शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
4
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
5
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
6
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
7
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
8
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
9
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
10
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
11
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
12
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
13
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
14
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
15
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
16
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
17
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
18
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
19
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
20
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत

'...तर आम्ही कुणालाही वाचवणार नाही'; CM फडणवीसांचे मुंडे, कोकाटेंच्या राजीनाम्याबद्दल मोठे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2025 20:40 IST

CM Devendra Fadnavis Dhananjay Munde: धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याचा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्व संध्येला विचारण्यात आला होता. 

राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाने शिक्षा ठोठावली आहे. तर संतोष देशमुख हत्या प्रकरणात अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडेंच्या जवळ असलेला वाल्मीक कराड हा मुख्य सूत्रधार म्हणून समोर आले आहे. त्यामुळे दोन्ही मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणी केली जात आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

अर्थसंकल्पीय अधिवेशनात महायुती सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून होण्याची संकेत मिळत आहे. अधिवेशन सुरू होण्याच्या काही दिवस आधीच सीआयडीने आरोपपत्र दाखल केलं आहे, ज्यात वाल्मीक कराडच्या सांगण्यावरूनच संतोष देशमुखांची हत्या करण्यात आल्याचे म्हटले आहे. त्यामुळे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. 

दुसरीकडे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्यात यावे आणि त्यांचा मंत्रि‍पदाचा राजीनामा घेण्यात यावा, अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. त्यावरच आता फडणवीसांनी भूमिका मांडली.

अण्णा हजारे यांनी मुद्दा उपस्थित केलेला आहे की, नैतिकतेच्या आधारावर या दोन्ही मंत्र्यांनी राजीनामा दिले पाहिजेत. जर त्यांच्यावरील गुन्हे सिद्ध झाले नाहीत, तर पुन्हा सरकारमध्ये घेण्याची संधी त्यांना आहे, असा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला. 

आम्ही त्यांचे राजीनामे मागवू -फडणवीस

या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "हे बघा असं आहे की, अण्णा हजारे यांचा आम्ही सन्मानच करतो. अनेकवेळा अशा प्रकारच्या प्रश्नांमध्ये... राजीनामा द्यावा की नाही द्यावा... असे अनेक मुद्दे त्या ठिकाणी उपस्थित होतात. त्यासंदर्भात भरपूर चर्चा आमच्याकडे झालेली आहे. त्या चर्चेअंतीच मी जी वस्तुस्थिती मांडली आहे."

याच मुद्द्यावर भूमिका मांडताना फडणवीसांनी म्हणाले की, "कुठेही नैतिकतेचं अधःपतन झालेलं आहे, असं जर लक्षात आलं तर मात्र आम्ही कोणालाही वाचवणार नाही. आम्ही थेट त्यांचे राजीनामे मागवू."

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसDhananjay Mundeधनंजय मुंडेManikrao Kokateमाणिकराव कोकाटेNCPराष्ट्रवादी काँग्रेसMahayutiमहायुती