शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

खऱ्या सरकारची खरी कर्जमाफी ; बाळासाहेब थोरातांची भाजपवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2019 17:54 IST

पती-पत्नीला एकत्रित बोलावून रांगेत उभे करून शेतकऱ्यांना गुन्हेगारासारखी वागणूक देण्याचे पाप भाजपच्या सरकराने केले होते.

मुंबई: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. राज्यातील शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेत केली आहे. तर खऱ्या सरकारची खरी कर्जमाफी अशी प्रतिकिया काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांनी दिली आहे. तर याचवेळी त्यांनी भाजपवर सुद्धा निशाणा साधला आहे.

नागपुरात सुरु असलेल्या अधिवेशनात विरोधीपक्षाकडून शेतकरी कर्जमाफीच्या मुद्यावरून गेल्याचार चार दिवसांपासून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला जात होता. मात्र आज अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यातील शेतकऱ्यांचे ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत असलेले दोन लाख रुपयांपर्यंतचे थकीत कर्ज माफ करण्यात येणार असल्याची घोषणा केली.

तर उद्धव ठाकरेंनी केलेल्या कर्जमाफीच्या घोषणेनंतर बोलताना बाळसाहेब थोरात म्हणाले की, "महाराष्ट्रातील शेतकऱ्याला आधार देण्याचा शब्द महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार पूर्ण करत आहे. दोन लाख रुपयांपर्यंतचे शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची घोषणा आज झाली आहे. शेतकऱ्यांचा स्वाभिमान जपून आम्ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ करत आहोत”.

तसेच यावेळी त्यांनी भाजपचा सुद्धा समाचार घेतला. ऑनलाइन अर्जाच्या नावाखाली मागील सरकारने शेतकऱ्यांचा अपमान केला होता. पती-पत्नीला एकत्रित बोलावून रांगेत उभे करून शेतकऱ्यांना गुन्हेगारासारखी वागणूक देण्याचे पाप भाजपच्या सरकराने केले होते. मात्र कर्जमाफी शेतकऱ्याचा हक्क असल्याचे आम्ही मानतो, त्यामुळे शेतकऱ्याला सन्मानाने कर्जमाफी दिली जाईल. तर खरी मदत खरा फायदा आणि खऱ्या सरकारची खरी कर्जमाफी असल्याचा टोला सुद्धा थोरातांनी यावेळी भाजपला लगावला.

 

 

 

टॅग्स :FarmerशेतकरीWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनBalasaheb Thoratबाळासाहेब थोरातPoliticsराजकारणBJPभाजपा