शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
2
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
3
Tata Capital IPO: गुंतवणूकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक, टाटा कॅपिटलनं सेट केला प्राईज बँड; GMP पण सुस्साट, पाहा डिटेल्स
4
"वडिलांची जागा मी कधीच घेऊ शकत नाही, पण..."; ठाकरेंच्या आमदाराने घेतले श्वेताचे पालकत्व 
5
मुंब्रा अपघात काळ्या बॅगेमुळेच! तीन महिन्यांच्या चौकशी अहवालात कारण स्पष्ट
6
कोण आहेत मोहसिन नकवी? जे टीम इंडियाची ट्रॉफी घेऊन पळून गेले; 'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारताविरोधात...
7
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
8
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
9
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
10
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
11
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
12
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
13
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
14
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
15
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
16
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
17
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
18
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
19
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
20
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर

शिवसेनेच्या दोन्ही गटांनी टाळला संघर्ष; सभागृहात गोंधळ घातला नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2022 08:26 IST

तणावाऐवजी शांतता, शिवसेनेत आजवर झालेल्या सर्वात मोठ्या बंडाच्या पार्श्वभूमीवर आजचे अधिवेशन होत असतानाही विभागल्या गेलेल्या शिवसेनेच्या दोन गटांमध्ये एकाही प्रसंगात हमरीतुमरी झाली नाही.

मुंबई : विधानसभेच्या विशेष अधिवेशनात पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट विरुद्ध उद्धव ठाकरे गट आमनेसामने येऊन तणाव निर्माण होईल, असे म्हटले जात असताना दोन्ही बाजूंच्या सदस्यांनी संघर्ष, वाद करण्याचे टाळले. त्यामुळे अध्यक्षपदाची निवडणूक शांततेच्या वातावरणात पार पडली. 

शिवसेनेत आजवर झालेल्या सर्वात मोठ्या बंडाच्या पार्श्वभूमीवर आजचे अधिवेशन होत असतानाही विभागल्या गेलेल्या शिवसेनेच्या दोन गटांमध्ये एकाही प्रसंगात हमरीतुमरी झाली नाही. सभागृहाच्या बाहेर वा सभागृहातही दोन्ही गटांतील आमदारांनी एकमेकांशी कोणताही संवाद साधला नाही. इतक्या वर्षांमध्ये दोन्ही बाजूंचे आमदार एकाच पक्षात एकाच नेतृत्वाखाली काम करीत होते. इतक्या वर्षांचा ऋणानुबंध राहिला आहे, पण आज दोन गटांतील आमदार एकमेकांशी बोलणे तर सोडाच, पण बघतदेखील नव्हते. शिवसेनेच्या शिंदे गटातील आमदार आणि भाजपचे सगळे आमदार भगवे फेटे घालून आले होते. जय भवानी, जय शिवाजी, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो, जय श्रीरामच्या घोषणा शिंदे गट आणि भाजपचे आमदार देत होते. त्या मानाने ठाकरे गटातील आमदार शांत बसले होते. तीन तासांच्या अधिवेशनात तावातावाने एकदाच बोलले ते शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव. मात्र, समाजवादी पार्टीचे अबू आझमी यांनी औरंगाबाद व उस्मानाबादचे नामांतर केल्याबद्दल टीका सुरू केल्याने जाधव भडकले. त्या वादाला शिवसेनेतील वादाचा संदर्भ नव्हता. दोन्ही गटांतील आमदार वेलमध्ये उतरले, एकमेकांच्या अंगावर धावून गेले असा कोणताही प्रसंग उद्भवला नाही. 

सत्तांतर नाट्यानंतर प्रथमच आमने-सामने    शिवसेनेत गेले काही दिवस प्रचंड तणाव आहे. इतके दिवस बाहेर असलेले शिंदे गटाचे आमदार मुंबईत परतल्यानंतर आज पहिल्यांदाच ठाकरे गटाच्या आमदारांसमोर आले, पण दोन्ही बाजूंनी मर्यादांचे पालन करत सभागृहातील वातावरण बिघडू दिले नाही. बाहेर कितीही वाद असले तरी त्याचे पडसाद सभागृहात उमटणार नाही याची काळजी दोन्ही बाजूंच्या सदस्यांनी घेतली.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदे