शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली ब्लास्टचं इंटरनॅशनल कनेक्शन? पाकिस्तानच नव्हे, 'या' मुस्लीम देशाचं नावही येतंय समोर; पासपोर्टवरून धक्कादायक खुलासा!
2
शिवसेना कुणाची? आता सुप्रीम कोर्टात पुढच्याच वर्षी अंतिम सुनावणी होणार; आजची तारीख पुढे ढकलली
3
₹१ च्या शेअरची कमाल, १ लाखांच्या गुंतवणूकीचे झाले ₹१ कोटी; ₹१४५ वर आला भाव, तुमच्याकडे आहे का?
4
लग्नात बूट चोरल्यानं भडकला नवरा, वरमाला फेकली; नाराज नवरीनेही लग्न मोडले, अनवाणीच परत पाठवला
5
वनप्लस 15 ची किंमत रिलायन्स डिजिटलने लीक केली, डिलीटही केली पण...; गुगलवर आताही दिसतेय...
6
Swami Samartha: देवाजवळ दिवा लावताना काच फुटली, दिवा पडला तर स्वामींना करावी 'ही' प्रार्थना!
7
अतूट प्रेम! कोमात असलेल्या लेकीला शुद्धीवर आणण्यासाठी १० वर्ष आईने रोज केला डान्स अन्...
8
सलग तिसऱ्या दिवशी बाजारात तेजी! IT शेअर्समध्ये जोरदार खरेदी, एशियन पेंट्स टॉप गेनर, कुठे झाली घसरण?
9
Delhi Blast : "दावत के लिए बिरयानी तैयार..."; दिल्ली स्फोटासाठी खास कोडवर्ड, चॅट बॉक्समध्ये धक्कादायक खुलासा
10
Shreeji Global FMCG Shares: पहिल्याच दिवशी शेअरची स्थिती खराब; १२५ रुपयांचा शेअर आला ९९ रुपयांवर, गुंतवणूकदारांवर डोकं धरण्याची वेळ
11
बिहार निवडणुकीत NDA पराभूत झाल्यास निफ्टी ७% पर्यंत घसरू शकतो? ब्रोकरेज फर्मने दिला इशारा
12
सोनम-राजाचं लग्न ते बेवफाई अन् हत्या... सगळं समोर येणार! राजा रघुवंशी हत्या प्रकरणात कुणी दिली पहिली साक्ष?
13
जीएसटी रद्द झाल्यानं जीवन, आरोग्य विमा घेण्याचं प्रमाण वाढलं; प्रीमियम वाढून ३४,००७ कोटी रुपयांवर 
14
'पैसे दुप्पट' करणारा ते अल फलाह युनिव्हर्सिटीचा मालक; हा जावेद अहमद सिद्दीकी कोण?
15
दिल्ली नाही, टार्गेटवर होते अयोध्या-काशी; चौकशीत नवीन धक्कादायक माहिती समोर आली
16
Delhi Blast: शाहीन शाहीदचा महाराष्ट्रातील डॉ. हयात जफर सोबत घटस्फोट का झालेला, कोणत्या मुद्द्यावरून बिनसलेलं?
17
शेख हसीना बांगलादेशला परतण्यास तयार, परतीसाठीच्या अटी सांगितल्या; मोहम्मद युनूस यांच्यावर केली टीका
18
PM Modi: भूतानहून परतताच मोदींनी एलएनजेपी रुग्णालय गाठलं, दिल्ली बॉम्बस्फोटातील जखमींना भेटले!
19
दिल्ली स्फोटात 'डबल ॲटॅक'चा संशय! घटनास्थळी अमोनियम नायट्रेटसह 'दुसरे शक्तिशाली' स्फोटक आढळले
20
पार्सल, मनी ऑर्डर, इन्शुरन्स प्रीमिअम : सर्व कामं एका क्लिकवर; पोस्ट ऑफिसची नवी 'सेवा' 

स्पर्धा परीक्षा ठरत आहेत करिअरचा राजमार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 00:07 IST

स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात अनेक सकारात्मक व नकारात्मक गोष्टी बघायला मिळतात.

- प्रा. राजेंद्र चिंचोलेकेंद्रीय पातळीवरील कर्मचारी व अधिकारी निवडीसाठी केंद्रीय लोकसेवा आयोग (वढरउ), स्टाफ सिलेक्शन कमिशन, स्टेट बँक, आय.बी.पी.एस., रेल्वे भरती मंडळे यांच्यामार्फत वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात. वढरउद्वारे नागरी सेवा परीक्षा (उरए) ही देशातील अत्यंत महत्त्वाची व प्रतिष्ठेची परीक्षा घेतली जाते. वढरउद्वारे संयुक्त संरक्षण सेवा (सी.डी.एस) परीक्षा, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एन.डी.ए) परीक्षा, कंबाइन आर्म पोलीस फोर्स (असिस्टंट कमांडंट) परीक्षा, भारतीय वनसेवा (आय.एफ.एस) परीक्षा, भारतीय अभियांत्रिकी (आय.ई.एस.) परीक्षा यांसारख्या महत्त्वाच्या परीक्षा दरवर्षी घेतल्या जातात. स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे एकत्रित पदवी स्तर (सीजीएल), एकत्रित उच्च माध्यमिक स्तर (उऌरछ), एकत्रित ग्राउंड ड्युटी (एसएससी उॠऊ) या परीक्षांमार्फत लाखावर विद्यार्थ्यांना शासकीय सेवेत जाण्याची संधी मिळते.

बँकेतील मॅनेजर, क्लार्क, विशेष अधिकारी यांच्या भरतीसाठी एस.बी.आय.पी.ओ, एस.बी.आय क्लार्क, आय.बी.पी.एस.पी.ओ, आय.बी.पी.एस.क्लार्क, आय.बी.पी.एस.स्पेशालिस्ट आॅफिसर या परीक्षा घेतल्या जातात. राज्य शासकीय कर्मचारी व अधिकारी निवडीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग (टढरउ), निवड समिती यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात. टढरउद्वारे राज्यसेवा परीक्षा, राज्यकर निरीक्षक, सहायक कक्ष अधिकारी, पोलीस उपनिरीक्षक, कर सहायक, दुय्यम निरीक्षक, लिपिक-टंकलेखक, वनसेवा, कृषिसेवा, अभियांत्रिकी सेवा परीक्षा घेण्यात येतात. स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून संरक्षण दलात करिअर करण्याच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत. संरक्षण दलातील नोकरी हे राष्ट्रसेवेचे कार्य आहे.

स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात अनेक सकारात्मक व नकारात्मक गोष्टी बघायला मिळतात. स्पर्धा परीक्षांमध्ये सर्व ज्ञानशाखांच्या विद्यार्थ्यांना समान संधी आहे. स्पर्धा परीक्षांच्या दिशेने वाढत जाणाऱ्या दिशाहीन गर्दीमुळे क्लासच्या माध्यमातून हजारो कोटींची उलाढाल होत आहे. आपली क्षमता, आपली पात्रता, आपल्या मर्यादा प्रत्येकाने ओळखल्या पाहिजेत. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाºया विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड ताणतणाव जाणवतो. आयुष्यातील महत्त्वाचा काळ तयारीसाठी खर्च करून बºयाच विद्यार्थ्यांना यश मिळत नाही. कमी पदसंख्या, प्रचंड स्पर्धा, आर्थिक अडचण, वाढते वय, कुटुंबाची जबाबदारी, सामाजिक दबाव, कमी दर्जाचे काम करण्याची नसलेली मानसिकता या नकारात्मक बाजू आहेत.

यशासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, पण त्यासोबत आपला प्लॅन बी तयार ठेवावा. प्लॅन बी म्हणजे, आपण जर स्पर्धा परीक्षेत यश मिळवू शकलो नाही, तर दुसºया क्षेत्रातही आपल्याला चांगल्या पद्धतीने करिअर करता यावे. शिक्षणासंबंधीचा व्यवसाय किंवा नोकरी करावी. विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाद्वारे प्राप्त केलेले ज्ञान त्यांच्याकडील कौशल्य, बुद्धिमत्ता, क्षमता, कला यांच्या माध्यमातून सर्वोत्कृष्ट करिअर करण्याचा प्रयत्न करावा.

स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी स्वकर्तृत्वावर विश्वास, आपल्या क्षमता व मर्यादा यांची जाणीव, ध्येयनिश्चिती, जिद्द, दुर्दम्य इच्छाशक्ती, प्रयत्न यांची जोड दिल्यास विद्यार्थी करिअरचे यशोशिखर गाठू शकतात. स्पर्धा परीक्षा हे साधन असून, अधिकारी बनून देशाची सेवा करणे हे साध्य आहे. सरकारी अधिकारी बनून स्थिर आणि आव्हानात्मक करिअरच्या माध्यमातून देशाची व समाजाची प्रामाणिकपणे, परिणामकारक सेवा करता येते. समाजात मान, सन्मान, आदर, कीर्ती, प्रतिष्ठा प्राप्त होते. स्पर्धा परीक्षेत परिश्रम, सूत्रबद्ध, शिस्तबद्ध, सातत्यपूर्ण व नियोजनपूर्वक अभ्यास यशाची गुरुकिल्ली आहे.

स्पर्धा परीक्षांद्वारे प्रत्येकाला आपली गुणवत्ता, आपले सामर्थ्य, आपली क्षमता, आपले कौशल्य, आपले व्यक्तिमत्त्व दाखविण्याची संधी आहे. करिअरचा एक पर्याय म्हणून स्पर्धा परीक्षांना प्राधान्य देण्याची मानसिकता मराठी विद्यार्थ्यांमध्ये व पालकांमध्ये वाढली आहे. विद्यार्थी व पालकांमध्ये स्पर्धा परीक्षांविषयी सातत्याने वाढणारी जागृती, माहिती व मार्गदर्शनाची उपलब्धता, देशाची व समाजाची सेवा करण्याची संधी, खासगी क्षेत्रातील मंदी, यामुळे स्पर्धा परीक्षा करिअरचा राजमार्ग ठरत आहे. या स्पर्धा परीक्षांविषयी जाणून घेऊ दर पंधरा दिवसांनी...

टॅग्स :Studentविद्यार्थीMaharashtraमहाराष्ट्रexamपरीक्षा