शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
2
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
3
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
4
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२५: आजचा दिवस यशदायी, पदोन्नती संभवते, मित्र भेटतील !
5
अमेरिका आंदोलनाने पेटली, १२ राज्यांतील २५ शहरांत लोक उतरले रस्त्यावर; लॉस एंजिलिसमध्ये संचारबंदीनंतर आंदोलन चिरडून टाकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न
6
सोनमचा भाऊ म्हणाला, तिला फाशीच द्या, कुटुंबाने नातेसंबंध तोडले; मिळाली पोलिस कोठडी
7
आंतरधर्मीय विवाह; कुटुंबांच्या संमतीने विवाह, तुम्ही आक्षेप कशाला घेता? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
8
काश्मीरसाठी थेट रेल्वे सुरू अन् पर्यटनाची गाडी येतेय रुळावर; १० दिवसांचे बुकिंग फुल्ल
9
‘भारतात मतदार यादी तयार करणे, हे जगात सर्वांत कठीण काम’
10
लातूरमध्ये नागरिकाची सतर्कता; ११२ ला काॅल, अन् मुलगा सापडला !
11
Video: काळजाचा ठोका चुकला! अंबरनाथ स्थानकात लोकल येत होती अन् अंध व्यक्ती थेट ट्रॅकवर कोसळला
12
निगेटिव्ह रिपोर्टिंग केल्याच्या रागातून डॉक्टरांचे बनवले अश्लील व्हिडिओ? कराडात 'एआय' चा घातक वापर
13
अखिलेश यादवांच्या आले मनी...! एक जिल्हा सोडला अन् युपीतील इतर जिल्ह्यांच्या कार्यकारिणी केल्या बरखास्त
14
ट्रम्पनी संधी साधली, अमेरिका आणि चीनमध्ये खतरनाक डील झाली; ट्रम्पच्या घोषणेने अनेकांची झोप उडाली
15
हे तेच मजेशीर केदार यादव...! लालूंचा वाढदिवस होडीवर साजरा करायला गेले आणि चिखलात पडले...
16
महापालिका निवडणूकीच्या पाश्वभूमीवर ओमी कलानींचा पुन्हा शिंदेगटाकडे दोस्तीचा हात?
17
महाराष्ट्रातही सोनम-राजा प्रकरण! २३ मे रोजीच झालेले लग्न, वटपौर्णिमेलाच कुऱ्हाडीने पतीला संपविले
18
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी प्रेग्नंट? लग्नाला महिना झाला! मेघालय पोलिसांकडे वैद्यकीय अहवाल आला
19
पहाटे ५.३० ला हॉटेलवरून निघाले, २.३० वाजता राजाचा मृतदेह दरीत फेकला; 'असा' होता ९ तासांचा घटनाक्रम
20
छत्तीसगडमधील सुकमा येथे दोन नक्षलवादी ठार; एकावर ५ लाखांचे बक्षीस होते

शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने घेतली दुष्काळप्रश्नी मुख्यमंत्र्यांची भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2019 05:58 IST

राज्यात रात्रीचे टॅँकर कुठेही चालू दिले जाणार नाहीत तसेच चाऱ्याचे दरही लवकरच वाढवले जातील, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

मुंबई : मराठवाड्यात सर्वत्र दिवसभर भारनियमन केले जाते आणि रात्री बेरात्री पाण्याचे टँकर आणले जातात. लोक रात्री दोन-तीन वाजता उठून पाणी भरायला जातात. हे तातडीने थांबवा आणि चारा छावण्यांचे दर ११९ रुपये करा, अशा मागण्या राष्टÑवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केल्या. त्यावेळी राज्यात रात्रीचे टॅँकर कुठेही चालू दिले जाणार नाहीत तसेच चाऱ्याचे दरही लवकरच वाढवले जातील, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी बुधवारी भेट घेऊन दुष्काळाबाबत चर्चा केली. बैठकीला अजित पवार, राणा जगजीत सिंह पाटील, दीपक आबा साळुंखे, राजेश टोपे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. दुष्काळाबाबत झालेल्या बैठकीत फळबाग, छावण्या, दुष्काळी भागातील नागरिकांच्या हाताला काम, पाण्याचे योग्य नियोजन, दुष्काळी भागात अन्नधान्य नियोजन, जायकवाडी धरणातील पाणी यासारख्या प्रमुख विषयांवर चर्चा झाली.

कोणत्याही गावाची लोकसंख्या गृहीत धरुन २०११ च्या सेन्सेसचा विचार करायचा आणि त्यात १५ टक्के वाढ धरायची म्हणजे आत्ताच्या लोकसंख्येचा अंदाज येतो. तो अंदाज घेऊन प्रत्येकाला माणसी २० लिटर प्रतीदिन पाणी देणे अपेक्षित आहे. शिवाय ग्रामपंचायतीकडे जनावरांच्या नोंदी आहेत. त्यानुसार मोठ्या जनावरांना ४० व छोट्यांना १५ लिटर पाणी देणे अपेक्षित आहे. मात्र सध्या एवढे देखील पाणी दिले जात नाही, असे राणा जगजितसिंह पाटील यांनी निदर्शनास आणून दिले. तेव्हा यात तातडीने सुधारणा केल्या जातील, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. पाण्यासाठी तातडीने दिवसाच्या भारनियमनाचे नियोजन करा, तशा सूचना महावितरणला देण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी त्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी यांना दिले.

दुधाला प्रती लिटर ३ रुपये वाढून देण्याचा निर्णय प्रलंबित आहे, असे सांगितल्यानंतर ३० एप्रिलपर्यंतचे पैसे तातडीने दिले जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. रोजगार हमी योजनेच्या कामात कुशल कामाची बिले अद्याप प्रलंबित आहेत. ती तातडीने द्या, अशी मागणी पवार यांनी केली. त्यावर केंद्र सरकारने जरी निधी दिला नाही तरी राज्य सरकार स्वनिधीतून ही देणी देईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

शेतकऱ्यांना भरीव मदत गरजेची - पवारफळबागा जळून चालल्या आहेत. फळबाग जळणे म्हणजे २५ वर्ष मागे जाणे आहे. आमच्या सरकारच्या काळात आम्ही प्रति हेक्टर ३५ हजार दिले होते. तितकी रक्कम द्यावी. दुष्काळग्रस्त भागात पाणी वाटपात होणारा घोटाळा थांबवावा, अशी विनंतीही पवारांनी केली. जायकवाडी धरणाचे पाणी मराठवाड्याला देण्यात यावे. नाहीतर बाष्पीभवन होऊन ते पाणी वाया जाईल, असे पवारांनी सुचवल्यावर मुख्यमंत्र्यांनी अहवाल मागवून घेतो, असे सांगत सकारात्मकता दर्शवली. मुख्यमंत्र्यांनी २३ मे रोजी लोकसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर यासंदर्भात केंद्राकडे अधिक मदत मागू, असे आश्वासनही दिले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSharad Pawarशरद पवारdroughtदुष्काळ