलावले अन्...
8
आता सरकारी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही; घरबसल्या मिळेल जीवन प्रमाणपत्र
9
Sandeep Deshpande : "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
10
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
11
त्रिपुरी पौर्णिमा २०२५: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' राशींवर लक्ष्मीकृपा; व्यापारात लाभ; मालमत्ता खरेदीचे योग
12
रोहित आर्या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने व्यक्त केला संशय, पोस्ट करत म्हणाला...
13
आता त्यांचे मोजकेच दिवस उरलेत, या देशाच्या राष्ट्रपतींना ट्रम्प यांची उघड धमकी   
14
हवाई प्रवाशांसाठी मोठी बातमी; अतिरिक्त शुल्काशिवाय विमान तिकिटे रद्द करता येणार, कंपन्यांची मनमानी थांबणार!
15
Harmanpreet Kaur: "हरमनप्रीत कौरला कर्णधारपदाच्या ओझ्यातून मुक्त करा", माजी क्रिकेटपटूची मागणी चर्चेत!
16
कारच्या बंद दरवाजात गुदमरले जीव, ५ जणांचा मृत्यू; Tesla कारविरोधात खटला दाखल, काय आहे प्रकरण?
17
Ladki Bahin Yojana: मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय?
18
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
19
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
20
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...

काँग्रेस नेते एकमेकांचे शत्रू, भाजपा दुश्मन वाटत नाही; आशिष देशमुखांनी मांडली खंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2023 13:15 IST

हाथ से हाथ जोडो जसं नेत्यांसाठी गरजेचे आहे. तसे शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादीशी हात मिळवणे गरजेचे आहे त्याशिवाय महाराष्ट्रात महाविकास आघाडीला पाहिजे तसे यश मिळणार नाही असं मत आशिष देशमुख यांनी मांडले.

नागपूर - विदर्भातून काँग्रेसनं मिशन निवडणूक हाती घेत स्वबळाचा नारा दिला. हाथ से हाथ जोडो असं अभियानाची सुरूवात केली. परंतु काँग्रेसमधील पक्षातंर्गत नाराजी पुन्हा उफाळून आली आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी एकमेकांशी हाथ से हाथ जोडायले हवेत अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. काँग्रेस नेतेच एकमेकांचे शत्रू, भाजपा अथवा इतर पक्ष त्यांना शत्रू वाटत नाही असं विधान माजी आमदार आशिष देशमुख यांनी केले आहे. 

आशिष देशमुख म्हणाले की, हाथ से हाथ जोडो अभियानाची सुरुवात महाराष्ट्रात होतेय पण काँग्रेसचे महाराष्ट्रातील जे मोठे नेते आहेत त्यांनी आपापसात हात जोडणे अतिशय गरजेचे आहे असं माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना वाटतं. नम्रतेने, अर्विभाव सोडून स्वत:चे हात जोडून जनतेपर्यंत जाण्याची त्यांची मानसिकता असेल तरच स्वबळाचा नारा सार्थ ठरू शकतो. ज्या अर्विभावाने नेते वागतात. आपापसातील मतभेदामुळे जनतेपासून पक्ष दूर चाललाय ही भावना कार्यकर्त्यांची आहे. या नेत्यांनी एकत्र येऊन पक्षाला बळ देण्यासाठी नेत्यांनी मेहनत घेणे अपेक्षित आहे असं त्यांनी सांगितले.

तसेच कुठल्याही मोठ्या नेत्याला अर्ध्या रात्री जर उठवलं आणि त्यांना विचारलं तुमचा एक नंबरचा दुश्मन कोण आहे? तर नक्कीच त्यांच्या डोळ्यासमोर काँग्रेसचा दुसऱ्या नंबरचा नेता येईल. भाजपा किंवा विरोधी पक्षाबाबत ते दुश्मन म्हणून विचार करत नाहीत. ही भावना नेत्यांनी बदलली नाही तर पक्षाला पाहिजे तसं यश मिळणार नाही. हाथ से हाथ जोडो जसं नेत्यांसाठी गरजेचे आहे. तसे शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादीशी हात मिळवणे गरजेचे आहे त्याशिवाय महाराष्ट्रात महाविकास आघाडीला पाहिजे तसे यश मिळणार नाही अशीही भावना आशिष देशमुखांनी मांडली. 

दरम्यान, स्वबळाचा नारा कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण करण्यासाठी नाना पटोले मागील २ वर्षापासून देत आलेत. पण निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्यात १०० टक्के महाविकास आघाडी निवडून येऊ शकते. त्यासाठी तिन्हीही पक्षांनी हाथ से हाथ जोडो करणे हे अतिशय गरजेचे आहे. विदर्भात स्वबळाचा नारा संयुक्तिक होऊ शकतो. पण राज्याच्या इतर भागात शिवसेना-राष्ट्रवादीसोबत राहिले तर काँग्रेस या तिघांमध्ये एक नंबरचा पक्ष बनून अतिशय चांगले सरकार पुढील काळात चालवू शकतो. त्यासाठी सामज्यंसाने घेणे, हाथ से हाथ जोडोसोबत दिलसे दिल जोडो करणे महत्त्वाचं आहे असंही आशिष देशमुखांनी सांगितले.  

टॅग्स :Ashish Deshmukhआशीष देशमुखcongressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाNana Patoleनाना पटोले