शहरं
Join us  
Trending Stories
1
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
2
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
3
"दगा फटका झाला तर बच्चू कडू फाशीवर जाईल" आंदोलनाचा विजय झाल्याचा दावा करत बच्चू कडूंनी सरकारला दिला इशारा
4
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांची पाळत, थेट बेडरुमध्ये घुसून हेरगिरी? आरोपामुळे खळबळ
5
भररस्त्यात पाठलाग, कारची काच फोडली... महिला पत्रकारावर मध्यरात्री हल्ला! अखेर दोघांना अटक
6
'मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा…’, आजारी संजय राऊत यांच्यासाठी सुषमा अंधारे यांची खास पोस्ट
7
सरदार पटेल यांना त्यांच्या 150व्या जयंतीनिमित्त शशी थरूर यांचं अभिवादन, महात्मा गांधींच्या नातवाच्या शब्दांत अर्पण केली श्रद्धांजली
8
Mumbai Hostage Case: ‘त्याने फटाके वाजवले आणि बाहेर गोळीबार सुरू असल्याचे सांगितले’; रोहित आर्या प्रकरणी प्रत्यक्षदर्शी वृद्ध महिलेचा खुलासा
9
ट्रम्प यांनी अण्वस्त्र टेस्टिंगचा आदेश देताच रशियाची थेट प्रतिक्रिया, दिला अल्टीमेटम!
10
मित्रांचा आग्रह जीवावर बेतला, पार्टीत बॅक टू बॅक पाजले पेग; २६ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू
11
पवईतील आरोपी रोहित आर्यला दीपक केसरकरांनी इतकी मोठी रक्कम का दिली?; सामाजिक कार्यकर्त्यांचा सवाल
12
मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत सापडली दोन सिल्वर गिबन; कस्टम अधिकारीही झाले अवाक्
13
वाघ अगदी जवळून पाहायचाय? मग, भारतातील 'या' ६ व्याघ्र प्रकल्पांना नक्की भेट द्या!
14
गोळीबार, आग आणि धमकीचं पत्र, फरार कैद्याने आणले पोलिसांच्या नाकी नऊ, नेमकं प्रकरण काय?
15
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटी बुडाले; सर्वात जास्त कुठे?
16
Extra Marital Affairs:मुलाचं लग्न ठरलं आणि होणाऱ्या सूनेच्या बापावरच जडला महिलेचा जीव; लग्नाआधीच दोघे गेले पळून
17
Rain Alert: कमी दाबाचे क्षेत्र कायम, या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; महाराष्ट्रात कुठे-कुठे पाऊस पडणार?
18
शेतकऱ्यांना न झुलवता तात्काळ कर्जमाफी करा; उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मागणी
19
धोनीची गुंतवणूक असलेली कंपनी बाजारात! ६ नोव्हेंबरला उघडणार IPO; प्राइस बँडसह तपशील जाणून घ्या
20
खात्यात ८ लाख जमा केले अन् प्राप्तिकर विभागाची 'टॅक्स' नोटीस; ६ वर्षांच्या लढ्यानंतर करदात्याचा विजय!

“…तर अमोल मिटकरी यांचा संजय राऊत झाल्याशिवाय राहणार नाही”; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2023 11:58 IST

Congress Vs NCP News: विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदावरून महाविकास आघाडीत बिघाडी सुरू झाल्याचे सांगितले जात आहे.

Maha Vikas Aghadi Congress Vs NCP News: मनिषा कायंदे यांनी ठाकरे गटाला रामराम करत शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पद कोणाकडे असेल, यावरून महाविकास आघाडीत धुसफूस सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीतील नेते विरोधी पक्षनेते पदाबाबत दावे-प्रतिदावे करताना दिसत आहेत. यातच आता अमोल मिटकरी यांचा संजय राऊत झाल्याशिवाय राहणार नाही, अशी बोचरी टीका काँग्रेसकडून करण्यात आली आहे. 

विधान परिषदेत आता बरोबरीचे संख्याबळ आहे. जर महाविकास आघाडीने ठरवून निर्णय घेतला. तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पद राष्ट्रवादी काँग्रेसकडे असावे. भाजपला वेठीस धरायचे असेल आणि त्यांची कोंडी करायची असेल, तर एकनाथ खडसे हे अभ्यासू नेते आहेत. त्यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात यावी, असे अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे. यानंतर आता काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी यांनी अमोल मिटकरी यांच्यावर सडकून टीका केली आहे.

…तर अमोल मिटकरींचा संजय राऊत झाल्याशिवाय राहणार नाही

अमोल मिटकरी यांच्या अशा वक्तव्यामुळेचा त्यांचेही संजय राऊत होईल. विरोधी पक्ष नेता कोण असेल? याचा निर्णय संख्याबळावर होत असतो. विधान परिषदेत राष्ट्रवादी आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडे नऊ, नऊ जागा होत्या. मनीषा कायंदे शिंदे गटात गेल्याने त्यांच्या जागा कमी झाल्या. परंतु यासंदर्भातील निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल. त्यामध्ये इतरांनी लुडबुड करु नये. अमोल मिटकरी यांनी आता कुठेतरी थांबले पाहिजे. त्यांच्यात उद्याचा संजय राऊत दिसत आहे. मिटकरी यांनी योग्य ठिकाणी योग्य वेळी थांबले तर ते महाराष्ट्रात नेते म्हणून परिचत होतील अन्यथा त्यांचा संजय राऊत झाल्याशिवाय राहणार नाही, या शब्दांत कुलकर्णी यांनी हल्लाबोल केला. 

दरम्यान, एसटी विलनीकरण, मराठा, धनगर आणि मुस्लिम आरक्षण बद्दल देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिले होते. पण ते आता विसरले आहेत. पुढील सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे. त्यासाठी पक्षातील, विरोधी पक्षातील अडथळे दूर करण्याचे काम भाजप करत आहे. राज्यातील १८ मंत्री निष्क्रिय असून पाच मंत्री बदलले जातील अशा चर्चा मागील काही दिवसापासून सुरू आहेत. या निष्क्रिय लोकांवर चादर घालण्याचे काम करून केवळ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडून होत, असा आरोपही कुलकर्णी यांनी केला. 

टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीcongressकाँग्रेसAmol Mitkariअमोल मिटकरीSanjay Rautसंजय राऊत