शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

व्याघ्र संरक्षणाबाबत ‘एनटीसीए’त चिंता, १२ आशियाई देशांच्या प्रतिनिधींची उपस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2019 16:32 IST

देशात अडीच ते तीन हजार वाघ असून, व्याघ्र प्रकल्पाबाहेर ३० ते ३५ टक्के वाघ आहेत. यातून मानव-वन्यजीव संघर्ष, शिकारी, अवयवांची तस्करी, व्याघ्रांचा संचार मार्ग आदी समस्यांविषयी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने (एनटीसीए) चिंता व्यक्त केली आहे.

 अमरावती  - देशात अडीच ते तीन हजार वाघ असून, व्याघ्र प्रकल्पाबाहेर ३० ते ३५ टक्के वाघ आहेत. यातून मानव-वन्यजीव संघर्ष, शिकारी, अवयवांची तस्करी, व्याघ्रांचा संचार मार्ग आदी समस्यांविषयी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने (एनटीसीए) चिंता व्यक्त केली आहे. भारतातीलजंगलाच्या तुलनेत १० ते १५ हजार वाघांचे सहजतेने संवर्धन होऊ शकते, असा अभ्यासपूर्ण आढावा सादर करण्यात आला आहे. एनटीसीएच्या पुढाकाराने दिल्ली येथे २८ व २९ जानेवारी रोजी व्याघ्र संवर्धन करणाºया १२ आशियाई देशाच्या प्रतिनिधींची तिसरी स्कॉक टेकींग परिषद घेण्यात आली. या परिषदेचे उद्घाटन केंद्रीय वने व पर्यावरणमंत्री हर्षवर्धन यांच्या हस्ते करण्यात आले. थायलंड, कोलंबिया, व्हिएतनाम, रशिया, इंडोनेशिया, भूतान, कंबोडीया, मलेशिया, मॅनमार्क, लायोस, नेपाळ व भारत देशाचे प्रतिनिधी परिषदेत सहभागी झाले होते. यात व्याघ्र अभ्यासक विलास कारंभ, राजेश गोपाल, वाय. झाला यांनी देशातील वाघ संवर्धनाविषयी चिंता वर्तविल केली.महाराष्ट्रातून पेंच व्याघ्र प्रकल्पातून रामाराव, रवि गोवेकर, सह्यांद्रीचे गुजर यांची उपस्थिती होती. चीन वगळता अन्य १२ आशियाई देशाचे प्रतिनिधींनी सन- २०२० पर्यंत वाघांची संख्या दुप्पट करण्याविषयी मते वजा आढावा सादर केला. जगातील एकूण वाघांपैकी ५७ टक्के वाघ एकट्या भारतात आहेत. त्यामुळे भारताला 'व्याघ्रभूमी' असे संबोधले जाते. मात्र, अलीक डे वाघांचे संरक्षण, संवर्धनाचा विषय ऐरणीवर आला आहे. व्याघ्र प्रकल्पाबाहेर वाघांचे संचार चिंताजनक असल्याची बाब या परिषदेत मांडली गेली. भारतात वाघांच्या संख्येनुसार वन्यजीवांचे व्यवस्थापन योग्यप्रकारे होत नाही. देशात सन २०१४ मध्ये २,२६६ वाघांची संख्या होती. आता ती अडीच ते तीन हजांरांवर पोहचली आहे. व्याघ्रांचे संवर्धन, संरक्षणासाठी आवश्यक उपाययोजना करण्यासाठी वन्यजीव व्यवस्थापन महत्वाचे असल्याबाबतचे मत परिषदेतून मांडल्या गेले. चीनमध्ये वाघ अवयांची तस्करी होत असल्याची बाब अन्य आशियाई देशांच्या प्रतिनिधींनी मांडली आहे.      व्याघ्रांच्या संवर्धनाविषयी परिषदेत या मुद्द्यावर मंथन- व्याघ्रांचे संचार मार्ग धोकादायक- मानव -वन्यजीव संघर्ष टाळण्याबाबत उपाययोजना - व्याघ्र अवयवांची तस्करी रोखणे- शिका-यांवर अंकुश मिळविणे- वन्यजीव व्यवस्थापन कृती आराखडा तयार करणे- व्याघ्र प्रकल्पाबाहेरील वाघांचे संरक्षण      व्याघ्रभूमी अशी भारताची ओळख आहे. मात्र, वाघांचे मृत्यू, शिकारी, अवयवांची तस्करी या घटनांमध्ये वाढ होत आहे. भारत वगळता अन्य आशियाई देशांनी सन २०२० पर्यंत वाघांची संख्या दुप्पट करण्याचा मानस केला आहे. देशात वन्यजीव व्यवस्थापनात उणिवा आहेत.- यादव तरटे पाटील,  वन्यजीव अभ्यासक, अमरावती

टॅग्स :TigerवाघforestजंगलMaharashtraमहाराष्ट्रIndiaभारत