शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

नेते गेले बांधावर! वेदनांच्या महापुरावर आश्वासनांची फुंकर; कुणी हात जोडले, कुणी व्यथा मांडल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 08:40 IST

महापुराने होत्याचं नव्हतं केलं, गुरं गेली, पिकं खरडली, घरंही बुडाली, काय खावं? कसं जगावं? हा एकच सवाल! मराठवाड्यासह अहिल्यानगर, सोलापूर जिल्ह्यांत अजूनही पूरस्थिती, अनेक गावांना वेढा, प्रकल्पांमधून विसर्ग सुरू असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा 

मुंबई - गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यासह सोलापूर, अहिल्यानगर आणि जळगाव जिल्ह्याला अक्षरश: झोडपून काढण्याऱ्या पावसाने बुधवारी काहीसा दिलासा दिला असला तरी अनेक भागांमध्ये पूरस्थिती कायम आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्र्यांसह पालकमंत्र्यांनी बुधवारी विविध जिल्ह्यात नुकसानग्रस्त भागांची पाहणी करुन शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेतली. यावेळी अनेकांनी चिखल झालेली पिके दाखवत आपल्या व्यथा मांडल्या. अजुनही अनेक गावांना पुराचा वेढा असून पिकांसह घरांमध्ये पाणी साचलेले आहे. त्यामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणावर प्रभावित झाले आहे. 

लातूर जिल्ह्यातील मांजरा नदीला आलेल्या महापुरामुळे अनेक गावांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कचा इशारा देण्यात आला आहे. नांदेड जिल्ह्यात बुधवारी दुपारी काही भागात विजांच्या कडकडाटात पाऊस झाला. सावरगाव माळ येथे वीज पडून तीन गायी दगावल्या आहेत. परभणी जिल्ह्याच्या वरच्या भागातील धरणांतून वाढलेल्या विसर्गामुळे गंगाखेड शहरातील बरकतनगर व इतर भागात पुराचे पाणी घुसले आहे. जिल्ह्यात भारतीय सेना दल आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या पथकाने १२३८ जणांना स्थलांतरित केले आहे. अशांना शाळा व प्राथमिक आरोग्य केंद्रात आश्रय दिला आहे. दुष्काळी तालुका असलेल्या जत (सांगली) तालुक्यात २००९ साली अतिवृष्टी झाली होती. सध्या या आठवणी गावात ताज्या झाल्या आहेत.

मुख्यमंत्री बांधावर : साहेब, माझ्या २० एकर शेतीचे नदीपात्र झाले हो !

शेतकरी शिवपुत्र आग्रे यांचा आवाज थरथरत होता. त्यांच्या डोळ्यांत पुराच्या पाण्यात बुडालेल्या २० एकर शेतीचे दुःख स्पष्ट दिसत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समोर असताना, शिवपुत्र आग्रे यांनी हात जोडले आणि म्हणाले, साहेब, तुम्हीच आमचे मायबाप... या संकटातून आमची सुटका करा! त्यांच्या या एका वाक्यात येथील शेकडो शेतकऱ्यांचे हृदय तुटण्याचे दुःख व्यक्त झाले. लातूर येथे पाहणीदरम्यान मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना धीर दिला. मी तुमच्या पाठीशी आहे असे सांगत तत्काळ मदत आणि नुकसानभरपाई देण्याचे आश्वासन दिले. तसेच, भविष्यात पुरावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजनांचे वचनही दिले.

मायबाप तुम्हीच, तात्पुरती मदत नको; आमचे पुनर्वसन करा

पावसाने जिल्हाभरात शेती, घर, पशुधनांचे मोठे नुकसान झाले आहे. पुराने होत्याचे नव्हते केले. या परिस्थितीची बुधवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी पाहणी केली. यावेळी शेतकरी पाणावलेल्या डोळ्याने तात्पुरत्या मदतीची नव्हे तर पुनर्वसनाची अपेक्षा असल्याचे काकुळतीला येऊन सांगत होते. मंत्र्यांनी अनेक गावात पाहणी केली. बोटीने शेतातील पिकांचा अंदाज घेतला. यानंतर शेतकरी व महिलांशी संवाद साधला. शेती खरडून गेली, घरात पाणी शिरले, जनावरे वाहून गेली, यामुळे भरीव मदत करावी. मायबाप तुम्हीच आहात, पुनर्वसन करा, अशा शब्दांत महिलांनी भावना व्यक्त केल्या.

पुराने हाल हाल करू सोडले, हात जोडून महिलांनी प्रश्न मांडले

अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे पिकात मोठ्या प्रमाणात पाणी साठलेले आहे. त्यामुळे ड्रोनचा वापर करून पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. त्यांनी बुधवारी सकाळी  कोर्टी येथील बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली. त्यानंतर संगोबा येथे सीना नदीला आलेल्या पुरामुळे उद्भवलेल्या परिस्थितीची माहिती घेतली. शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची मदत देताना ६५ मिलिमीटरची अट ठेवणार नाही. अधिकाऱ्यांनाही फार नियमावर बोट ठेवू नका, असेही सांगितले आहे, असे अजित पवार म्हणाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Leaders visit flood-hit farms, promise relief amidst devastation and despair.

Web Summary : Marathwada and surrounding districts face severe flood damage. Leaders surveyed affected areas, offering assurances of immediate aid and long-term solutions. Farmers pleaded for resettlement and substantial assistance after losing crops, homes, and livestock. Drone surveys are ordered for accurate damage assessment.
टॅग्स :floodपूरFarmerशेतकरीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदेAjit Pawarअजित पवार