शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Election 2026: 'हा काय विकास? शाई पुसा आणि पुन्हा मतदान करा!'; राज ठाकरेंचा संताप, 'पाडू' मशीनवरून सरकारला ठणकावले
2
भाजप आणि शिंदे सेनेत राडा, काय म्हणाले भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण?
3
'या' देशाकडे आहे जगातील सर्वाधिक १,१०,००० मेट्रिक टन चांदी; पाहा भारताकडे किती आहे चांदीचा साठा
4
BMC Election 2026: मोठी बातमी! शाईऐवजी मार्कर निवडणूक आयोगानेच दिला, पुसला जातोय...; मुंबई आयुक्तांची कबुली
5
मतदान केंद्रात शिरला घोणस जातीचा विषारी साप, उडाली खळबळ
6
Maharashtra Municipal Election 2026 Voting LIVE Updates: “हे आम्ही खपवून घेणार नाही”; मतदान केल्यावर राज ठाकरेंचा इशारा
7
मुलानेच केला आईचा खून, बंदुकीतून झाडली गोळी, भयानक घटनेनं कोकण हादरलं, धक्कादायक कारण समोर आलं 
8
IIT इंजिनिअर बनला 'डिजिटल धोबी'! ८४ लाखांची नोकरी सोडून उभा केला १६० कोटींचा 'यूक्लीन' ब्रँड
9
६५-७० लढाऊ विमाने घेऊन अमेरिकेची युद्धनौका इराणच्या दिशेने निघाली; समुद्रात मोठी खळबळ...
10
सासू, पाच सुना आणि मुलगी, भीषण अपघातात झाला मृत्यू, अंत्यसंस्काराहून परतताना घडली दुर्घटना
11
"मैत्रीपूर्ण लढत कधीच होत नाही, हा केवळ..."; मनसे नेते राजू पाटील यांची शिवसेना-भाजप युतीवर टीका
12
Makar Sankranti 2026: मुलांच्या दीर्घायुष्यासाठी माता कुंतीने दिले होते 'हे' दान; यंदा तुम्हीही लुटा 'कुंतीचे वाण'
13
२१ जानेवारीपासून अमेरिकेची दारे बंद! ७५ देशांसाठी व्हिसा प्रक्रिया रोखली; भारतावर काय होणार परिणाम?
14
मनसेच्या उमेदवारासमोरच पहिला दुबार मतदार सापडला, तो ही दादरमध्ये...; फोडला की सोडला? पुढे काय झाले...
15
PMC Election 2026: पुण्यात मोठा राडा! शाई पुसण्याच्या बाटलीसह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्याला पकडले
16
निवृत्तीची चिंता संपली! पोस्टाची 'ही' स्कीम करेल मालामाल; दरमहा होईल ₹२०,००० ची कमाई, किती करावी लागेल गुंतवणूक?
17
कल्याणमध्ये मतदानादरम्यान खळबळ: बोटाला लावलेली शाई लगेच पुसली जातेय! मनसे उमेदवार उर्मिला तांबे यांचा निवडणूक प्रशासनाला संतप्त सवाल
18
कर्मचाऱ्यांना मिळणार ₹२ कोटींपर्यंतच्या इन्शुरन्स, स्वस्त लोनसह हे फायदे; लाँच झाली नवी सुविधा, जाणून घ्या
19
काही हरवलंय? काळजी सोडा! 'हा' एक मंत्र तुमची वस्तू शोधून देईल; अनेकांनी घेतलाय अनुभव 
20
731666404000 रुपये 'साफ'...! मुकेश अंबानी 100 अब्ज डॉलरच्या क्लब मधून बाहेर; आता Q3 वर नजर
Daily Top 2Weekly Top 5

स्वतःला राम दाखवण्याचा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न, पण जनता रावण मानायला लागलीय; वडेट्टीवारांची जहरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2023 12:13 IST

लुटारुंना माल वाटण्याशिवाय पर्याय नाही. ज्या कारखान्यांवर आरोप केले, त्याच कारखान्यांना मदत करत आहेत. - वडेट्टीवार

मराठा समाज आज ज्या टप्प्यात आहे, तर त्याला कारणीभूत कोण आहे? हे जरांगे पाटलांच्या वक्तव्यावरून समजतेय.  तुम्हाला आरक्षण देता येत नव्हत की देता येत होत? मग काय अडचणी होत्या? अडचणी कायमच्या दूर करून निर्णय घ्यायला पाहिजे होता. आमची विनंती आहे की, ज्यांनी तुमची फसवणूक केली त्यांना तुम्ही गावबंदी करा, असे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले. 

मी मराठा समाजातील अनेक तरुणांना आवाहन करतो की, आरक्षण मागणीसाठी इतकं टोकाचे पाऊल उचलू नका, असे वडेट्टीवार म्हणाले. पूर्वी लुटारुंची टोळी म्हणणारे भाजपचे लोक आता लुटारुंच्या मांडीला मांडी लावून बसलेत. लुटारुंना माल वाटण्याशिवाय पर्याय नाही. ज्या कारखान्यांवर आरोप केले, त्याच कारखान्यांना मदत करत आहेत. सत्तेसाठी कुठल्याही पातळीपर्यंत तुम्ही जाऊ शकता. हे यावरुन दिसतेय, अशी टीका त्यांनी भाजपावर केली.  

दसरा संपला आणि जाणाऱ्या रावणाने विचारले मला जाळता पण जाळणाऱ्यांपैकी राम कोण? याचे उत्तर एकनाथ शिंदे यांनी दिले तर बरे होईल. ना सरकारमध्ये राम आहे. ना शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असताना राम दिसतोय, ना धर्मात धर्मात तेढ निर्माण करताना राम दिसत नाहीय. स्वतःला राम दाखवण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री करत असतील, तर महाराष्ट्रातील जनतेनं त्यांना कधीच रावण मानायला सुरुवात केली आहे, अशी टीका वडेट्टीवार यांनी केला. 

आरक्षणाची मुदत संपली आहे. तेलंगणाच कारण देऊन आरक्षण लांबणीवर टाकण्याचा डाव आहे. तुम्ही दिलेल्या मुदतीत आरक्षण द्यायला हवे होते. जरांगे पाटील यांना काय शब्द दिला. तुम्ही दिलेला शब्द मुदतीत पाळायला हवा होता. सरकार पळवाट काढत आहे, अस आरोप वडेट्टीवार यांनी केला. पंतप्रधान शरद पवार यांच्याबाबत बोलले. त्याचे उत्तर शरद पवार देतीलच. पण देशातील शेतीचे उत्पन्न वाढले, हरित क्रांती ही काही नऊ वर्षांत झाली नाही. या देशातील कृषी क्षेत्राचा विकास, कृषी माल निर्यात काँग्रेसने केली आहे. मुंबईतील हिरे व्यापार गुजरातला जाणे, हे बुलेट ट्रेन पासून सुरुवात झाली आहे. देशाच्या आर्थिक राजधानीला खिळखिळी करण्याचा प्रयत्न आहे. १२ हजार कारागीर शिफ्ट होणार आहेत. हिरे व्यापार मुंबईची शान, मुंबईचा कणा होती. हा कणा तोडण्याचं काम केंद्र सरकराने केले आहे, असा आरोप वडेट्टीवार यांनी मोदींवर केला.

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारEknath Shindeएकनाथ शिंदेNarendra Modiनरेंद्र मोदी