शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
8
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
9
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
10
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
11
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
12
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
13
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
14
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
15
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
16
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
17
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
18
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
19
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
20
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळाविरुद्ध एकत्र लढा

By admin | Updated: September 7, 2015 01:38 IST

शरद पवार असतील.. नारायण राणे असतील.. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील.. की कोणीही.. आता दुष्काळावर राजकारण नको.. तुमच्यात वितंडवाद नको..

दत्ता थोरे, लातूरशरद पवार असतील.. नारायण राणे असतील.. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील.. की कोणीही.. आता दुष्काळावर राजकारण नको.. तुमच्यात वितंडवाद नको.. सगळे विरोधीपक्ष आणि सत्ताधारी पक्ष आणि आपण एकत्र येऊन या परिस्थितीशी झगडूयात. आता एकमेकांची उणीदुणी नको, असे आवाहन सिनेअभिनेता नाना पाटेकर यांनी सर्वपक्षीय नेत्यांना केले आहे.नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या ‘आपण सारे’च्या वतीने लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्णातील ११३ आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना प्रत्येकी १५ हजारांची मदत करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. गेल्या ११५ वर्षांतला हा सगळ्यात मोठा दुष्काळ आहे. कुणीतरी चुकत असेल त्याच्यावर बोट ठेवायला आपल्याला नंतर वेळ आहे. दौरा करायचा असेल तर सगळ्यांनी एकत्र येऊन करावा. तुम्ही एक आहात म्हटल्यावर आम्ही समवेत येऊ, असे नाना पाटेकर म्हणाले.नाना पाटेकरांचा धीरगंभीर आवाज आणि मकरंद अनासपुरेंचे विनोद सोडून शेतकऱ्यांच्या सतावणाऱ्या चिंतेचे व्यवस्था व समाजाला विचारलेले प्रश्न यामुळे वातावरण भावूक झालेले. या कुटुंबियांना मंचावरही न बोलावता थेट त्यांच्या खुर्चीपर्यंत जाऊन नाना पाटेकरांनी धनादेश दिला आणि सोबतीला दिला जगण्याचा दुर्दम्य आशावाद व आत्महत्या न करण्याचा सल्ला.कुराणातील आत्महत्या करणेगुन्हा ही गोष्ट आवडते मला कुराणातील आत्महत्या करणे हा गुन्हा आहे; देवाशी प्रतारणा आहे, हे वचन मला खूप आवडते. त्यामुळे मुसलमान माणूस आत्महत्या करीत नाही. क्वचितच तुरळक झाल्या असतील. देव म्हणजे कोण? आपल्यातील ही माणसेच. त्यांना सोडून कसं जाता येईल ? आम्ही फक्त पोष्टमन...मी आणि मकरंद जरी पुढे असलो तरी हे पैसे आमचे नाहीत. लोकांमध्ये संवेदना आहेत. अनेक लोकांनी आम्हाला चेक्स दिले. पैसे दिले. आम्ही फक्त पोष्टमन आहोत. तुमच्यापर्यंत पोहोचवित आहोत. बाब पैशांची नाही तर आपल्याला आत ते जाणवतंय की नाही याची आहे, असे नाना म्हणाले.वेफर्सच्या पुड्यावरती किंमत असते. गुटखा-औषधांवर असते. फक्त आमच्या शेतकऱ्यांच्या मालावर किंमत छापलेली नसते. मी अडाणी माणूस आहे. शेतकरी आहे. एखादं पीक मेलं तर काय होतं याची मला जाणीव आहे. तुम्ही जे पिकवता त्याला हमी भाव ठरविता आला पाहीजे. कशाला काय भाव आहे हे आधीच माहीत झालं तर, मला हमीभाव पाहिजे की नाही. दुधाचा भाव १७ रुपयांनी घ्यायचा आणि बाजारात ७० रूपयाने विकायचा, हे का? असा सवाल नाना पाटेकर यांनी केला.