शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
3
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
4
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
5
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
6
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
7
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
8
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
9
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
10
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
11
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
12
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
13
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
14
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
15
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
16
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
17
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
18
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
19
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस

चला मुलांनो, शाळेत चला!; १५ जुलैपासून कोरोनामुक्त भागात ८ वी ते १२ वीचे वर्ग भरणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2021 11:42 IST

शाळा सुरू करण्याचा निर्णय घेताना एक महिना आधी गावात एकही कोविड रुग्ण नको, असा नवा निकष आहे.  प्रत्यक्ष वर्गांचा कालावधी हा तीन ते चार तासांपेक्षा अधिक असू नये, असेही अधोरेखित केले आहे.

मुंबई : ‘चला मुलांनो, शाळेत चला’ या मोहिमेनुसार राज्यातील कोविडमुक्त भागात १५ जुलैपासून आठवी ते बारावीचे वर्ग प्रत्यक्षात सुरू करण्यात येणार आहेत. याबाबतचा सुधारित सरकारी निर्णय शिक्षण विभागाकडून बुधवारी जारी करण्यात आला आहे. त्यासाठी ग्रामपंचायत स्तरावरील समिती आणि पालकांचा ठराव होऊन मान्यता मिळणे आवश्यक आहे.शाळा सुरू करण्याचा निर्णय घेताना एक महिना आधी गावात एकही कोविड रुग्ण नको, असा नवा निकष आहे.  प्रत्यक्ष वर्गांचा कालावधी हा तीन ते चार तासांपेक्षा अधिक असू नये, असेही अधोरेखित केले आहे.ग्रामपंचायत स्तरावर सरपंचाच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेली सात सदस्यीय समिती शाळा सुरू करण्याचा निर्णय घेईल, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. शाळा सुरू करण्याआधी शिक्षकांच्या लसीकरणाला प्राधान्य देऊन त्याची जबाबदारी जिल्हाधिकारी यांनी नियोजन करून पार पाडावी, अशा सूचनाही आहेत. शाळा सुरू झाल्यावर शिक्षक, कर्मचारी वर्ग, विद्यार्थी आजारी पडल्यास त्यांच्या अलगीकरणाचे नियोजन, तसेच शाळा काही दिवसांसाठी बंद करावी लागल्यास शिक्षण सुरू राहण्यासाठीचा आराखडा शाळेने तयार करावा, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

शहरी भागांतील शाळांबाबत संभ्रमग्रामीण भागातील शाळांसाठी ठराव कोणी करावा यासंदर्भात सूचना आहेत. मात्र, शहरी भागात ही जबाबदारी कोणाची असेल याबाबत स्पष्टता नसल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. फक्त ग्रामीण भागातील शाळाच सुरू करायच्या का, असा प्रश्न शिक्षक, मुख्याध्यापक विचारत आहेत.

शाळा सुरू करताना महत्त्वाचे निकष- शिक्षकांची आरटीपीसीआर चाचणी आवश्यक- वर्गामध्ये एका बाकावर एक विद्यार्थी- शाळेतील स्नेहसंमेलन, परिपाठावर कडक निर्बंध- शिक्षक, विद्यार्थी यांची दैनंदिन थर्मल स्क्रीनिंग अनिवार्य

अकोल्यातील कापशी गावात साेमवारपासून शाळा- सरकारी निर्देशांचे पालन करीत अकाेला तालुक्यातील कापशी ग्रामपंचायतीने शाळा सुरू करण्याचा ठराव घेतला आहे. - साेमवार, १२ जुलै रोजी शाळा सुरू हाेणारे कापशी हे जिल्ह्यातील पहिले गाव ठरणार आहे. येथे सर्वप्रथम इयत्ता आठवी, नववी व दहावीचे वर्ग सुरू होणार आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSchoolशाळाcollegeमहाविद्यालयStudentविद्यार्थीTeacherशिक्षक