शहरं
Join us  
Trending Stories
1
बुडालेल्या लोकांना शोधायला गेलेल्या SDRF पथकाची बोट उलटली; तीन जवानांचा मृत्यू
2
“काही नेत्यांची कीव येते”; पुणे पोर्शे अपघात प्रकरणी वसंत मोरेंचे रोखठोक भाष्य, दिला इशारा
3
बारामतीत खेला होबे...? शरद पवारांना विजयाची खात्री, पण या गोष्टीची धाकधुकही
4
Shoaib Malik शी घटस्फोटानंतर Sania Mirza ने बदलली घरावरील 'नेम प्लेट'; स्वत:सोबत जोडले एका खास व्यक्तिचे नाव
5
तब्येत बरी नसतानाही IPL मॅचनंतर शाहरुखची 'ती' कृती जिंकतेय चाहत्यांचं मन; Video व्हायरल
6
Gold-Silver Price: रिटर्न देण्याच्या बाबतीत चांदीनं सोन्याला टाकलं मागे, पाहा किती झाली किंमत?
7
मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावे, अशी ज्यांची इच्छा ते उत्साहाने करताहेत मतदान! - पुष्करसिंह धामी
8
"मला iPhone घेण्याची ऐपत नाही..."; लेकीनं बापाला इतकं सुनावलं, रस्त्यावरच गुडघे टेकले
9
प्रज्वल रेवण्णांच्या अटकेसाठी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी पीएम मोदींना पत्र लिहिलं; केली मोठी मागणी
10
षडयंत्र, हत्या अन् मृतदेहाचे तुकडे...; बांग्लादेशी खासदाराच्या मृत्यूचं गूढ कायम
11
“केजरीवाल यांनी कठोर कारवाई करुन न्याय द्यावा”; निर्भयाच्या आईचे स्वाती मालिवाल यांना समर्थन
12
Vaishakh Purnima 2024: वैशाख पौर्णिमेला न विसरता करा पिंपळाची पूजा; जाणून घ्या कारण!
13
मागे बसून गाडी कशी चालवता येईल?; भाजपच्या कामकाजात आता संघाचे लक्ष नसेल?
14
लोकसभेला ४८ जागा होत्या, म्हणून कमी घेतल्या, विधानसभेला २८८...; शरद पवारांचा ठाकरे, काँग्रेसला बोलता बोलता इशारा
15
Success Story: वडील शेतकरी, आई चालवायची अंगणवाडी केंद्र; मुलानं उभं केलं ₹९७३ कोटींचं साम्राज्य
16
वडील फोनवर बोलायला बाहेर गेले, तितक्यात स्विमिंग पूलमध्ये बुडून मुलाचा मृत्यू
17
Buddha Purnima 2024: बुद्ध पौर्णिमेला भगवान बुद्धांच्या विचारातून परिस्थितीचा सामना करायला शिका!
18
“इंडिया आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल, २ दिवसांत PM पदाचा निर्णय घेणार”; काँग्रेस नेत्याचा दावा
19
पुण्यास वेगळा न्याय, मग रामदेववाडीवरच का असा अन्याय? इकडे चारही मृतांचे कुटुंबीय बेदखल 
20
भाजपला २७२ चा आकडा गाठता आला नाही तर...; पाठिंब्याच्या चर्चांवर शरद पवारांचे मोठे वक्तव्य

'राज्यात पूरस्थिती असताना मुख्यमंत्री प्रचारात व्यस्त'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2019 4:33 AM

काँग्रेस नेते नाना पटोले यांचा आरोप

मुंबई : अतिवृष्टीमुळे राज्यातील विविध भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. रस्ते व रहिवासी भागांत पाणी साचल्याने भीतीचे वातावरण आहे. अशा बिकट प्रसंगी राज्य आपत्ती निवारण प्राधिकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष असलेले मुख्यमंत्री प्रचारयात्रेत व्यस्त आहेत.मुख्यमंत्र्यांनी तातडीने उपाययोजना करून जनतेला संकटातून न काढल्यास आम्ही मंत्रालयातील आपत्ती निवारण कक्षाचा ताबा घेऊ, असा इशारा प्रदेश काँग्रेस प्रचार समितीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे.पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबई येथे प्रदेश काँग्रेस, मुंबई काँग्रेस व काँग्रेस प्रचार समितीच्या नेत्यांची तातडीची बैठक घेतली. या वेळी बोलताना पटोले म्हणाले, मुख्यमंत्री राज्यभर प्रचार दौरे करत असल्याने संपूर्ण यंत्रणा मुख्यमंत्र्यांची बडदास्त ठेवण्यामध्ये व्यस्त आहे. राज्याच्या मुख्य सचिवांपासून विभाग व जिल्हा स्तरावरील अधिकारी कोणतीही पावले उचलताना दिसत नाहीत, अशी टीकाही त्यांनी त्यांना केली.काँग्रेस कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून आपत्तीग्रस्तांना आवश्यक मदत व साहाय्य करावे, असे आवाहन या वेळी करण्यात आले. या बैठकीस माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा, मुंबई कार्याध्यक्ष एकनाथ गायकवाड, प्रदेश कार्याध्यक्ष मुजफ्फर हुसेन, कृपाशंकर सिंह, आमदार हरिभाऊ राठोड, मोहन जोशी, चरणजित सप्रा आदी नेते उपस्थित होते.‘एसडीआरएफ फंडातून मदत द्यावी’मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर, पनवेल, बदलापूर, नवी मुंबई, रायगड, पेण, नाशिक, सांगली, कोल्हापूर यांसह राज्याच्या विविध भागांत महापुराने प्रचंड थैमान घातले आहे. कित्येकांना जीव गमवावा लागत आहे. लोक जीव मुठीत घेऊन वावरत आहेत. जनावरांच्या जीवितहानीची तर गणतीच नाही. घरात पाणी घुसल्याने नागरिकांना इतरत्र आश्रय घ्यावा लागत आहे. अनेक भागांतील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने नैसर्गिक आपत्ती जाहीर करून पूरग्रस्तांना ‘राष्ट्रीय आपदा व्यवस्थापन कायदा- २००५’नुसार एसडीआरएफ फंडातून मदत वितरित करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसfloodपूरRainपाऊसNana Patoleनाना पटोले