शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

विस्तारीकरणाला इथेनॉल निर्मितीची अट : सुभाष देशमुख 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2019 19:15 IST

साखर कारखानदारी सध्या अडचणीच्या काळातून जात असून, कर्जाचा डोंगर वाढत आहे...

ठळक मुद्दे साखर कारखान्याच्या क्षमता वाढीसाठी ऊस क्षेत्र फुगवले जातेयदर वर्षी मंत्री समितीच्या गाळप हंगामाच्या निर्णयावर साखर परवान्याचे वितरण अवलंबून

पुणे : साखर कारखानदारी अडचणीत असताना काही कारखाने ऊस गाळप क्षमता वाढविण्यासाठी उसाचे क्षेत्र फुगवून सांगत आहेत. जर एखाद्या कारखान्याला विस्तारीकरण करायचे असल्यास त्यांनी साखरेऐवजी क्षमतेच्या निम्मे इथेनॉल निर्मितीची अट घालावी असा पर्याय सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी शनिवारी येथे सुचविला. दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकच्या वतीने कल्याणी नगर येथील एका हॉटेलमधे आयोजित साखर परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी देशमुख बोलत होते. साखर आयुक्त शेखर गायकवाड, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्त प्राजक्ता लवंगारे, वैधमापन शास्त्र विभागाच्या पुणे विभागाच्या उप नियंत्रक सीमा बैस, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर, समितीचे सदस्य अविनाश महागावकर या वेळी उपस्थित होते. देशमुख म्हणाले, साखर कारखानदारी सध्या अडचणीच्या काळातून जात असून, कजार्चा डोंगर वाढत आहे. कारखानदारीत व्यावसायिकता आणली की, नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारखाने अडचणीत आल्यास, त्यांचे कर्ज खाते असलेल्या बँका देखील अडचणीत येतात. परिणामी दोन्ही संस्था डबघाईला जातात. असे असताना काही कारखाने क्षमता विस्तारीकरण करीत आहेत. विस्तारीकरणाला काही आडकाठी नाही. मात्र, त्यासाठी एकमेकांच्या कारखाना क्षेत्रातील ऊस क्षेत्र आपलेच असल्याचे सांगितले जाते. कोणत्याही कारखान्याने असे क्षेत्र फुगवून सांगू नये. एखाद्या कारखान्याला क्षमता विस्तार करायचा असल्यास, कारखान्यापासून १५ किलोमीटर अंतरात ८० टक्के उसाच्या उपलब्धतेची अट घातली पाहिजे. तसेच, क्षमतेच्या ५० टक्के इथेनॉल निर्मिती त्या कारखान्याने केली पाहीजे. या अटींच्या आधारावरच संबंधित कारखान्याला विस्तारीकरणाची परवानगी दिली पाहिजे, असे देशमुख म्हणाले. दर वर्षी मंत्री समितीच्या गाळप हंगामाच्या निर्णयावर साखर परवान्याचे वितरण अवलंबून असते. यंदा दोन महिने आधीच साखर कारखान्यांना कार्यक्रम राबवून एका दिवसांत परवाने दिले जातील. परवाने देताना मंत्री समितीच्या निर्णयानुसार गाळप करावे अशी अट घातली जाईल, असे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले. ----------------------

...तर साखर कारखाना या हंगामात बंद ठेवा : गायकवाडयंदा राज्यात केवळ ६३ लाख टन साखरेचे उत्पादन होईल असा अंदाज आहे. आपल्या आर्थिक स्थितीचा विचार करुन यंदा साखर कारखाना सुरु करावा. तुलनेने कमी ऊस असल्यास एखादे युनिट सुरु ठेवावे, असा सल्ला साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिला.

टॅग्स :PuneपुणेSugar factoryसाखर कारखानेSubhash Deshmukhसुभाष देशमुखbankबँक