शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

चला मुलांनो, शाळेत चला!; १५ जुलैपासून कोरोनामुक्त भागात ८ वी ते १२ वीचे वर्ग भरणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2021 11:42 IST

शाळा सुरू करण्याचा निर्णय घेताना एक महिना आधी गावात एकही कोविड रुग्ण नको, असा नवा निकष आहे.  प्रत्यक्ष वर्गांचा कालावधी हा तीन ते चार तासांपेक्षा अधिक असू नये, असेही अधोरेखित केले आहे.

मुंबई : ‘चला मुलांनो, शाळेत चला’ या मोहिमेनुसार राज्यातील कोविडमुक्त भागात १५ जुलैपासून आठवी ते बारावीचे वर्ग प्रत्यक्षात सुरू करण्यात येणार आहेत. याबाबतचा सुधारित सरकारी निर्णय शिक्षण विभागाकडून बुधवारी जारी करण्यात आला आहे. त्यासाठी ग्रामपंचायत स्तरावरील समिती आणि पालकांचा ठराव होऊन मान्यता मिळणे आवश्यक आहे.शाळा सुरू करण्याचा निर्णय घेताना एक महिना आधी गावात एकही कोविड रुग्ण नको, असा नवा निकष आहे.  प्रत्यक्ष वर्गांचा कालावधी हा तीन ते चार तासांपेक्षा अधिक असू नये, असेही अधोरेखित केले आहे.ग्रामपंचायत स्तरावर सरपंचाच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेली सात सदस्यीय समिती शाळा सुरू करण्याचा निर्णय घेईल, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. शाळा सुरू करण्याआधी शिक्षकांच्या लसीकरणाला प्राधान्य देऊन त्याची जबाबदारी जिल्हाधिकारी यांनी नियोजन करून पार पाडावी, अशा सूचनाही आहेत. शाळा सुरू झाल्यावर शिक्षक, कर्मचारी वर्ग, विद्यार्थी आजारी पडल्यास त्यांच्या अलगीकरणाचे नियोजन, तसेच शाळा काही दिवसांसाठी बंद करावी लागल्यास शिक्षण सुरू राहण्यासाठीचा आराखडा शाळेने तयार करावा, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

शहरी भागांतील शाळांबाबत संभ्रमग्रामीण भागातील शाळांसाठी ठराव कोणी करावा यासंदर्भात सूचना आहेत. मात्र, शहरी भागात ही जबाबदारी कोणाची असेल याबाबत स्पष्टता नसल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. फक्त ग्रामीण भागातील शाळाच सुरू करायच्या का, असा प्रश्न शिक्षक, मुख्याध्यापक विचारत आहेत.

शाळा सुरू करताना महत्त्वाचे निकष- शिक्षकांची आरटीपीसीआर चाचणी आवश्यक- वर्गामध्ये एका बाकावर एक विद्यार्थी- शाळेतील स्नेहसंमेलन, परिपाठावर कडक निर्बंध- शिक्षक, विद्यार्थी यांची दैनंदिन थर्मल स्क्रीनिंग अनिवार्य

अकोल्यातील कापशी गावात साेमवारपासून शाळा- सरकारी निर्देशांचे पालन करीत अकाेला तालुक्यातील कापशी ग्रामपंचायतीने शाळा सुरू करण्याचा ठराव घेतला आहे. - साेमवार, १२ जुलै रोजी शाळा सुरू हाेणारे कापशी हे जिल्ह्यातील पहिले गाव ठरणार आहे. येथे सर्वप्रथम इयत्ता आठवी, नववी व दहावीचे वर्ग सुरू होणार आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSchoolशाळाcollegeमहाविद्यालयStudentविद्यार्थीTeacherशिक्षक