शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानातून ऑस्ट्रेलियात कसे पोहोचले सिडनी बीचवर गोळीबार करणारे सैतान? दहशतवादी 'पिता-पुत्रां'संदर्भात अनेक दावे
2
Pune Crime: कोचिंगमध्ये रक्तरंजित संघर्ष! शिक्षक शिकवत असतानाच विद्यार्थ्यांवर हल्ला; एकाचा मृत्यू; हल्ला करणारा विद्यार्थी फरार
3
"खूप गोष्टी आहेत त्या मी बोलू शकत नाही..."; भाजपात प्रवेश करताच तेजस्वी घोसाळकरांनी मांडली व्यथा
4
तत्कालीन CJI ने मोजक्या कर्मचाऱ्यांना दिलं होतं सहा-सहावेळा इन्क्रीमेंट; आता सुप्रीम कोर्टाने निर्णय मागे घेतला
5
"स्वप्नातही विचार केला नव्हता..."; ४ वेळा आमदार राहिलेल्या नितीन नबीन यांना भाजपाचं 'सरप्राइज'
6
बाजाराची नकारात्मक सुरुवात! सेन्सेक्स-निफ्टी लाल निशाणीवर; 'या' समभागांना मोठा फटका
7
Priyanka Gandhi Prashant Kishor: बिहार निकालाने झटका! प्रशांत किशोरांनी अचानक घेतली प्रियंका गांधींची भेट
8
Health Tips: हृदय विकाराच्या 'या' सात सूक्ष्म संकेतांकडे दुर्लक्ष करू नका, वेळीच करा उपाय!
9
जीएसटी कपातीचा आनंद संपल्यात जमा...! नवीन वर्षात ‘महागाईचा झटका’! टीव्ही, कार, स्मार्टफोनच्या किंमती १० टक्क्यांनी वाढणार
10
Kandivali Crime: कांदिवलीत गुंडांचा माज! कॉलर पकडली, वर्दी खेचत पोलिसांना मारहाण; कशामुळे झाला राडा?
11
सिडनी हल्ल्याला नवं वळण, पाकिस्तानी कनेक्शन आलं समोर; दहशतवादी बाप-लेकानं मिळून केला गोळीबार
12
'धुरंधर' अक्षय खन्नाच्या सावत्र आईची प्रतिक्रिया; म्हणाली, "मी कधीच त्याची आई झाले नाही कारण..."
13
काऊंटडाऊन सुरू, उरले १०३ दिवस! वैभव सुर्यवंशीला टीम इंडियात येण्यापासून कोणी रोखू शकणार नाही... कसे...
14
विद्यार्थ्यांना शारीरिक अन् मानसिक शिक्षा देण्यावर बंदी; शिक्षण विभागाने जारी केली नवी नियमावली
15
"वेदनेतून घेतलेला निर्णय, तुमच्या विश्वासाला..."; तेजस्वी घोसाळकरांचं शिवसैनिकांना भावनिक पत्र
16
आज एक चमकणारी एसयुव्ही लाँच होणार; इंटरनेट कनेक्टेड, मोठी टचस्क्रीन सह बरेच काही मिळणार...
17
Crime: आधी पाच मुलांना गळफास लावला, नंतर बापानेही संपवले आयुष्य; दोन मुले वाचली
18
Viral Video: लग्नाआधी तरुणी एक्स बॉयफ्रेंडला जाऊन भेटली, व्हिडीओ सोशल मीडिया तुफान व्हायरल; पण गोष्ट खरी आहे का?
19
'धुरंधर'मधील व्हायरल गाण्यावर शाहरुखनेही केला डान्स? Video व्हायरल; किंग खानचे 'जबरा फॅन' म्हणाले...
20
BMC निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत उद्धव ठाकरेंना धक्का; बड्या महिला नेत्याचा भाजपात प्रवेश होणार
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांचा कानमंत्र, भाजपा नेते लागले कामाला; एकनाथ शिंदेंची होणार कोंडी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2025 10:56 IST

जनता दरबारात कुठेही कुरघोडी नाही. आमचे विरोधक गडबड करत आहेत. महायुतीतील तिन्ही मजबुतीने काम करत आहेत असा दावाही संजीव नाईक यांनी केला.

