शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
3
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
4
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
5
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
6
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
7
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
8
Ahmedabad Plane Crash Live: भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
9
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारती कोसळल्या, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
10
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
11
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
12
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
13
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
14
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
15
"...तोपर्यंत चहा उकळत राहील"; हुंड्यासाठी छळाचा आरोप, तरुणाने सासरीच सुरू केली टपरी
16
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
17
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
18
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
19
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
20
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?

विस्तारीकरणाला इथेनॉल निर्मितीची अट : सुभाष देशमुख 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2019 19:15 IST

साखर कारखानदारी सध्या अडचणीच्या काळातून जात असून, कर्जाचा डोंगर वाढत आहे...

ठळक मुद्दे साखर कारखान्याच्या क्षमता वाढीसाठी ऊस क्षेत्र फुगवले जातेयदर वर्षी मंत्री समितीच्या गाळप हंगामाच्या निर्णयावर साखर परवान्याचे वितरण अवलंबून

पुणे : साखर कारखानदारी अडचणीत असताना काही कारखाने ऊस गाळप क्षमता वाढविण्यासाठी उसाचे क्षेत्र फुगवून सांगत आहेत. जर एखाद्या कारखान्याला विस्तारीकरण करायचे असल्यास त्यांनी साखरेऐवजी क्षमतेच्या निम्मे इथेनॉल निर्मितीची अट घालावी असा पर्याय सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी शनिवारी येथे सुचविला. दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकच्या वतीने कल्याणी नगर येथील एका हॉटेलमधे आयोजित साखर परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी देशमुख बोलत होते. साखर आयुक्त शेखर गायकवाड, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्त प्राजक्ता लवंगारे, वैधमापन शास्त्र विभागाच्या पुणे विभागाच्या उप नियंत्रक सीमा बैस, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर, समितीचे सदस्य अविनाश महागावकर या वेळी उपस्थित होते. देशमुख म्हणाले, साखर कारखानदारी सध्या अडचणीच्या काळातून जात असून, कजार्चा डोंगर वाढत आहे. कारखानदारीत व्यावसायिकता आणली की, नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारखाने अडचणीत आल्यास, त्यांचे कर्ज खाते असलेल्या बँका देखील अडचणीत येतात. परिणामी दोन्ही संस्था डबघाईला जातात. असे असताना काही कारखाने क्षमता विस्तारीकरण करीत आहेत. विस्तारीकरणाला काही आडकाठी नाही. मात्र, त्यासाठी एकमेकांच्या कारखाना क्षेत्रातील ऊस क्षेत्र आपलेच असल्याचे सांगितले जाते. कोणत्याही कारखान्याने असे क्षेत्र फुगवून सांगू नये. एखाद्या कारखान्याला क्षमता विस्तार करायचा असल्यास, कारखान्यापासून १५ किलोमीटर अंतरात ८० टक्के उसाच्या उपलब्धतेची अट घातली पाहिजे. तसेच, क्षमतेच्या ५० टक्के इथेनॉल निर्मिती त्या कारखान्याने केली पाहीजे. या अटींच्या आधारावरच संबंधित कारखान्याला विस्तारीकरणाची परवानगी दिली पाहिजे, असे देशमुख म्हणाले. दर वर्षी मंत्री समितीच्या गाळप हंगामाच्या निर्णयावर साखर परवान्याचे वितरण अवलंबून असते. यंदा दोन महिने आधीच साखर कारखान्यांना कार्यक्रम राबवून एका दिवसांत परवाने दिले जातील. परवाने देताना मंत्री समितीच्या निर्णयानुसार गाळप करावे अशी अट घातली जाईल, असे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले. ----------------------

...तर साखर कारखाना या हंगामात बंद ठेवा : गायकवाडयंदा राज्यात केवळ ६३ लाख टन साखरेचे उत्पादन होईल असा अंदाज आहे. आपल्या आर्थिक स्थितीचा विचार करुन यंदा साखर कारखाना सुरु करावा. तुलनेने कमी ऊस असल्यास एखादे युनिट सुरु ठेवावे, असा सल्ला साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिला.

टॅग्स :PuneपुणेSugar factoryसाखर कारखानेSubhash Deshmukhसुभाष देशमुखbankबँक