शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
4
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
5
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
6
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
7
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
8
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
9
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
10
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
11
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
12
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
13
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
14
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
15
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
16
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
17
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
18
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
19
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
20
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र 'सुजलाम्' करणारं 'जलयुक्त शिवार'; देवेंद्र सरकारचा बळीराजाला आधार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2019 17:28 IST

मुख्यमंत्र्यांच्या महत्त्वाकांक्षी योजनेमुळे अनेक भागांचा कायापालट

२०१४ मध्ये भाजपानं काँग्रेस, राष्ट्रवादीवर सर्वाधिक आरोप केले ते भ्रष्टाचारावरून. त्यातही सर्वात जास्त आरोप झाले ते सिंचन घोटाळ्यावरून. सर्वात जास्त धरणं असलेलं राज्य ही महाराष्ट्राची ओळख. मात्र तरीही महाराष्ट्रातला शेतकरी आत्महत्या करतो. यामागचं प्रमुख कारण म्हणजे दुष्काळामुळे आलेली नापिकी. त्यामुळे राज्यातील दुष्काळी परिस्थिती दूर करणं आवश्यक होतं. शेतीला पाणी उपलब्ध करून देणं गरजेचं होतं. मोठेमोठी धरणं बांधण्यासाठी बराच वेळ आणि खर्च येतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'जलयुक्त शिवार'च्या माध्यमातून यावर उत्तर शोधलं. 

जमिनीवर पडणारं पाणी वाहून थेट वाहून जातं. यातलं जास्तीत जास्त पाण्याचं संवर्धन करण्याच्या हेतूनं 'जलयुक्त शिवार'ची घोषणा करण्यात आली. शेतात पडणारं पाणी साठवायचं आणि तेच शेतीसाठी वापरायचं, अशी नाविण्यपूर्ण संकल्पना राज्यातील बहुतांश भागांमध्ये राबवण्यात आली. त्यामुळे दूरवरुन पाणी आणण्याचा प्रश्न मिटला. मोठमोठी धरणं, त्यासाठी येणारा कोट्यवधींचा खर्च, त्यातही पाणी सोडण्यावरुन होणारं राजकारण याला फाटा देण्याचं काम 'जलयुक्त शिवार'नं केलं. 

जलयुक्त शिवार योजनेच्या अंतर्गत 'मागेल त्याला शेततळं' देण्यात आलं. शेतात खड्डा खणण्यासाठी सरकारकडून शेतकऱ्यांना मदत देण्यात आली. ही योजना अनेक भागांमध्ये क्रांतीकारी ठरली. जलयुक्त शिवारमुळे शेतकरी त्याच्याच शेतातलं त्याच्याच शेतासाठी वापरू लागला. मुख्यमंत्र्यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असल्यानं जलयुक्त शिवाराला केंद्राकडून कोट्यवधींना निधी मिळाला. त्यामुळे दुष्काळाचा सामना करणाऱ्या अनेक भागांचं रुपडं पालटलं.

जलयुक्त शिवार योजना येत्या काळात पर्यावरणाच्या दृष्टीनंही महत्त्वाची ठरणार आहे. जमिनीत पाणीच मुरत नसल्यानं मराठवाडा, विदर्भातील अनेक भागांमधील परिस्थिती गंभीर झाली होती. पाणी उपसण्यासाठी जागोजागी बोअरवेल टाकण्यात आल्यानं भूजल पातळी प्रचंड खालावली होती. मात्र जलयुक्त शिवारमुळे ही परिस्थिती पालटली आहे. त्यामुळे ही योजना यापुढेही अशीच सुरू राहिल्यास मराठवाड्यावरील दुष्काळाचा शिक्का पुसला जाऊ शकतो. याचा मोठा आर्थिक फायदा या भागासह संपूर्ण राज्यालादेखील होईल.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसJalyukt Shivarजलयुक्त शिवारdroughtदुष्काळFarmerशेतकरी