ठाणे  - आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात भाजपा एक्टिव्ह मोडवर आली आहे. वनमंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबाराने महायुतीत भाजपा आणि शिवसेनेत कुरघोडी सुरू आहे का अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. त्यातच जनता दरबाराच्या आधी भाजपा नेत्यांनी ठाण्यात आढावा बैठक घेतली. त्याशिवाय पक्ष संघटना मजबूत करणे त्यात चुकीचे काही नाही असं विधान माजी खासदार संजीव नाईक यांनी केले आहे. जनतेत जाऊन लोकांची कामे करा असा कानमंत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे त्यानुसार ठाण्यात जनता दरबार भरवला जातोय असंही त्यांनी नमूद केले. त्यामुळे ठाण्यात एकनाथ शिंदे यांची कोंडी करण्याचा भाजपा प्रयत्न करतंय का असा सवाल उपस्थित होत आहे.

माजी खासदार संजीव नाईक म्हणाले की, प्रत्येक पक्ष आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करतोय त्यात चुकीचे काही नाही. पक्ष संघटना मजबूत करणे, कार्यकर्त्यांना ताकद देणे हे प्रत्येक पक्षाने केले पाहिजे त्यातच लोकशाहीची ताकद आहे. जेव्हा चंद्रशेखर बावनकुळे ठाण्यात आले होते तेव्हा त्यांनीही महापालिकेवर भाजपाचा झेंडा फडकला पाहिजे हे म्हटलं होते. युती करायची की नाही हे आमचे वरिष्ठ नेते ठरवतील. जे वरिष्ठ ठरवतील ते आम्हाला मान्य राहील असं त्यांनी सांगितले.

तसेच जनता दरबाराला विरोध करण्याचा प्रश्न आहे. जनता दरबार घेऊन लोकांचे प्रश्न सोडवावेत असं मुख्यमंत्र्‍यांनी सांगितले आहे. मंत्रालयात काम घेऊन जाणाऱ्या लोकांची संख्या पाहता, मंत्रीच जनतेपर्यंत पोहचत आहेत. ठाणे जिल्हा खूप मोठा आहे. कुठेही गैरसमज होत असतील तर ते वरिष्ठ पातळीवर दूर करण्यात येतील. आमच्या जिल्ह्यातील तिन्ही मंत्री जोमाने लोकांचं काम करतील. जनता दरबारात कुठेही कुरघोडी नाही. आमचे विरोधक गडबड करत आहेत. महायुतीतील तिन्ही मजबुतीने काम करत आहेत असा दावाही संजीव नाईक यांनी केला.

दरम्यान, मंत्र्‍यांनी जितके जनतेत मिसळून काम करतील, जनतेशी संवाद साधतील त्यातून आपण जनतेला दिलेली वचने आहेत त्याची पूर्तता होईल. लोकांमध्ये जाऊन काम करा असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्‍यांना कानमंत्र दिला आहे. त्यानुसार भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री गणेश नाईक हे लोकांमध्ये जाऊन काम करतायेत. त्यासाठी ठाण्यात आम्ही आढावा बैठक घेतली. विविध खात्याचे अधिकारी, भाजपा पदाधिकारी मिळून जनता दरबारात लोकांचे प्रश्न कसे सोडवले जातील. त्यांचे अर्ज घ्यायचे आणि संबंधित खात्यापर्यंत कसे पोहचतील याबाबत भाजपाकडून आढावा बैठक घेण्यात आली अशी माहिती संजीव नाईक यांनी दिली. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसGanesh Naikगणेश नाईकEknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपा