शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
2
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
3
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
4
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
5
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
6
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
7
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
8
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
9
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
10
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
11
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
12
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
13
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
14
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
15
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
16
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
17
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
18
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
19
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
20
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख

संपाला संमिश्र प्रतिसाद

By admin | Updated: June 16, 2015 03:43 IST

मोबाइल अ‍ॅप्सवर चालणाऱ्या खासगी टॅक्सी सेवांवर बंदी घालावी, अशी मागणी करत स्वाभिमान टॅक्सी-रिक्षा युनियनतर्फे सोमवारी मुंबईत बंद पुकारण्यात आला होता.

मुंबई : मोबाइल अ‍ॅप्सवर चालणाऱ्या खासगी टॅक्सी सेवांवर बंदी घालावी, अशी मागणी करत स्वाभिमान टॅक्सी-रिक्षा युनियनतर्फे सोमवारी मुंबईत बंद पुकारण्यात आला होता. या बंदला शहर आणि उपनगरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. बंदमध्ये सहभागी होण्यासाठी टॅक्सी चालकांवर जबरदस्ती केली जात होती. त्यासाठी तब्बल १५0 टॅक्सी फोडल्याचा आरोप मुंबई टॅक्सीमेन्स युनियनकडून स्वाभिमानवर करण्यात आला आहे. या बंदमध्ये रिक्षा चालक मात्र सामील झाले नाहीत. या बंदनंतर आता १७ जून रोजी मुंबई आॅटोरिक्षा-टॅक्सीमेन्स युनियनकडून बंद पुकारण्यात आला आहे.मुंबई शहर आणि उपनगरात मोबाइल अ‍ॅपवर धावणाऱ्या खासगी टॅक्सी मोठ्या प्रमाणात असून त्यांची सरकारदरबारी नोंद नसतानाही त्या धावत आहेत. या खासगी सेवा काळ्या-पिवळ्या टॅक्सींप्रमाणे प्रवाशांकडून किलोमीटरच्या दरात भाडे आकारत असून त्यामुळे काळ्या-पिवळ्या टॅक्सी चालकांच्या उत्पन्नावर परिणाम होत आहे. त्यामुळे खासगी टॅक्सी सेवांना विरोध करत त्यांच्यावर बंदी घालण्याची मागणी सर्वच रिक्षा-टॅक्सी युनियनकडून वेळोवेळी सरकारकडे करण्यात आली आहे. त्यासाठी स्वाभिमान टॅक्सी रिक्षा-युनियनकडून सोमवारी बंद पुकारण्यात आला होता. यात १० हजारपेक्षा अधिक टॅक्सी-रिक्षा चालक सामील होतील, असा दावा युनियनचे अध्यक्ष के.के. तिवारी यांनी केला होता. मात्र टॅक्सी वगळता रिक्षा या संपात सहभागी झाल्या नसल्याचे दिसून आले. स्वाभिमानकडून रेल्वे स्थानकांबाहेरील टॅक्सी सेवांवर लक्ष केंद्रित करत त्या ठिकाणी बंद करण्यात आला होता. मुंबई सेंट्रल, सीएसटी, दादर, भायखळा या स्थानकांबाहेर टॅक्सी मिळवताना प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडत होती. प्रिपेड टॅक्सी सेवाही उपलब्ध होत नसल्याने त्यासाठी लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांचे मात्र हाल झाले. ............................................१७ जूनला रिक्षा बंदओला, उबेरसारख्या खासगी टॅक्सी कंपन्या अनधिकृत व्यवसाय करत असून त्याचा काळ्या-पिवळ्या टॅक्सी चालकांच्या उत्पन्नावर परिणाम होत आहे. त्यासाठी खासगी टॅक्सींवर बंदी आणावी यासह अन्य मागण्यांसाठी १७ जून रोजी बंद पुकारण्यात येत असल्याचे मुंबई आॅटोरिक्षा-टॅक्सीमेन्स युनियनचे अध्यक्ष शशांक राव यांनी सांगितले. हा संप मुंबई, ठाणे, कल्याण-डोेंबिवलीसह, वसई-विरार, नालासोपारा, अर्नाळा या भागांत होणार असल्याने स्थानिकांचे हाल होऊ नयेत यासाठी एसटीकडून १00 बसेसची सोय करण्यात आली आहे. .......................................आरोप-प्रत्यारोपस्वाभिमान टॅक्सी-रिक्क्षा युनियनचे संस्थापक अध्यक्ष व आ. नितेश राणे यांनी सांगितले की, या खासगी टॅक्सी सेवांचे वर्चस्व वाढले असून त्यांच्या मनमानी कारभारामुळे काळ्या-पिवळ्या टॅक्सी चालकांना फटका बसत आहे. त्यासाठीच हा बंद पुकारला होता. राज्य सरकारकडूनही याविषयी मदत मिळत नसून पुढे बंदची धार तीव्र करण्यात येईल. तर क्वाड्रोस यांनी केलेले आरोप पुरावे घेऊन करावेत, असेही राणेंनी सांगितले. जनतेला वेठीस धरू नका-रिक्षाचालकांच्या मागण्यांचा शासन सहानुभूतिपूर्वक विचार करीत असताना त्यांनी बेमुदत संपाची भाषा करणे योग्य नाही. त्यांनी जनतेला वेठीस धरू नये, असे आवाहन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आज केले. पत्रपरिषदेत ते म्हणाले की, तरीही संप झालाच तर त्याला तोंड देण्याची शासनाची पूर्ण तयारी आहे. -राज्य परिवहन महामंडळाच्या १०० बसेस मुंबईत चालविण्यात येतील. मुंबई सेंट्रल, परळ, कुर्ला-नेहरूनगर, ठाणे-१, ठाणे-२, कल्याण, विठ्ठलवाडी, वसई, अर्नाळा, नालासोपारा या आगारांमधून या बसेस सोडण्यात येतील. हात दाखविल्यानंतर बस थांबविण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. गरज भासल्यास आणखी बसेस देऊ. याशिवाय, बेस्टच्या जादा फेऱ्या असतीलच. - हकीम समितीला विरोध असल्याचा दावा करणाऱ्या संघटनांनी या समितीसमोर आपली बाजू मांडण्याची संधी द्यावी, अशी विनंती केलेली आहे. या विसंगतीकडे रावते यांनी पत्रकारांचे लक्ष वेधले. शिवसेना प्रणीत संघटना या संपात सहभागी होणार नाही, असे संघटनेचे नेते आ. अनिल परब यांनी या वेळी सांगितले.