शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
3
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
4
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
5
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
6
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
7
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
8
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
9
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
10
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
11
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
12
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
13
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
14
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
15
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
16
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
17
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
18
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
19
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
20
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

अखंड भारत वाचवण्यासाठी मराठ्यांनी...; निशिकांत दुबेंना CM फडणवीसांनी सांगितला 'महाराष्ट्राचा इतिहास'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 12:58 IST

अखंड भारत वाचवण्यासाठी मराठे पानीपतच्या लढाईला गेले होते. त्यामुळे हा मराठ्यांचा इतिहास आहे असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटले.

मुंबई - निशिकांत दुबे यांचे विधान पूर्ण ऐकले तर त्यांनी संघटनेबाबत बोलले आहेत. मराठी माणसाला सरसकट म्हटलं नाही तथापि असं विधान करणे माझ्या मते योग्य नाही. त्याचे जे अर्थ निघतात ते अर्थ लोकांमध्ये संभ्रम निर्माण करतात. मराठी माणसांचे ऐतिहासिक योगदान महाराष्ट्रात प्रचंड मोठे आहे. जेव्हा भारतावर परकीय आक्रमण झाली तेव्हा इथल्या संस्कृतीचे रक्षण करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांनी केले. मराठी माणसाने परकीय आक्रमणाविरोधात लढाई केली असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. 

निशिकांत दुबे यांच्या विधानावर पत्रकारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला होता. त्यावेळी ते म्हणाले की, पानीपतची लढाई मराठे लढले होते. अहमद शाह अब्दालीने स्पष्टपणे तहाचे पत्र दिले होते. पंजाबपासून पेशावरपर्यंत भाग आम्हाला देऊन टाका, उर्वरित भारत हा मराठ्यांचा आहे हे आम्ही मान्य करू. परंतु मराठ्यांनी ते मान्य केले नाही. अखंड भारत वाचवण्यासाठी मराठे पानीपतच्या लढाईला गेले होते. त्यामुळे हा मराठ्यांचा इतिहास आहे. आजही देशाच्या जीडीपीमध्ये सर्वात जास्त योगदान देणारा आमचा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र आणि मराठी माणसांचे योगदान या देशाच्या इतिहासात आणि वर्तमानात कुणीच नाकारू शकत नाही. कुणी नाकारत असेल तर अत्यंत चुकीचे आहे  असंही फडणवीसांनी म्हटलं. 

काय म्हणाले होते निशिकांत दुबे?

महाराष्ट्र कुणाच्या पैशांची भाकरी खातो? तिकडे टाटा, बिर्ला व रिलायन्स असेल. पण त्यांचा कोणताही कारखाना महाराष्ट्रात नाही. बिहार, झारखंड नसते तर टाटा व बिर्ला यांनी काय केले असते? टाटा, बिर्ला व रिलायन्स मुंबईत टॅक्स भरतात; पण टाटांनी पहिला कारखाना बिहारमध्ये उघडला. महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो. तुम्ही कोणता टॅक्स आणता?  उद्धव ठाकरे व राज ठाकरे हे फक्त उत्तर भारतीयांना लक्ष्य करत आहेत. तुम्हाला मारायचे असेल तर मग मुंबईतील तामिळी, तेलुगू आणि उर्दू सगळ्या भाषिकांना मारा. आम्ही मराठीचा सन्मान करतो; पण ही हुकूमशाही खपवून घेणार नाही असं वादग्रस्त विधान भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी केले होते. 

दरम्यान, निशिकांत दुबे यांच्या विधानावरून संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर संताप व्यक्त केला आहे.  तुम्ही महाराष्ट्राचे आहात. भाजपा खासदार मराठी माणसांविरुद्ध अशी वक्तव्य करत असताना मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्रिमंडळ गप्प बसतात, याचे मला आश्चर्य वाटते. ते कोणत्या प्रकारचे मुख्यमंत्री आहेत? त्यांना छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची नावे घेण्याचा अधिकार नाही. स्वतःला दुटप्पी शिवसेनेचे नेते मानणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी दाढी कापावी आणि राजीनामा द्यावा अशी घणाघाती टीका उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसmarathiमराठीhindiहिंदीBJPभाजपा