शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

काँग्रेसचे सहा उमेदवार ठरले; एक मोठ्ठा बदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2019 13:38 IST

नांदेडसह, सोलापूर, यवतमाळ, वर्धा, धुळे आणि दक्षिण मुंबई मतदारसंघातील उमेदवाराची नावे निश्चित

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी नांदेडसह, सोलापूर, यवतमाळ, वर्धा, धुळे आणि दक्षिण मुंबई मतदारसंघातील उमेदवाराची नावे काँग्रेस संसदीय मंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत निश्चित करण्यात आली. नांदेडमधून प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्याऐवजी त्यांच्या पत्नी आ.अमिता चव्हाण यांच्या नावाची पक्षश्रेष्ठींकडे शिफारस करण्यात येणार आहे.टिळक भवन येथे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत जिल्हा समित्यांकडून आलेल्या नावांवर चर्चा झाली. या चर्चेअंती नांदेडमधून अशोक चव्हाण यांच्या पत्नी आ. अमिता चव्हाण, सोलापुरातून सुशिलकुमार शिंदे, यवतमाळमधून माणिकराव ठाकरे, वर्धा येथून चारूलता टोकस, धुळ्यातून रोहिदास पाटील आणि दक्षिण मुंबईतून मिलिंद देवरा यांच्या नावाची दिल्लीतील केंद्रीय समितीकडे शिफारस करण्याचा निर्णय झाला. उत्तर मुंबई आणि उत्तर मध्य मुंबई मतदारसंघाबाबतचा निर्णय पुढे ढकलण्यात आला.या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना खा. चव्हाण म्हणाले, २६ मतदारसंघातील उमेदवारांबाबत चर्चा झाली. जिंकून येण्याचा निकष लक्षात घेऊन उमेदवार निश्चित करण्याचा प्रयत्न बैठकीत करण्यात आला. निश्चित केलेल्या उमेदवारांची यादी दिल्लीला पाठविण्यात येईल आणि तिथे उमेदवारीबाबत अंतिम निर्णय होईल. नगरमध्ये आमच्याकडे जिंकून येणारा उमेदवार आहे. तिथे आमची परिस्थिती राष्ट्रवादीपेक्षा चांगली असल्याचा दावाही चव्हाण यांनी केला. या बैठकीला माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, सुशीलकुमार शिंदे, शिवाजीराव पाटील निलंगेकर, पृथ्वीराज चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील, माणिकराव ठाकरे, विलास मुत्तेमवार, विजय वडेट्टीवार, संजय निरूपम, बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन पाटील, नसीम खान यांच्यासह महाराष्ट्राचे सहप्रभारी आशिष दुआ, संपत कुमार, वामशी रेड्डी, संपतकुमार, सोनल पटेल उपस्थित होते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९congressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस