शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

काँग्रेस नेते एकमेकांचे शत्रू, भाजपा दुश्मन वाटत नाही; आशिष देशमुखांनी मांडली खंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2023 13:15 IST

हाथ से हाथ जोडो जसं नेत्यांसाठी गरजेचे आहे. तसे शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादीशी हात मिळवणे गरजेचे आहे त्याशिवाय महाराष्ट्रात महाविकास आघाडीला पाहिजे तसे यश मिळणार नाही असं मत आशिष देशमुख यांनी मांडले.

नागपूर - विदर्भातून काँग्रेसनं मिशन निवडणूक हाती घेत स्वबळाचा नारा दिला. हाथ से हाथ जोडो असं अभियानाची सुरूवात केली. परंतु काँग्रेसमधील पक्षातंर्गत नाराजी पुन्हा उफाळून आली आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी एकमेकांशी हाथ से हाथ जोडायले हवेत अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. काँग्रेस नेतेच एकमेकांचे शत्रू, भाजपा अथवा इतर पक्ष त्यांना शत्रू वाटत नाही असं विधान माजी आमदार आशिष देशमुख यांनी केले आहे. 

आशिष देशमुख म्हणाले की, हाथ से हाथ जोडो अभियानाची सुरुवात महाराष्ट्रात होतेय पण काँग्रेसचे महाराष्ट्रातील जे मोठे नेते आहेत त्यांनी आपापसात हात जोडणे अतिशय गरजेचे आहे असं माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना वाटतं. नम्रतेने, अर्विभाव सोडून स्वत:चे हात जोडून जनतेपर्यंत जाण्याची त्यांची मानसिकता असेल तरच स्वबळाचा नारा सार्थ ठरू शकतो. ज्या अर्विभावाने नेते वागतात. आपापसातील मतभेदामुळे जनतेपासून पक्ष दूर चाललाय ही भावना कार्यकर्त्यांची आहे. या नेत्यांनी एकत्र येऊन पक्षाला बळ देण्यासाठी नेत्यांनी मेहनत घेणे अपेक्षित आहे असं त्यांनी सांगितले.

तसेच कुठल्याही मोठ्या नेत्याला अर्ध्या रात्री जर उठवलं आणि त्यांना विचारलं तुमचा एक नंबरचा दुश्मन कोण आहे? तर नक्कीच त्यांच्या डोळ्यासमोर काँग्रेसचा दुसऱ्या नंबरचा नेता येईल. भाजपा किंवा विरोधी पक्षाबाबत ते दुश्मन म्हणून विचार करत नाहीत. ही भावना नेत्यांनी बदलली नाही तर पक्षाला पाहिजे तसं यश मिळणार नाही. हाथ से हाथ जोडो जसं नेत्यांसाठी गरजेचे आहे. तसे शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादीशी हात मिळवणे गरजेचे आहे त्याशिवाय महाराष्ट्रात महाविकास आघाडीला पाहिजे तसे यश मिळणार नाही अशीही भावना आशिष देशमुखांनी मांडली. 

दरम्यान, स्वबळाचा नारा कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण करण्यासाठी नाना पटोले मागील २ वर्षापासून देत आलेत. पण निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्यात १०० टक्के महाविकास आघाडी निवडून येऊ शकते. त्यासाठी तिन्हीही पक्षांनी हाथ से हाथ जोडो करणे हे अतिशय गरजेचे आहे. विदर्भात स्वबळाचा नारा संयुक्तिक होऊ शकतो. पण राज्याच्या इतर भागात शिवसेना-राष्ट्रवादीसोबत राहिले तर काँग्रेस या तिघांमध्ये एक नंबरचा पक्ष बनून अतिशय चांगले सरकार पुढील काळात चालवू शकतो. त्यासाठी सामज्यंसाने घेणे, हाथ से हाथ जोडोसोबत दिलसे दिल जोडो करणे महत्त्वाचं आहे असंही आशिष देशमुखांनी सांगितले.  

टॅग्स :Ashish Deshmukhआशीष देशमुखcongressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाNana Patoleनाना पटोले