शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

Uddhav Thackeray: ...तर लसीकरण केंद्र कोव्हिड प्रसारक मंडळं होतील: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2021 21:41 IST

CM Uddhav Thackeray Speech: राज्यातील वाढती कोरोनाबाधितांची संख्या आणि महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला.

ठळक मुद्देमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा जनतेशी संवादलसीकरणात महाराष्ट्र देशात आघाडीवर - मुख्यमंत्रीलसीकरण केंद्रे कोव्हिड प्रसारक मंडळं होऊ देऊ नका; मुख्यमंत्र्यांची विनंती

मुंबई: राज्यातील १८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण करण्यास महाराष्ट्र सक्षम आहे. परंतु, केंद्राकडून जसजसा पुरवठा होईल, तसे लसीकरण केले जाईल. त्यामुळे लसीकरण केंद्रांवर गर्दी करू नका. लसीकरण केंद्रे कोव्हिड प्रसारक मंडळं होऊ देऊ नका, अशी कळकळीची विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला केली आहे. (cm uddhav thackeray requested people to do not rush at corona vaccination centre)

राज्यातील वाढती कोरोनाबाधितांची संख्या आणि महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. राज्यात १ कोटी ५८ लाख नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. १८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण करण्यासाठी १२ कोटी डोसची आवश्यकता असून, ते एकरकमी चेकने घेण्याची तयारी केली आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नमूद केले. 

“केंद्राने दुजाभाव केला असता, तर लसीकरणात राज्य आघाडीवर असते का”

तर लसीकरण केंद्र कोरोना प्रसारक मंडळ होतील

देशातील कोरोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला १ मेपासून सुरुवात होत आहे. केंद्र सरकार जसजसा लसींचा पुरवठा करेल, तसे १८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण केले जाईल. राज्यातील प्रत्येक पात्र व्यक्तीचे लसीकरण होईलच. मात्र, थोडा संयम बाळगणे आवश्यक आहे. कोरोना लसीकरण केंद्रांवर होणारी गर्दी पाहता, लसीकरण केंद्रे कोरोना प्रसारक मंडळे होतील की काय, अशी शक्यता वाटते. त्यामुळे कोरोना केंद्रांवर लसीकरणासाठी गर्दी करू नये, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलताना केले. 

देशात २ लाखांपेक्षा अधिक कोरोनाचे मृत्यू, पण उत्तरदायित्व शून्य: राहुल गांधी

१८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू होणार

१ मेपासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू होणार की नाही, याबाबतच्या चर्चांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूर्णविराम दिला असून, १ मे रोजी पहिली लस दिली जाणार आहे. माझे वचन आहे की, माझ्या नागरिकांचे लसीकरण पेलायला आपले सरकार तयार आहे. आपली पूर्ण तयारी झाली आहे. सुरुवातीला शिस्त येईपर्यंत गोंधळ उडेल, पण तो गोंधळ करु नका, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

आमची प्रतिमा डागाळली; निवडणूक आयोगाची मद्रास हायकोर्टात याचिका

लसीकरणात महाराष्ट्र देशात आघाडीवर

कोरोना लसीकरणात संपूर्ण देशात महाराष्ट्र आघाडीवर आहे. ३० एप्रिल रोजी राज्याला ३ लाख डोस मिळाले. तसेच मे महिन्यात लसींचे १८ लाख डोस मिळणार आहेत. नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी राज्य सक्षम असले, तरी पुरवठ्याची मर्यादा आहे, असा चिमटा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारचे नाव न घेतला काढला. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCorona vaccineकोरोनाची लसUddhav Thackerayउद्धव ठाकरेState Governmentराज्य सरकारCentral Governmentकेंद्र सरकारPoliticsराजकारण