शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

'...तर आम्ही कुणालाही वाचवणार नाही'; CM फडणवीसांचे मुंडे, कोकाटेंच्या राजीनाम्याबद्दल मोठे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2025 20:40 IST

CM Devendra Fadnavis Dhananjay Munde: धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याचा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्व संध्येला विचारण्यात आला होता. 

राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाने शिक्षा ठोठावली आहे. तर संतोष देशमुख हत्या प्रकरणात अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडेंच्या जवळ असलेला वाल्मीक कराड हा मुख्य सूत्रधार म्हणून समोर आले आहे. त्यामुळे दोन्ही मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणी केली जात आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

अर्थसंकल्पीय अधिवेशनात महायुती सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून होण्याची संकेत मिळत आहे. अधिवेशन सुरू होण्याच्या काही दिवस आधीच सीआयडीने आरोपपत्र दाखल केलं आहे, ज्यात वाल्मीक कराडच्या सांगण्यावरूनच संतोष देशमुखांची हत्या करण्यात आल्याचे म्हटले आहे. त्यामुळे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. 

दुसरीकडे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्यात यावे आणि त्यांचा मंत्रि‍पदाचा राजीनामा घेण्यात यावा, अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. त्यावरच आता फडणवीसांनी भूमिका मांडली.

अण्णा हजारे यांनी मुद्दा उपस्थित केलेला आहे की, नैतिकतेच्या आधारावर या दोन्ही मंत्र्यांनी राजीनामा दिले पाहिजेत. जर त्यांच्यावरील गुन्हे सिद्ध झाले नाहीत, तर पुन्हा सरकारमध्ये घेण्याची संधी त्यांना आहे, असा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला. 

आम्ही त्यांचे राजीनामे मागवू -फडणवीस

या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "हे बघा असं आहे की, अण्णा हजारे यांचा आम्ही सन्मानच करतो. अनेकवेळा अशा प्रकारच्या प्रश्नांमध्ये... राजीनामा द्यावा की नाही द्यावा... असे अनेक मुद्दे त्या ठिकाणी उपस्थित होतात. त्यासंदर्भात भरपूर चर्चा आमच्याकडे झालेली आहे. त्या चर्चेअंतीच मी जी वस्तुस्थिती मांडली आहे."

याच मुद्द्यावर भूमिका मांडताना फडणवीसांनी म्हणाले की, "कुठेही नैतिकतेचं अधःपतन झालेलं आहे, असं जर लक्षात आलं तर मात्र आम्ही कोणालाही वाचवणार नाही. आम्ही थेट त्यांचे राजीनामे मागवू."

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसDhananjay Mundeधनंजय मुंडेManikrao Kokateमाणिकराव कोकाटेNCPराष्ट्रवादी काँग्रेसMahayutiमहायुती