शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

देशावर आलेली वेळ मानवनिर्मित; नागरिकांच्या मृत्यूचा सौदा करणारे मोदी जगातील एकमेव पंतप्रधान : पटोले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2021 16:13 IST

कोरोनाच्या परिस्थितीवरू काँग्रेसकडून होत आहे टीका. मोदी हे देशाचे नाही तर भाजपचे पंतप्रधान, पटोले यांची टीका.

ठळक मुद्देकोरोनाच्या परिस्थितीवरू काँग्रेसकडून होत आहे टीका.मोदी हे देशाचे नाही तर भाजपचे पंतप्रधान, पटोले यांची टीका.

जळगाव : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात हाहाकार माजला होता. परंतु आता देशातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात येत आहे. काँग्रेसकडून सातत्यानं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारवर टीका करण्यात येत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कोरोनाच्या परिस्थितीवर सरकारवर टीका केली. "आपल्या देशावर जी वेळ आली आहे. ती मानवनिर्मित साथ आहे. पंतप्रधान हे भाजपचे आहेत, ते देशाचे नाहीत. त्यांनी देशाला कोरोनाच्या संकटात लोटले, मोदी यांनी ही परिस्थिती मुद्दाम आणली. हा प्लॅन असून, जागतिक पातळीवर हा प्लॅन झाला," असा आरोप त्यांनी यावेळी केला. जळगावमधील फैजपूर येथे बोलताना त्यांनी सरकारवर निशाणा साधला. 

"चीनचे पंतप्रधान आणि नरेंद्र मोदी एकत्र आले होते आणि त्यानंतर १९ नोव्हेंबरला पहिला रुग्ण सापडला. हा जागतिक प्लॅन होता. आपल्या देशाच्या नागरिकांचा मृत्यूचा सौदा करणारे मोदी हे  जगातील एकमेव पंतप्रधान आहेत," असं म्हणत पटोले यांनी निशाणा मोदींवर निशाणा साधला. 

ताटं वाजवून कोरोना बरा झाला असता तर..."देशातील प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करण्यात येतील असे सांगणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ लाख न देता लॉकडाऊन लावून देशवासीयांना घरात बसवले. कोरोना काळ‌ात उपाययोजना करण्यापेक्षा ताटं वाजविण्यावर मोदींनी भर दिला. ताटं वाजवून कोरोना बरा झाला असता तर रुग्णालयांची गरज भासली नसती," असाही चिमटा त्यांनी काढला. खाद्य तेल असो अथवा इंधन, यांच्या किंमती वाढवून मोदी सरकारने जनतेला महागाईच्या खाईत लोटल्याचीही टीका त्यांनी केली.

कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात अपयशी"देशातील कोरोनाची परिस्थिती हाताळण्यातही मोदी सरकार अपयशी ठरले आहे. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी कोरोना संदर्भात महत्वाचे सल्ले दिले होते. परंतु त्याकडे त्यांनी लक्ष दिले नाही याची किंमत देशाला हजारो बळी देऊन मोजावी लागली आहे. कालच राहुल गांधी  यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबद्दल इशारा देत योग्य ती पावले उचलण्याची मागणी केली आहे. मागील दोन लाटेत मोदी सरकारच्या अक्षम्य चुकांमुळे निष्पाप लोकांचे बळी गेले. आतातरी सरकारने जागे व्हावे आणि वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात," असे नाना पटोले म्हणाले.

सात वर्षांत देशात अनागोंदी वाढलीमोदी सरकारच्या सात वर्षांच्या काळात देशात अनागोंदी वाढली आहे. पीक वीमा योजनेतूनही शेतकऱ्यांना लुटले जात आहे. पेट्रोल, डिझेल, खाद्य तेल मोठ्या प्रमाणात महाग झाले आहे, बरोजगारी वाढली आहे याविरोधात काँग्रेस लढा देत आहे. कोरोना संकटामुळे मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरण्यास बंधने आहेत मात्र काँग्रेसने कोरोनाचे नियम पाळून मोदी सरकारच्या विरोधात आंदोलने केली आहेत आणि पुढेही करत राहू. मोदी सरकारच्या काळात फक्त त्यांच्या मूठभर उद्योगपती मित्रांनाच लाभ झाला असून सर्वसामान्य जनता बेहाल झाली आहे. २०२४ च्या निवडणुकीत जनता भाजपला त्यांची जागा दाखवून देणार असल्याचंही ते म्हणाले. यावेळी त्यांनी पुन्हा स्वबळाचा नारा देत कार्यकर्त्यांना तयार राहण्याचं आवाहनही केले.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेMaharashtraमहाराष्ट्रcorona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीनIndiaभारतNarendra Modiनरेंद्र मोदीPraniti Shindeप्रणिती शिंदे