शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

संभाजीनगरबाबत अजून केंद्राला प्रस्ताव पाठवलेला नाही; उद्धव ठाकरेंची कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2021 19:51 IST

ठाकरे सरकानं या नामांतराबाबतचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवलेला नाही, अशी कबुली स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत दिली.

ठळक मुद्देऔरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्याबाबत अद्याप केंद्राला प्रस्ताव नाहीउद्धव ठाकरे यांची तारांकित प्रश्नाला लेखी उत्तर देताना माहिती शहराचे किंवा गावाचे नाव बदलण्याचा विषय केंद्र सरकारच्या अखत्यारित

मुंबई :औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करू, असं आश्वासन शिवसेनेकडून गेली अनेक वर्षे देण्यात येत आहे. मात्र, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री होऊन दोन वर्षे उलटून गेली, तरी अजूनही ठाकरे सरकानं या नामांतराबाबतचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवलेला नाही, अशी कबुली स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी विधानसभेत दिली. (cm uddhav thackeray admitted that no proposal for sambhajinagar)

विधानसभेत एका तारांकित प्रश्नाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या लेखी उत्तरातून ही गोष्ट समोर आली आहे. भारतीय जनता पक्षाचे (BJP) आमदार सागर योगेश यांनी औरंगाबादच्या नामांतराच्या संदर्भात तारांकित प्रश्न विचारला होता. औरंगाबादच्या विभागीय आयुक्तांकडून औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर करावं, असा प्रस्ताव ०४ मार्च २०२० रोजी राज्य शासनाला मिळाल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी उत्तरात नमूद केलं आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधान भवनात असूनही सभागृहात का आले नाहीत?; देवेंद्र फडणवीसांचा थेट सवाल

केंद्र सरकारच्या अखत्यारितील विषय

शहराचे किंवा गावाचे नाव बदलण्याचा विषय केंद्र सरकारच्या अखत्यारितील आहे. राज्य सरकारच्या अधिकारात हा विषय येत नाही. २७ जून २००१ रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत १९९५ मधील प्रारूप अधिसूचना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. अधिसूचना रद्द करण्यात आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने संबंधित याचिका १९ डिसेंबर २००२ रोजी निकाली काढली. या पार्श्वभूमीवर विधी आणि न्याय विभागाचा अभिप्राय घेण्यात येत आहे. हा अभिप्राय आणि आवश्यक मान्यता प्राप्त होताच या संदर्भातील प्रस्ताव केंद्र सरकारला रीतसर पाठवण्यात येईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. 

दरम्यान, सन १९९५ मध्ये महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेना युतीचं सरकार सत्तेवर आल्यानंतर सरकारने अधिसूचना काढून औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याचे जाहीर केले होते. मात्र, औरंगाबादमधील नगरसेवक महंमद मुश्ताक यांनी उच्च न्यायालयात या निर्णयाविरुद्ध दाद मागितली होती. उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. १७ नोव्हेंबर १९९६ रोजी सर्वोच्च न्यायालयाने परिस्थिती जैसे थे ठेवण्याचा आदेश दिला होता.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेAurangabadऔरंगाबादShiv SenaशिवसेनाBJPभाजपाPoliticsराजकारण