शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
3
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
4
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
5
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
6
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
7
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
8
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
9
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
10
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
11
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
12
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
13
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
14
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
15
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
16
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
17
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
18
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
19
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
20
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...

संभाजीनगरबाबत अजून केंद्राला प्रस्ताव पाठवलेला नाही; उद्धव ठाकरेंची कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2021 19:51 IST

ठाकरे सरकानं या नामांतराबाबतचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवलेला नाही, अशी कबुली स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत दिली.

ठळक मुद्देऔरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्याबाबत अद्याप केंद्राला प्रस्ताव नाहीउद्धव ठाकरे यांची तारांकित प्रश्नाला लेखी उत्तर देताना माहिती शहराचे किंवा गावाचे नाव बदलण्याचा विषय केंद्र सरकारच्या अखत्यारित

मुंबई :औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करू, असं आश्वासन शिवसेनेकडून गेली अनेक वर्षे देण्यात येत आहे. मात्र, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री होऊन दोन वर्षे उलटून गेली, तरी अजूनही ठाकरे सरकानं या नामांतराबाबतचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवलेला नाही, अशी कबुली स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी विधानसभेत दिली. (cm uddhav thackeray admitted that no proposal for sambhajinagar)

विधानसभेत एका तारांकित प्रश्नाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या लेखी उत्तरातून ही गोष्ट समोर आली आहे. भारतीय जनता पक्षाचे (BJP) आमदार सागर योगेश यांनी औरंगाबादच्या नामांतराच्या संदर्भात तारांकित प्रश्न विचारला होता. औरंगाबादच्या विभागीय आयुक्तांकडून औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर करावं, असा प्रस्ताव ०४ मार्च २०२० रोजी राज्य शासनाला मिळाल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी उत्तरात नमूद केलं आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधान भवनात असूनही सभागृहात का आले नाहीत?; देवेंद्र फडणवीसांचा थेट सवाल

केंद्र सरकारच्या अखत्यारितील विषय

शहराचे किंवा गावाचे नाव बदलण्याचा विषय केंद्र सरकारच्या अखत्यारितील आहे. राज्य सरकारच्या अधिकारात हा विषय येत नाही. २७ जून २००१ रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत १९९५ मधील प्रारूप अधिसूचना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. अधिसूचना रद्द करण्यात आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने संबंधित याचिका १९ डिसेंबर २००२ रोजी निकाली काढली. या पार्श्वभूमीवर विधी आणि न्याय विभागाचा अभिप्राय घेण्यात येत आहे. हा अभिप्राय आणि आवश्यक मान्यता प्राप्त होताच या संदर्भातील प्रस्ताव केंद्र सरकारला रीतसर पाठवण्यात येईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. 

दरम्यान, सन १९९५ मध्ये महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेना युतीचं सरकार सत्तेवर आल्यानंतर सरकारने अधिसूचना काढून औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याचे जाहीर केले होते. मात्र, औरंगाबादमधील नगरसेवक महंमद मुश्ताक यांनी उच्च न्यायालयात या निर्णयाविरुद्ध दाद मागितली होती. उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. १७ नोव्हेंबर १९९६ रोजी सर्वोच्च न्यायालयाने परिस्थिती जैसे थे ठेवण्याचा आदेश दिला होता.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेAurangabadऔरंगाबादShiv SenaशिवसेनाBJPभाजपाPoliticsराजकारण