शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षणाच्या मागणीला मा.क.प. चा पाठिंबा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2018 18:06 IST

मराठा आरक्षणाच्या मागणीला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने पाठिंबा जाहीर केला आहे. 

मुंबई - मराठा आरक्षणाच्या मागणीला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने पाठिंबा जाहीर केला आहे. मराठा समाजातील गरजूंना शिक्षण व नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळावे यासाठी इतरांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला क्रिमी लेयर वगळून आरक्षण मिळावे या मागणीला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आपला पाठिंबा जाहीर करत आहे. मराठा समाजातील आंदोलकांनी संयम पाळून शांततेच्या मार्गाने आंदोलन चालवावे असे आवाहनही पक्ष करत आहे, असे माकपने आपल्या पत्रकात म्हटले आहे.

सोमवारी औरंगाबाद जिल्ह्यातील जलसमाधी आंदोलनातील अत्यंत दुर्दैवी घटनेनंतर मराठा आरक्षणाचा प्रश्न महाराष्ट्रात पुन्हा उफाळून आला आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष कालच्या आंदोलनात मृत्यू पावलेल्या काकासाहेब दत्तात्रय शिंदे या २८ वर्षांच्या तरुणाला श्रद्धांजली वाहत आहे.  

गेल्या २७ वर्षांतील विविध केंद्र सरकारांच्या व महाराष्ट्र राज्य सरकारांच्या नवउदारवादी आर्थिक-सामाजिक धोरणांमुळे शेतीतील अभूतपूर्व अरिष्ट, वाढत्या बेरोजगारीचा भस्मासुर आणि बाजारीकरणामुळे शिक्षणातील संकट अत्यंत तीव्र झाले आहे. शेतीतील या अरिष्टामुळे महाराष्ट्रात गेल्या २५ वर्षांत सुमारे ७० हजार शेतकऱ्यांना कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करावी लागली आहे. या आत्महत्यांत मराठा शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक असून ओबीसी शेतकऱ्यांची संख्या त्याच्या खालोखाल आहे. तसेच इतर सर्व जातीधर्मातील शेतकऱ्यांचा अशा आत्महत्यांत समावेश आहे. आरक्षणाची मागणी तीव्र होण्यामागे, शेतीतील हे अरिष्ट एक प्रमुख कारण आहे, याची दखल धोरणकर्त्यांनी घ्यावी, असे आवाहन माकप करत आहे.

भाजपच्या नेतृत्वाखालील मोदी सरकारच्या गेल्या चार वर्षांतील काळात शेती, शिक्षण आणि रोजगार या तिन्ही क्षेत्रांतील परिस्थिती चिघळून ती अत्यंत विदारक झाली आहे. शेतीबरोबरच शिक्षण व रोजगाराच्या संधी घटत चालल्याने सर्वच जातीधर्मातील तरुणांमध्ये अत्यंत संतापाची भावना निर्माण झाली आहे. आंदोलनाच्या निमित्ताने त्यांचा हा असंतोष बाहेर पडतो आहे. शेतीसाठी योग्य धोरण व सर्वांना शिक्षण व रोजगाराच्या पुरेशा संधी उपलब्ध करून देण्यासाठी तातडीने पडले टाकण्याची आवश्यकता यातून स्पष्ट होते आहे.

मराठा आरक्षणाची मागणी, तसेच अन्य राज्यांत पाटीदार (पटेल), जाट आदी आरक्षणाची मागणी त्यामुळेच उफाळून आली आहे. या सर्व बाबतीत भाजपच्या केंद्र व राज्य सरकारांनी अक्षम्य चालढकल केल्यामुळे आंदोलने पेटत आहेत. 

मराठा आरक्षण आणि त्याच्याशी संबंधित मुद्दे याविषयी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची भूमिका पुढीलप्रमाणे आहे:

१. मराठा समाजाला त्यातील क्रिमी लेयर वगळून शिक्षण आणि रोजगाराच्या संधींमध्ये आरक्षण मिळाले पाहिजे.

२. आज असलेले दलित, आदिवासी, भटके विमुक्त आणि ओबीसी (ओबीसीतील क्रिमी लेयर वगळून) यांच्यासाठी असलेले आरक्षण कायम राहिले पाहिजे.

३. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणासाठी घालून दिलेली ५० टक्क्यांची मर्यादा असल्यामुळे मराठा आरक्षण शक्य करण्यासाठी केंद्र सरकारने योग्य ते उपाय तातडीने योजले पाहिजेत.

४. आरक्षणाचा आवाका वाढविण्यासाठी खाजगी क्षेत्रातही वरील सर्व समाज घटकांसाठी आरक्षणाची तरतूद असली पाहिजे.

५. वर उल्लेख केलेल्या घटकांच्या आरक्षणाला संपूर्ण पाठिंबा देत असतानाच, केवळ आरक्षण दिल्याने आजवर कोणत्याही समाजाचे शिक्षण आणि रोजगारविषयक प्रश्न पूर्णतः सुटलेले नाहीत हे लक्षात ठेवले पाहिजे. ते आमूलाग्र स्वरूपात सोडविण्यासाठी सर्वच क्षेत्रांत संपूर्णतः पर्यायी धोरणे घेण्याची नितांत गरज आहे.

६. एससी/एसटी अत्याचार प्रतिबंधक कायदा पातळ करण्याचा सर्वोच्च न्यायालयाने घेतलेला निर्णय अत्यंत अयोग्य आहे. त्यावर मात करण्यासाठी केंद्र सरकार नवीन कायदा व अध्यादेश आणण्यात कमालीची चालढकल करत आहे. सरकारने ही चालढकल त्वरित थांबवून हा अध्यादेश काढला पाहिजे आणि कायदा केला पाहिजे.

७. आज आरक्षणाबरोबरच सर्व शेतकरी-शेतमजुरांचे कर्ज सरसकट माफ करणे, स्वामिनाथन आयोगाच्या रास्त भावाबाबतच्या व इतर सर्व शिफारसी अमलात आणणे, शेतकरी-शेतमजुरांना वाढीव पेन्शन देणे, खऱ्याखुऱ्या शेतकरीहिताची सर्वंकष पीक विमा योजना लागू करणे, मनरेगा (महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजने)चा मोठा विस्तार करून ती शहरी भागातही सुरू करणे, सरकारी नोकऱ्यांमधील सर्व रिक्त जागा भरणे, शिक्षणाचे सार्वत्रिकरण करून त्याचे बाजारीकरण रोखणे अशी अनेक पावले सरकारने उचलण्याची सक्त निकड आहे. ते करण्याऐवजी भाजपचे सरकार जातीधर्माच्या आधारावर समाजामध्ये हिंसक फूट पाडण्याचे कारस्थान करत आहे. 

वरील सर्व प्रश्नांवर भाजप सरकारच्या जनविरोधी आणि कॉर्पोरेटधार्जिण्या धोरणांविरुद्ध येत्या ९ ऑगस्ट रोजी 'छोडो भारत' दिनी अखिल भारतीय किसान सभा, सेन्टर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स आणि अखिल भारतीय शेतमजूर युनियन यांच्या संयुक्त नेतृत्वाखाली देशभर लाखो शेतकरी-कामगारांचे जबरदस्त जेल भरो आंदोलन होणार आहे आणि ५ सप्टेंबर रोजी वरील तिन्ही संघटनांतर्फे दिल्लीत लाखोंची अभूतपूर्व मजदूर-किसान संघर्ष रॅली होणार आहे. या दोन्ही कृतीत सर्वच जाती-धर्मातील श्रमिकांना प्रचंड संख्येने सहभागी होण्याचे आवाहन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष करत आहे.  

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाmarathaमराठाreservationआरक्षण