शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

व्याघ्र संरक्षणाबाबत ‘एनटीसीए’त चिंता, १२ आशियाई देशांच्या प्रतिनिधींची उपस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2019 16:32 IST

देशात अडीच ते तीन हजार वाघ असून, व्याघ्र प्रकल्पाबाहेर ३० ते ३५ टक्के वाघ आहेत. यातून मानव-वन्यजीव संघर्ष, शिकारी, अवयवांची तस्करी, व्याघ्रांचा संचार मार्ग आदी समस्यांविषयी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने (एनटीसीए) चिंता व्यक्त केली आहे.

 अमरावती  - देशात अडीच ते तीन हजार वाघ असून, व्याघ्र प्रकल्पाबाहेर ३० ते ३५ टक्के वाघ आहेत. यातून मानव-वन्यजीव संघर्ष, शिकारी, अवयवांची तस्करी, व्याघ्रांचा संचार मार्ग आदी समस्यांविषयी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने (एनटीसीए) चिंता व्यक्त केली आहे. भारतातीलजंगलाच्या तुलनेत १० ते १५ हजार वाघांचे सहजतेने संवर्धन होऊ शकते, असा अभ्यासपूर्ण आढावा सादर करण्यात आला आहे. एनटीसीएच्या पुढाकाराने दिल्ली येथे २८ व २९ जानेवारी रोजी व्याघ्र संवर्धन करणाºया १२ आशियाई देशाच्या प्रतिनिधींची तिसरी स्कॉक टेकींग परिषद घेण्यात आली. या परिषदेचे उद्घाटन केंद्रीय वने व पर्यावरणमंत्री हर्षवर्धन यांच्या हस्ते करण्यात आले. थायलंड, कोलंबिया, व्हिएतनाम, रशिया, इंडोनेशिया, भूतान, कंबोडीया, मलेशिया, मॅनमार्क, लायोस, नेपाळ व भारत देशाचे प्रतिनिधी परिषदेत सहभागी झाले होते. यात व्याघ्र अभ्यासक विलास कारंभ, राजेश गोपाल, वाय. झाला यांनी देशातील वाघ संवर्धनाविषयी चिंता वर्तविल केली.महाराष्ट्रातून पेंच व्याघ्र प्रकल्पातून रामाराव, रवि गोवेकर, सह्यांद्रीचे गुजर यांची उपस्थिती होती. चीन वगळता अन्य १२ आशियाई देशाचे प्रतिनिधींनी सन- २०२० पर्यंत वाघांची संख्या दुप्पट करण्याविषयी मते वजा आढावा सादर केला. जगातील एकूण वाघांपैकी ५७ टक्के वाघ एकट्या भारतात आहेत. त्यामुळे भारताला 'व्याघ्रभूमी' असे संबोधले जाते. मात्र, अलीक डे वाघांचे संरक्षण, संवर्धनाचा विषय ऐरणीवर आला आहे. व्याघ्र प्रकल्पाबाहेर वाघांचे संचार चिंताजनक असल्याची बाब या परिषदेत मांडली गेली. भारतात वाघांच्या संख्येनुसार वन्यजीवांचे व्यवस्थापन योग्यप्रकारे होत नाही. देशात सन २०१४ मध्ये २,२६६ वाघांची संख्या होती. आता ती अडीच ते तीन हजांरांवर पोहचली आहे. व्याघ्रांचे संवर्धन, संरक्षणासाठी आवश्यक उपाययोजना करण्यासाठी वन्यजीव व्यवस्थापन महत्वाचे असल्याबाबतचे मत परिषदेतून मांडल्या गेले. चीनमध्ये वाघ अवयांची तस्करी होत असल्याची बाब अन्य आशियाई देशांच्या प्रतिनिधींनी मांडली आहे.      व्याघ्रांच्या संवर्धनाविषयी परिषदेत या मुद्द्यावर मंथन- व्याघ्रांचे संचार मार्ग धोकादायक- मानव -वन्यजीव संघर्ष टाळण्याबाबत उपाययोजना - व्याघ्र अवयवांची तस्करी रोखणे- शिका-यांवर अंकुश मिळविणे- वन्यजीव व्यवस्थापन कृती आराखडा तयार करणे- व्याघ्र प्रकल्पाबाहेरील वाघांचे संरक्षण      व्याघ्रभूमी अशी भारताची ओळख आहे. मात्र, वाघांचे मृत्यू, शिकारी, अवयवांची तस्करी या घटनांमध्ये वाढ होत आहे. भारत वगळता अन्य आशियाई देशांनी सन २०२० पर्यंत वाघांची संख्या दुप्पट करण्याचा मानस केला आहे. देशात वन्यजीव व्यवस्थापनात उणिवा आहेत.- यादव तरटे पाटील,  वन्यजीव अभ्यासक, अमरावती

टॅग्स :TigerवाघforestजंगलMaharashtraमहाराष्ट्रIndiaभारत