शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठा हल्ला, २५ सैनिक मारले गेले; TTP चा खैबर पख्तूनख्वा इथल्या लष्करी तळावर कब्जा
2
एका रात्रीत मोठा गेम! महायुतीचेच ३ माजी आमदार भाजपा फोडणार?; स्थानिक कार्यकर्तेच संतापले
3
क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले
4
ट्रेनमधील पांढऱ्या बेडशीट्स विसरा; भारतीय रेल्वे आता देणार खास प्रिंटेड कव्हर ब्लँकेट्स !
5
Mumbai: व्हॅनमधून रडण्याचा आवाज आला, पोलिसांनी पुढं जाऊन पाहिलं तर...; घटनेनं परिसरात खळबळ!
6
दिवाळीत ₹6 लाख कोटींची विक्रमी उलाढाल; भारतीयांची 'Made In India' वस्तूंना पसंती
7
कोण आहे फ्रांसेस्का ऑर्सिनी? ज्यांच्याकडे ५ वर्षाचा ई-व्हिसा असूनही भारतात प्रवेश नाकारला
8
Crime: आधी हात-पाय बांधले, नंतर उशीनं तोंड दाबलं...; व्यसनमुक्ती केंद्रातील घटनेनं खळबळ!
9
ODI Record: वनडेमध्ये आतापर्यंत कधीच 'असं' घडलं नव्हतं, ते वेस्ट इंडीजनं केलं!
10
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
11
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
12
मुहूर्त ट्रेडिंग: शेअर बाजारात तेजी; निफ्टी वर्षाच्या सर्वोच्च पातळीवर, सेन्सेक्स 62 अंकांनी वधारला
13
Mumbai Fire: माजी उपमहापौर अरुण देव यांच्या अंधेरी येथील घराला आग
14
२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...
15
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!
16
अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप, प्रशांत किशोर यांनी दाखवला फोटो; जनसुराजच्या उमेदवाराचं अपहरण?
17
अमेरिकेचा 88 लाखांचा H-1B व्हिसा आजपासून लागू; भारतीयांना मोठा दिलासा...
18
Beed: फटाका विझलाय समजून पुन्हा पेटवायला गेला अन्...; बीडमध्ये सहा वर्षांच्या मुलासोबत भयंकर घडलं!
19
"तात्या विंचू तुम्हाला चावेल...", संजय राऊतांच्या टीकेवर महेश कोठारेंची प्रतिक्रिया, म्हणाले- "ते माझ्याविषयी जे बोलले..."
20
Alyssa Healy : बॅक टू बॅक सेंच्युरी, तरीही स्टार्कच्या बायकोवर आली बाकावर बसण्याची वेळ; कारण...

महाराष्ट्र 'सुजलाम्' करणारं 'जलयुक्त शिवार'; देवेंद्र सरकारचा बळीराजाला आधार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2019 17:28 IST

मुख्यमंत्र्यांच्या महत्त्वाकांक्षी योजनेमुळे अनेक भागांचा कायापालट

२०१४ मध्ये भाजपानं काँग्रेस, राष्ट्रवादीवर सर्वाधिक आरोप केले ते भ्रष्टाचारावरून. त्यातही सर्वात जास्त आरोप झाले ते सिंचन घोटाळ्यावरून. सर्वात जास्त धरणं असलेलं राज्य ही महाराष्ट्राची ओळख. मात्र तरीही महाराष्ट्रातला शेतकरी आत्महत्या करतो. यामागचं प्रमुख कारण म्हणजे दुष्काळामुळे आलेली नापिकी. त्यामुळे राज्यातील दुष्काळी परिस्थिती दूर करणं आवश्यक होतं. शेतीला पाणी उपलब्ध करून देणं गरजेचं होतं. मोठेमोठी धरणं बांधण्यासाठी बराच वेळ आणि खर्च येतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'जलयुक्त शिवार'च्या माध्यमातून यावर उत्तर शोधलं. 

जमिनीवर पडणारं पाणी वाहून थेट वाहून जातं. यातलं जास्तीत जास्त पाण्याचं संवर्धन करण्याच्या हेतूनं 'जलयुक्त शिवार'ची घोषणा करण्यात आली. शेतात पडणारं पाणी साठवायचं आणि तेच शेतीसाठी वापरायचं, अशी नाविण्यपूर्ण संकल्पना राज्यातील बहुतांश भागांमध्ये राबवण्यात आली. त्यामुळे दूरवरुन पाणी आणण्याचा प्रश्न मिटला. मोठमोठी धरणं, त्यासाठी येणारा कोट्यवधींचा खर्च, त्यातही पाणी सोडण्यावरुन होणारं राजकारण याला फाटा देण्याचं काम 'जलयुक्त शिवार'नं केलं. 

जलयुक्त शिवार योजनेच्या अंतर्गत 'मागेल त्याला शेततळं' देण्यात आलं. शेतात खड्डा खणण्यासाठी सरकारकडून शेतकऱ्यांना मदत देण्यात आली. ही योजना अनेक भागांमध्ये क्रांतीकारी ठरली. जलयुक्त शिवारमुळे शेतकरी त्याच्याच शेतातलं त्याच्याच शेतासाठी वापरू लागला. मुख्यमंत्र्यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असल्यानं जलयुक्त शिवाराला केंद्राकडून कोट्यवधींना निधी मिळाला. त्यामुळे दुष्काळाचा सामना करणाऱ्या अनेक भागांचं रुपडं पालटलं.

जलयुक्त शिवार योजना येत्या काळात पर्यावरणाच्या दृष्टीनंही महत्त्वाची ठरणार आहे. जमिनीत पाणीच मुरत नसल्यानं मराठवाडा, विदर्भातील अनेक भागांमधील परिस्थिती गंभीर झाली होती. पाणी उपसण्यासाठी जागोजागी बोअरवेल टाकण्यात आल्यानं भूजल पातळी प्रचंड खालावली होती. मात्र जलयुक्त शिवारमुळे ही परिस्थिती पालटली आहे. त्यामुळे ही योजना यापुढेही अशीच सुरू राहिल्यास मराठवाड्यावरील दुष्काळाचा शिक्का पुसला जाऊ शकतो. याचा मोठा आर्थिक फायदा या भागासह संपूर्ण राज्यालादेखील होईल.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसJalyukt Shivarजलयुक्त शिवारdroughtदुष्काळFarmerशेतकरी