शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

काँग्रेस पक्षाने व महाराष्ट्राने निष्ठावंत नेता गमावला- राजेंद्र दर्डा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2018 23:28 IST

शून्यातून विश्व निर्माण करणारा नेता म्हणून पतंगरावांची वेगळी ओळख होती.

मुंबई- काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांचं आज मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमध्ये निधन झालं. पतंगराव कदम यांच्या जाण्याने काँग्रेस पक्षात कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे. 

शून्यातून विश्व निर्माण करणारा नेता म्हणून पतंगरावांची वेगळी ओळख होती. १९९९ ते २०१४ या पंधरा वर्षांच्या काळात आमदार आणि मंत्री म्हणून त्यांच्यासोबत काम करण्याचा योग मला आला. अडचणीच्या वेळी ही वातावरणातील तणाव कमी करून हास्य फुलवण्याचे अनोखे कसब त्यांच्याकडे होते. ते औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री होते त्यावेळीही त्यांचा माझा जवळचा संबंध आला. शिक्षण आणि सहकार या क्षेत्रात त्यांनी लक्षणीय असे काम केले आहे. उद्योगमंत्री म्हणून त्यांनी केलेले काम ही नोंद घेण्याजोगे आहे. त्यांच्या जाण्यामुळे एक निष्ठावंत नेत्याला काँग्रेस पक्ष व महाराष्ट्र  मुकला आहे. मी जेव्हा जेव्हा त्यांना भेटायचो, तेव्हा ते बाबूजींच्या म्हणजे जवाहरलालजी दर्डांच्या अनेक आठवणी सांगायचे. त्यांच्या जाण्यामुळे महाराष्ट्राने कायम हसतमुख असणारा नेता गमावला आहे, अशी भावना लोकमत वृत्तसमूहाचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी व्यक्त केली आहे. 

 

पतंगराव कदम यांचा प्रवास थक्क करणारासांगली जिल्ह्यातील सोनसळ या लहान खेड्यातील सामान्य शेतकरी कुटुंबात पतंगरावांचा जन्म झाला. गावात चौथीपर्यंतचे शिक्षण घेऊन पुढे कुंडलला माध्यमिक शिक्षण पूर्ण करून पुणे गाठले. द्विपदवीधर झाले. शिक्षक झाले. एकशिक्षकी शाळेत काम केले. नंतर त्यांनी तेथेच १० मे १९६४ रोजी भारती विद्यापीठाची स्थापना केली. या संस्थेचे ते तहहयात कुलपती होते. काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळावी म्हणून धडपडणारे पतंगराव १९८० मध्ये अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरले आणि अडीचशे मतांनी पराभूत झाले. १९८५ मध्ये त्यांनी पुन्हा लढत दिली आणि आमदार झाले. तेव्हापासून १९९५ चा अपवाद वगळला तर सहावेळा ते निवडून आले. 

टॅग्स :Patangrao Kadamपतंगराव कदमcongressकाँग्रेसRajendra Dardaराजेंद्र दर्डा