शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस नेते एकमेकांचे शत्रू, भाजपा दुश्मन वाटत नाही; आशिष देशमुखांनी मांडली खंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2023 13:15 IST

हाथ से हाथ जोडो जसं नेत्यांसाठी गरजेचे आहे. तसे शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादीशी हात मिळवणे गरजेचे आहे त्याशिवाय महाराष्ट्रात महाविकास आघाडीला पाहिजे तसे यश मिळणार नाही असं मत आशिष देशमुख यांनी मांडले.

नागपूर - विदर्भातून काँग्रेसनं मिशन निवडणूक हाती घेत स्वबळाचा नारा दिला. हाथ से हाथ जोडो असं अभियानाची सुरूवात केली. परंतु काँग्रेसमधील पक्षातंर्गत नाराजी पुन्हा उफाळून आली आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी एकमेकांशी हाथ से हाथ जोडायले हवेत अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. काँग्रेस नेतेच एकमेकांचे शत्रू, भाजपा अथवा इतर पक्ष त्यांना शत्रू वाटत नाही असं विधान माजी आमदार आशिष देशमुख यांनी केले आहे. 

आशिष देशमुख म्हणाले की, हाथ से हाथ जोडो अभियानाची सुरुवात महाराष्ट्रात होतेय पण काँग्रेसचे महाराष्ट्रातील जे मोठे नेते आहेत त्यांनी आपापसात हात जोडणे अतिशय गरजेचे आहे असं माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना वाटतं. नम्रतेने, अर्विभाव सोडून स्वत:चे हात जोडून जनतेपर्यंत जाण्याची त्यांची मानसिकता असेल तरच स्वबळाचा नारा सार्थ ठरू शकतो. ज्या अर्विभावाने नेते वागतात. आपापसातील मतभेदामुळे जनतेपासून पक्ष दूर चाललाय ही भावना कार्यकर्त्यांची आहे. या नेत्यांनी एकत्र येऊन पक्षाला बळ देण्यासाठी नेत्यांनी मेहनत घेणे अपेक्षित आहे असं त्यांनी सांगितले.

तसेच कुठल्याही मोठ्या नेत्याला अर्ध्या रात्री जर उठवलं आणि त्यांना विचारलं तुमचा एक नंबरचा दुश्मन कोण आहे? तर नक्कीच त्यांच्या डोळ्यासमोर काँग्रेसचा दुसऱ्या नंबरचा नेता येईल. भाजपा किंवा विरोधी पक्षाबाबत ते दुश्मन म्हणून विचार करत नाहीत. ही भावना नेत्यांनी बदलली नाही तर पक्षाला पाहिजे तसं यश मिळणार नाही. हाथ से हाथ जोडो जसं नेत्यांसाठी गरजेचे आहे. तसे शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादीशी हात मिळवणे गरजेचे आहे त्याशिवाय महाराष्ट्रात महाविकास आघाडीला पाहिजे तसे यश मिळणार नाही अशीही भावना आशिष देशमुखांनी मांडली. 

दरम्यान, स्वबळाचा नारा कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण करण्यासाठी नाना पटोले मागील २ वर्षापासून देत आलेत. पण निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्यात १०० टक्के महाविकास आघाडी निवडून येऊ शकते. त्यासाठी तिन्हीही पक्षांनी हाथ से हाथ जोडो करणे हे अतिशय गरजेचे आहे. विदर्भात स्वबळाचा नारा संयुक्तिक होऊ शकतो. पण राज्याच्या इतर भागात शिवसेना-राष्ट्रवादीसोबत राहिले तर काँग्रेस या तिघांमध्ये एक नंबरचा पक्ष बनून अतिशय चांगले सरकार पुढील काळात चालवू शकतो. त्यासाठी सामज्यंसाने घेणे, हाथ से हाथ जोडोसोबत दिलसे दिल जोडो करणे महत्त्वाचं आहे असंही आशिष देशमुखांनी सांगितले.  

टॅग्स :Ashish Deshmukhआशीष देशमुखcongressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाNana Patoleनाना पटोले