शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
3
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
4
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
5
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
6
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
7
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
8
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
9
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
10
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
11
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
12
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
14
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
15
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
16
Bhendwal Bhavishyvani 2025: शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
17
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
18
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
19
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
20
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'

मालिकांप्रमाणेच राहुल गांधीच्या भाषणाआधी क्लिप येईल, वास्तवाशी याचा संबंध नाही : देवेंद्र फडणवीस 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2019 21:13 IST

काँग्रेसने गरीबी दूर केली ती फक्त आपल्या पार्टीतल्या चेल्यांची...

पुणे : राहुल गांधी यांच्या पणजोबा, आजोबा, वडील, आजी सर्वांनी गरीबी हटाव ची घोषणा दिली होती. आणि आजदेखील काँग्रेस गरीबी हटावचीच घोषणा देत आहे. काँग्रेसने गरीबी दूर केली ती फक्त आपआपल्या पार्टीतल्या चेल्यांची...त्यामुळे टिव्ही मालिकांच्या आधी दाखवतात तशी राहुल गांधी यांच्या भाषणाआधी क्लिप येईल, या भाषणाचा वास्तवाशी काही संबध नाही, असी खोचक टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर केली.  भारतीय जनता पार्टी व शिवसेना प्रणित महायुतीचे लोकसभा निवडणुक उमेदवार गिरीश बापट यांच्या प्रचारार्थ वडगाव शेरी येथे सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.यावेळी बारतीय जनता पार्टीचे विविध नेते व पदाधिकारी , कार्यकर्ते उपस्थित होते. फडणवीस म्हणाले, काँगेसने जाहीर नाम्यात सांगितले की, प्रत्येक गरीबांच्या खात्यात 72 हजार जमा करणार , मात्र, हे पैसे ते कुठुन आले हे राहुल यांना सांगता आले नाही. पण गेल्या पाच वर्षांत अनिल शिरोळे, मोदींनी जगात भारताची प्रतिष्ठा वाढवली. तुम्हाला देश कुणाच्या हाती द्यायचा आहे  याचा विचार करावा लागेल. आम्ही 5 वर्षात जे विकास कामे केली त्यावर आम्ही या निवडणुकीला सामोरे जात आहोत..2022 मध्ये देशातील प्रत्येकाला घर असेल एकहीजण बेघर नसेल.. सव्वा लाख घरे बांधण्याचे राज्य सरकारचे नियोजन आहे. आयुष्मान योजना, 5 लाख रूपयांची योजना, दोन महिन्यात 20 लाख लोकांची ऑपरेशन या योजनेतंर्गत झाली . मोदींनी 34 कोटी लोकांची बँकेत खाती सुरू केली. तसेच लोकांना शौचालय नव्हते. 5 वर्षात 98 % लोकांकडे  शौचालये आहेत. ऊज्वला गँस योजना केली. महिलांच्या शरीरात स्वयंपाक करताना धूर जातो म्हणून १३ कोटी लोकांना गँस दिला. जगदीश घसा बसला तरी हरकत नाही काँग्रेसला घरी बसवल्याशिवाय राहू नकोस. निवडणूक गल्लीतील नाही दिल्लीतील आहे. देश कोणाच्या हातात सुरक्षित राहू शकतो याची निवडणूक आहे.यावेळी गिरीश बापट म्हणाले , काँग्रेसवाले 10 वर्ष मेट्रो खालून की वरून यावरच चर्चा करत बसले.आम्ही ती वास्तवात आणली. आता वडगाव शेरीचा माणूस 20 मिनिटात कोथरूडला जाईल. सगळी कामे आम्ही केलीत याचा अभिमान आहे. विकास सामान्यांसाठी करायचा आहे.काँग्रेसने पुण्यातून फक्त घ्यायचे काम केले, दिले काहीच नाही. पुण्याची अवस्था त्यांनी.वाईट केली. वाहतुक कोंडी होते म्हणून ऊद्योग येत नाहीत. आपण ते बदलतो आहोत. मेट्रो रिंग रोड हब तयार करतो आहोत.तसेच पुण्याचे सांडपाणी ट्रीट करणार, ते नदीत जाणार नाही. 

 

टॅग्स :Puneपुणेcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकpune-pcपुणे